शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

आम्ही सारे पानसरे...:हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: March 12, 2015 00:59 IST

डाव्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा--हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांनी हातात लाल झेंडे, डोक्यावर लाल टोपी आणि अंगावर लाल कपडे परिधान करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. जणूकाही लाल महासागरचे चित्र

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये निषेधार्थ डाव्या आणि पुरोगामी पक्ष-संघटनांनी बुधवारी राणीबाग ते आझाद मैदान धडक मोर्चा काढला. यावेळी हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांनी हातात लाल झेंडे, डोक्यावर लाल टोपी आणि अंगावर लाल कपडे परिधान करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. मोर्चा पाहून जणूकाही लाल महासागर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी करीत डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष- संघटनांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. दुपारी दीड वाजता भायखळ््यातील राणीबाग मैदानातून निघालेल्या या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते.‘नथुराम प्रवृत्ती हाणून पाडा’, ‘आम्ही पानसरे’ अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत होत्या. दुपारी साडेतीन वाजता आझाद मैदानावर आलेल्या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. आम्हाला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नको. मात्र, त्यांना शांततावादी संघटना हव्या आहेत की, अशांतता पसरविणाऱ्या, हे त्यांनी ताबडतोब स्पष्ट करायला हवे. सरकार ज्या धर्मांध शक्तींना पाठीशी घालत आहे, त्याच उद्या सरकारमधील लोकांनाही टार्गेट करतील, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर), भारिप बहुजन महासंघ, एस.यु.पी.आय. (कम्युनिस्ट) लाल निशाण पक्ष, लाल निशाण (ले), भारिप (से), अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक मुक्ती दल. श्रमिक मुक्ती दल (ले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भाकप (लिबरेशन), नर्मदा बचाव आंदोलन या पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सामील झाले होते.१८ मार्चला मुंबईत बैठकपाच पुरोगामी नेत्यांचे शिष्टमंडळ १८ मार्चला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे अशोक ढवळे, भारिपचे प्रकाश आंबेडकर, श्रमिक मुक्ती दलचे भारत पाटणकर आणि शेकापचे एस. व्ही. जाधव यांचा समावेश असेल. या बैठकीनंतर नागपूरला एक भव्य मोर्चा काढण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. २२ मार्चला कोल्हापूरला जाहीर सभाकोल्हापूरमध्ये २२ मार्चला ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.जोपर्यंत पानसरेंचे मारेकरी आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. मुख्यमंत्री दिसतील, तिथे स्थानिक कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून त्यांना आंदोलनाची जाणीव करून देतील.- भालचंद्र कानगो (राज्य सचिव, भाकप)सर्व पुरोगामी विचारांच्या शक्तींनी संकुचितपणा सोडून एकत्र येण्याची गरज आहे. कारण हल्लेखोर आता पुरोगामी विचार करणाऱ्यांच्या घरांपर्यंत पोहोचले आहेत.- जितेंद्र आव्हाड, आमदारपानसरे यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही. मात्र, संपूर्ण कुटुंब अधिक जोमाने त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. सरकार आणि विरोधी पक्षांची तपासाबाबतची भूमिका न्याय्य वाटत नाही.-मेघा पानसरे, कॉ पानसरे यांची सून.दोन ज्येष्ठ विचारवंतांचे खून झाल्यानंतर हल्ल्याचा तपास पाहून सरकार आणि विरोधी पक्ष गंभीर असल्याचे वाटत नाही. सर्वसामान्य माणसाने त्यांच्या विचारस्वातंत्र्यावर घाला होत असल्याचे लक्षात घेण्याची गरज आहे.- मुक्ता दाभोलकर (अंनिस, कार्यकर्ती)