शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

सुक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी प्रतिक्षाच

By admin | Updated: July 27, 2014 23:01 IST

९९ हजार शेतकरी : ४१८ कोटींची मागणी; जिल्ह्यात १२८० शेतकरी

प्रकाश पाटील - कोपार्डे , राज्यात असणारे ऊसाचे क्षेत्र व त्यासाठी शेतकऱ्यांकडून पाणी देण्यासाठी करण्यात येणारा पाटपद्धतीचा वापर यामुळे जमिनीचा पोत बिघडून क्षारपड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय पाण्याचाही अपव्यय होऊ लागलेचे लक्षात आले नंतर केंद्र व राज्या शासनाकडून ठिबंक व सुक्ष्मसिंचनाद्वारे शेतकऱ्यांनी पीकाला पाणी देण्याचा वापर करावा यासाठी ५० टक्के अनुदान देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, केंद्राकडून व राज्याकडून मिळणारे अनुदान अपुऱ्या निधीमुळे वेळेत मिळत नसल्याने राज्यातील ९९ हजार शेतकरी सुक्ष्मसिंचन अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. २०१२-१३ मध्ये कृषी विभागाकडे सुक्ष्मसिंचन अनुदानासाठी दोन लाख हजार ८३२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. तांत्रिक कारणास्तव यातील ८ हजार ९७ अर्ज रद्द करण्यात आले. तर १ लाख ९८ हजार ७३५ अर्ज अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले. यापैकी प्रत्यक्षात १ लाख ४९ हजार ८१ शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केले आहेत. कृषी विभागाकडून एक लाभार्थ्याला साधारणपणे पाच हेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येते. त्ययासाठी कृषी विभागाने एकूण ५६९ कोटी ८८ हजार रुपयांची तरतुद करत मागणी केली होती. यामध्ये केंद्राकडे ४५५ कोटी २० लाख ७० हजार तर राज्याकडे ११३ कोटी ८० लाख १८ हजार रुपयांचा समावेश आहे. मात्र मागणी केलेल्या पैकी कृषी विभागाकडे फक्त १९६ कोटी १७ लाख ३६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी कृषी विभागाने ५० हजार २९१ शेतकऱ्यांना १४६ कोटी ८५ लाख ६१ हजार रुपयांचे वाटप केले, तर ४९ कोटी ३१ लाख ७५ हजार रुपये विभाग, जिल्हा, तालुकास्तरावरून अद्याप ही वितरीत झालेले नाहीत. सन २०१२-१३ मध्ये १२८० शेतकऱ्यांचे ४ कोटी ५० लाख ८५ हजार अनुदान थकीत आहे. २०११-१२ मधील अनुदानाचे वाटप सुरू : राज्यात २०११-१२ मध्ये सुक्ष्मसिंचनासाठी १९६ कोटी ८९ लाख २६ हजार रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी आतापर्यंत १४० कोटी १ लाख २९ हजार रुपयांचे वाटप केले. अतिरिक्त प्रस्तावामुळे वाढलेले २५ कोटी ३९ लाख १२ हजार रुपये धरून उर्वरीत ८२ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. हा दुसरा हप्ता नुकताच प्राप्त झाला आहे. त्यापैकी ६७ कोटी ८३ लाख रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना केले असून १४ कोटी ४४ लाखांचे वाटप करणे बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राज्यात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. १ लाख ४० हजार हेक्टरवर आहे. येथे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाटपद्धतीने पाणी देण्याची पद्धत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठा होतो. ही पद्धत बदलण्यासाठी सुक्ष्मसिंचनासाठीचे अनुदान देणे गरजेचे आहे.