शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

जिल्ह्यातील 4 लाख विद्यार्थी विनापरीक्षा झाले उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST

लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार ...

लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचा जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ४६४ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनाचे संकट सुरू आहे. गेल्या वर्षीही ऐन परीक्षा तोंडावर आल्या असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. दरम्यान, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शिक्षण विभागाकडून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. वर्षभरात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांची घंटीच वाजली नाही. साधारणत: चार महिन्यांपासून पुढील इयत्तांचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परीक्षा कशा होणार, अशी विद्यार्थ्यांसह पालकांना धास्तीच होती. याशिवाय, सध्या कोरोनाचा आलेख उंचावला असल्याने शाळांमध्ये परीक्षा घेणे कठीण झाले होते. शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेविना पास धोरणाचा निर्णय चांगला असल्याचे पालक म्हणत असले तरी मुले लिखाणाच्या सरावापासून दुरावत आहेत, अशी चिंताही व्यक्त करीत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर वर्ग भरले नाहीत. ऑनलाइन शिक्षण असले तरी त्याचा योग्य परिणाम विद्यार्थ्यांवर अपेक्षित प्रमाणात दिसून येत नव्हता. शिक्षणासाठी सतत मोबाइल वापरामुळे डोळ्यावर ताण येऊन परिणाम होत होता. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, लिखाणाचा सराव बंद झाला आहे.

- प्रमोद गाडेकर

कोरोनाच्या संकटाचा सर्वांवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू होते; परंतु ग्रामीण भागातील शंभर टक्के मुले या प्रवाहात नव्हती. जिल्हा परिषदेने कोविड कॅप्टनच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला होता. त्याचा काही प्रमाणात लाभ झाला असला तरी परीक्षा न घेणे योग्यच आहे.

- नंदकुमार थडकर

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावले नाहीत. कमी-जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचे अध्ययन झाले आहे. शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य असला तरी प्रश्नपत्रिका घरी देऊन उत्तरपत्रिका घरीच सोडवून घेतली असता विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे, याची माहिती मिळू शकली असती. मात्र, परीक्षा घेतली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय बंद झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळाच नसल्याने मुले टीव्ही, मोबाइलवर व्यस्त राहत आहेत. त्यामुळे ती काही प्रमाणात आळशी बनत आहेत. परीक्षा असली असती तर काही प्रमाणात विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता.

- नानासाहेब देशमुख

ग्रामीण भागातील विशेषत: अशिक्षित कुटुंबातील इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास झेपण्याची कमी शक्यता आहे. त्यामुळे गळती होण्याची शक्यता आहे, तसेच विद्यार्थ्यांचे शाळेकडे दुर्लक्ष होण्याची भीती आहे.

- सतीश सातपुते