शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

महिलांचे आरोग्य...

By admin | Updated: March 10, 2017 23:46 IST

आयुर्वेद

सर नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला. त्यामुळे तुम्ही आम्हाला महिला आरोग्याचा आयुर्वेदाने कसा विचार केला आहे ते सांगा,’’ दिप्ती म्हणाली.‘‘मुळात स्त्रीच्या जीवनाच्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली कुमारिका, दुसरी प्रौढावस्था आणि तिसरी वृद्धावस्था. या तिन्ही टप्प्यांवर त्यांच्या आरोग्याच्या समस्या वेगळ्या आहेत. पुरुषांपेक्षासुद्धा स्त्रीच्या आरोग्याचा एका वेगळ्या पातळीवरून विचार करावा लागतो.’’मुलगी जेव्हा वयात येते त्यावेळी तिचा मासिक धर्म चालू होतो. (काही लोक त्याला मूर्खासारखं प्रॉब्लेम असंही म्हणतात.) ही एक चांगली नैसर्गिक क्रिया आहे. पुढे स्त्रीला मातृत्वासाठी तयार होण्यासाठी निसर्गाची ती एक खूण आहे. अनेकवेळा अशा मासिक धर्माच्यावेळी काही मुलींना पोटात दुखतं. खरं तर मासिकस्राव ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यानं त्यावेळी पोटात दुखायला नको. आपल्या डोळ्यातून पाणी येताना डोळे दुखतात का? किंवा आपण थुंकताना तोंड दुखतं का? मासिक स्रावसुद्धा इतक्या सहजतेने व्हायला हवा.आयुर्वेदाप्रमाणे ज्या एका वायूच्या प्रेरणेने हे स्राव बाहेर नेण्याचे कार्य होते; त्याच्या कामात अडथळा येतो. याला आज-काल पाहायला मिळणारं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे वाढणारी जाडी. आज-काल तरुण मुलींमध्ये जाडीचं प्रमाण वाढत आहे, ही निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे. त्याहीपेक्षा काळजी करण्यासारखी गोष्ट ही आहे की, पोट, मांड्या, नितंब या भागातच चरबीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढे जाऊन वंध्यत्वासारखे आजार होऊ शकतात. सतत एका जागेला बसून राहणे, खेळ -खेळलेच तर बैठे खेळ खेळणे आणि व्यायामाचा अभाव ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. या सर्वांच्याबरोबरीने आणखी एक अत्यंत विचार करायला लावणारे कारण आहे ते म्हणजे आपण तथाकथित ‘पौष्टिक’ आहार खातो. त्यामध्ये चरबीयुक्त (मेद वाढविणारे) आणि पिठूळ (साखर वाढविणारे) पदार्थ अधिक प्रमाणात जातात. फळं, चोथायुक्त पदार्थ खाण्यात जवळजवळ नसतातच. त्यामुळे शरीरावर चरबी वाढते.यासाठी वातशामक औषधे वापरण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे. आयुर्वेदाने आणखी एक गोष्ट सांगितली आहे आणि ती मननीय आहे. अगदी लहानपणी गोवर किंवा कांजिण्या येऊन गेल्या असल्या तर पुढे जाऊन पाळीच्यावेळी पोटात दुखू शकते. त्या गोष्टींचा विचार करून चिकित्सा केली, तर पुढे कधीच पोट धरून लोळायची वेळ येत नाही. ‘‘खरं तर पोटात दुखू लागल्यास नुसतं गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकलं तरी बरं वाटतं. काहीवेळा वेदनाशामक औषधे घेण्याची वेळ येते.’’ पंचकर्मापैकी स्नेहन, स्वेदन व बस्ती हे उपचार छानच उपयोगी पडतात. फक्त ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केले गेले पाहिजेत. स्त्रियांच्या इतर आजारांची माहिती पुढील भागात घेऊ.- वै. विवेक हळदवणेकर