शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वीरपत्नीचा आत्मदहनाचा निर्णय स्थगित; जिल्हा प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST

कोल्हापूर : पतीच्या वीरमरणानंतर शासनाने देऊ केलेली हक्काची जागा गेल्या १४ वर्षांपासून नावावर होत नसल्याच्या कारणास्तव प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा ...

कोल्हापूर : पतीच्या वीरमरणानंतर शासनाने देऊ केलेली हक्काची जागा गेल्या १४ वर्षांपासून नावावर होत नसल्याच्या कारणास्तव प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिलेल्या वीरपत्नी वृषाली तोरसकर यांनी आपला निर्णय स्थगित केला. जिल्हा प्रशासनासोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी आपण आत्मदहन करणार नसल्याचे पत्र सोमवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

गडहिंग्लज येथील वृषाली तोरसकर यांचे पती महादेव तोरसकर यांना २००१ मध्ये वीरमरण आल्यानंतर वृषाली यांना शासनाकडून घरकुलासाठी जमीन मिळाली होती. बांधकाम सुरू असताना ही जागा ओपन स्पेसमध्ये असल्याने हा वाद न्यायालयात गेला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही प्रतिसाद मिळत नाही. या कारणास्तव त्यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र गेल्या चार दिवसांत जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर व न्यायालयीन प्रक्रिया लवकर घेण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर तोरस्कर यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला आहे. सोमवारी सायंकाळी आजी माजी सैनिक वेल्फेअर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन याबाबतचे लेखी पत्र दिले. यामुळे जिल्हा प्रशासनासह स्थानिक तलाठी, तहसीलदार यांचाही जीव भांड्यात पडला.

--