शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

जिल्ह्यातील 4 लाख विद्यार्थी विनापरीक्षा झाले उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST

लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार ...

लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचा जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ४६४ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनाचे संकट सुरू आहे. गेल्या वर्षीही ऐन परीक्षा तोंडावर आल्या असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. दरम्यान, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शिक्षण विभागाकडून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. वर्षभरात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांची घंटीच वाजली नाही. साधारणत: चार महिन्यांपासून पुढील इयत्तांचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परीक्षा कशा होणार, अशी विद्यार्थ्यांसह पालकांना धास्तीच होती. याशिवाय, सध्या कोरोनाचा आलेख उंचावला असल्याने शाळांमध्ये परीक्षा घेणे कठीण झाले होते. शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेविना पास धोरणाचा निर्णय चांगला असल्याचे पालक म्हणत असले तरी मुले लिखाणाच्या सरावापासून दुरावत आहेत, अशी चिंताही व्यक्त करीत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर वर्ग भरले नाहीत. ऑनलाइन शिक्षण असले तरी त्याचा योग्य परिणाम विद्यार्थ्यांवर अपेक्षित प्रमाणात दिसून येत नव्हता. शिक्षणासाठी सतत मोबाइल वापरामुळे डोळ्यावर ताण येऊन परिणाम होत होता. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, लिखाणाचा सराव बंद झाला आहे.

- प्रमोद गाडेकर

कोरोनाच्या संकटाचा सर्वांवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू होते; परंतु ग्रामीण भागातील शंभर टक्के मुले या प्रवाहात नव्हती. जिल्हा परिषदेने कोविड कॅप्टनच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला होता. त्याचा काही प्रमाणात लाभ झाला असला तरी परीक्षा न घेणे योग्यच आहे.

- नंदकुमार थडकर

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावले नाहीत. कमी-जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचे अध्ययन झाले आहे. शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य असला तरी प्रश्नपत्रिका घरी देऊन उत्तरपत्रिका घरीच सोडवून घेतली असता विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे, याची माहिती मिळू शकली असती. मात्र, परीक्षा घेतली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय बंद झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळाच नसल्याने मुले टीव्ही, मोबाइलवर व्यस्त राहत आहेत. त्यामुळे ती काही प्रमाणात आळशी बनत आहेत. परीक्षा असली असती तर काही प्रमाणात विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता.

- नानासाहेब देशमुख

ग्रामीण भागातील विशेषत: अशिक्षित कुटुंबातील इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास झेपण्याची कमी शक्यता आहे. त्यामुळे गळती होण्याची शक्यता आहे, तसेच विद्यार्थ्यांचे शाळेकडे दुर्लक्ष होण्याची भीती आहे.

- सतीश सातपुते