शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पाणी उतरतेय इंचाइंचाने !

By admin | Updated: August 9, 2016 01:11 IST

पावसाची उघडीप : तिसऱ्या दिवशीही शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद; राधानगरीतून विसर्ग कमी

कोल्हापूर : जिल्ह्णात सोमवारी पावसाची उघडझाप राहिली. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचे पाणी कमी होण्याची गती फारच संथ आहे. तास दोन तासाला एक इंच अशा प्रमाणात हे पाणी उतरत आहे. कोयना, वारणा धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेच्या पाण्याची फूग कायम राहिली असल्याने पूरस्थिती कायम आहे. सायंकाळी सहापर्यंत पंचगंंगेची पातळी ४३.७ फुटांपर्यंत होती. अनेक मार्गांवरील पाणी कमी झाले असले तरी अद्याप ५९ बंधारे पाण्याखाली आहेत. गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. अधून-मधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी ऊनही कडकडीत पडत आहे. पाऊस कमी असला तरी नद्यांच्या पाणी पातळी ज्या गतीने कमी होणे अपेक्षित होती, ती होत नाही. जिल्ह्यातील राधानगरी, कासारीसह लहान धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच वारणा व कोयनेतून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पातळी अद्याप कमी झालेली नाही. त्याची फूग पंचगंगा नदीला असल्याने वारणा, भोगावती नद्यांची पातळी एकदम संथगतीने कमी होत आहे. अनेक मार्गांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली असली तरी अद्याप ५९ बंधारे पाण्याखालीच आहेत. त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे. एस.टी.चे मार्ग बऱ्यापैकी सुरू झाले असून कोल्हापूर ते पन्हाळा, रंकाळा ते राधानगरी, रंकाळा ते चौके, इचलकरंजी ते कागल, गगनबावडा ते कोल्हापूर हे मार्ग अंशत: बंद आहेत. जिल्ह्णात ३१ घरांची अंशत: पडझड झाली असून त्यामुळे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात ५१.५० मिलिमीटर झाला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे दुपारी बारा वाजता खुले झाल्याने त्यातून प्रतिसेकंद ५०५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरातील जनजीवन पूर्वपदावरपावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही घट होऊ लागली आहे. पावसाने उघडीप दिल्याने सोमवारी शहरवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आले. सोमवारी सायंकाळी पाणीपातळी सात वाजता ४३ फूट ७ इंच होती. रविवारच्या तुलनेत १ फुटांनी पाणी उतरले आहे. दोन दिवसांपासून पुराचे पाणी गायकवाड वाडा ओलांडून जामदार क्लबच्या पुढे होते. पुराचे पाणी ओसरू लागल्याने त्यात सुधारणा होऊन हे पाणी जामदार क्लबच्या पाठीमागे गेले आहे, तर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने हा परिसरही वाहतुकीसाठी खुला झाला. यासह व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्डा येथील पाणीही ओसरू लागले आहे. पावसाने उघडीप दिल्याने शहरवासीयांचे जनजीवन सुरळीत होत आहे. जयंती नाल्यामध्ये शहरातून वाहून आलेले थर्माकोल व अन्य गाळ काढण्याचे काम सोमवारी महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू होते. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सावधानता म्हणून सोमवारी तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल सर्व वाहनांसाठी बंद ठेवला होता. विशेष म्हणजे गेले दोन दिवस पर्यटनस्थळासारखी गर्दी या पुलावर होती. पोलिसांनी लोखंडी बॅरेकेटस लावून या परिसरातून बघ्यांना हटविले तर आंबेवाडी, वडणगे, केर्ली, चिखली या गावात जाणाऱ्या नागरिकांना पायी सोडले जात होते. पुलावर दोन पोलिस गाड्या लावून हा परिसर बंद केला आहे तर जोतिबा षष्ठी यात्रा असल्याने अग्निशमन दलाची एक गाडी व जवान तैनात केले आहेत. उत्साही तरुणांना लगामआंबेवाडी रेडेडोह व वडणगे पोवार पाणंद या ठिकाणी काही उत्साही तरुण पाण्यातून ये-जा करत होते. त्यातून धोका निर्माण होऊ नये म्हणून व्हाईट आर्मीचे जवान लाईफ जॅकेटसह तैनात केले होते. सायंकाळी पाण्याचा जोर ओसरू लागल्याने २५ जणांचे पथक जोतिबा मंदिर येथे षष्ठी यात्रा सुरू झाल्याने या ठिकाणी हलविण्यात आले. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले-४.७५, शिरोळ-२.१४, पन्हाळा-२२.५७, शाहूवाडी-२९, राधानगरी-३४.५०, गगनबावडा-३१.५०, करवीर-८.३६, कागल-५.५७, गडहिंग्लज-३.८५, भुदरगड-१७.२०, आजरा-५१.५०, चंदगड-१९.१६.‘एनडीआरएफ’ची पाच जवानांची तुकडी दाखलपूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार दोन दिवसांपूर्वी ‘एनडीआरएफ’चे २२ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून पूरबाधित ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. संभाव्य परिस्थितीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रविवारी रात्री आणखी पाच जवानांची तुकडी कोल्हापुरात दाखल झाली.दहा तासांत सात इंच पातळी कमी वारणा व कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व पंचगंगेची पाणी पातळीत संथगतीने कमी होत आहे. पंचगंगेची सकाळी आठ वाजता ४४.४ फूट पाणी पातळी होती. सायंकाळी सहा वाजता ती ४३.७ फुटापर्यंत खाली आली. म्हणजे दहा तासात अवघी ७ इंच पातळी कमी झाली. अलमट्टी धरणासाठी पाणीसाठा कायमविजापूर : सोमवारी पावसाचा जोर ओसरला असून अलमट्टी धरणातील पाणीसाठा ८६ टक्के कायम आहे. धरणात प्रतिसेकंद एक लाख ७६ हजार २३ घनफूट पाण्याची आवक तर एक लाख ७४ हजार २७५ घनफूट विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची १२४ टीएमसी क्षमता असून १0४ टीएमसी धरण भरले आहे. कोयना धरणातून १८ हजार ३५५ क्युसेक विसर्ग सुरू असून हे पाणी आल्यास एक ते दीड फूट पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कृष्णा नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.