शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

महिलांचे आरोग्य...

By admin | Updated: March 10, 2017 23:46 IST

आयुर्वेद

सर नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला. त्यामुळे तुम्ही आम्हाला महिला आरोग्याचा आयुर्वेदाने कसा विचार केला आहे ते सांगा,’’ दिप्ती म्हणाली.‘‘मुळात स्त्रीच्या जीवनाच्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली कुमारिका, दुसरी प्रौढावस्था आणि तिसरी वृद्धावस्था. या तिन्ही टप्प्यांवर त्यांच्या आरोग्याच्या समस्या वेगळ्या आहेत. पुरुषांपेक्षासुद्धा स्त्रीच्या आरोग्याचा एका वेगळ्या पातळीवरून विचार करावा लागतो.’’मुलगी जेव्हा वयात येते त्यावेळी तिचा मासिक धर्म चालू होतो. (काही लोक त्याला मूर्खासारखं प्रॉब्लेम असंही म्हणतात.) ही एक चांगली नैसर्गिक क्रिया आहे. पुढे स्त्रीला मातृत्वासाठी तयार होण्यासाठी निसर्गाची ती एक खूण आहे. अनेकवेळा अशा मासिक धर्माच्यावेळी काही मुलींना पोटात दुखतं. खरं तर मासिकस्राव ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यानं त्यावेळी पोटात दुखायला नको. आपल्या डोळ्यातून पाणी येताना डोळे दुखतात का? किंवा आपण थुंकताना तोंड दुखतं का? मासिक स्रावसुद्धा इतक्या सहजतेने व्हायला हवा.आयुर्वेदाप्रमाणे ज्या एका वायूच्या प्रेरणेने हे स्राव बाहेर नेण्याचे कार्य होते; त्याच्या कामात अडथळा येतो. याला आज-काल पाहायला मिळणारं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे वाढणारी जाडी. आज-काल तरुण मुलींमध्ये जाडीचं प्रमाण वाढत आहे, ही निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे. त्याहीपेक्षा काळजी करण्यासारखी गोष्ट ही आहे की, पोट, मांड्या, नितंब या भागातच चरबीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढे जाऊन वंध्यत्वासारखे आजार होऊ शकतात. सतत एका जागेला बसून राहणे, खेळ -खेळलेच तर बैठे खेळ खेळणे आणि व्यायामाचा अभाव ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. या सर्वांच्याबरोबरीने आणखी एक अत्यंत विचार करायला लावणारे कारण आहे ते म्हणजे आपण तथाकथित ‘पौष्टिक’ आहार खातो. त्यामध्ये चरबीयुक्त (मेद वाढविणारे) आणि पिठूळ (साखर वाढविणारे) पदार्थ अधिक प्रमाणात जातात. फळं, चोथायुक्त पदार्थ खाण्यात जवळजवळ नसतातच. त्यामुळे शरीरावर चरबी वाढते.यासाठी वातशामक औषधे वापरण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे. आयुर्वेदाने आणखी एक गोष्ट सांगितली आहे आणि ती मननीय आहे. अगदी लहानपणी गोवर किंवा कांजिण्या येऊन गेल्या असल्या तर पुढे जाऊन पाळीच्यावेळी पोटात दुखू शकते. त्या गोष्टींचा विचार करून चिकित्सा केली, तर पुढे कधीच पोट धरून लोळायची वेळ येत नाही. ‘‘खरं तर पोटात दुखू लागल्यास नुसतं गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकलं तरी बरं वाटतं. काहीवेळा वेदनाशामक औषधे घेण्याची वेळ येते.’’ पंचकर्मापैकी स्नेहन, स्वेदन व बस्ती हे उपचार छानच उपयोगी पडतात. फक्त ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केले गेले पाहिजेत. स्त्रियांच्या इतर आजारांची माहिती पुढील भागात घेऊ.- वै. विवेक हळदवणेकर