शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

ज्ञान संपन्नता वाढविणारी व्हन्नूरची विद्यामंदिर शाळा

By admin | Updated: June 23, 2015 00:08 IST

गुणवंत शाळा

खडकाळ जमीन, काताळाचे साम्राज्य असलेल्या परिसरात हिरवी पाने, विविधरंगी फुले, मेंदीची देखणी रांग बागेची सीमा दाखविणारी. पाण्याचे नळ व त्यातून नेमके हवे तेवढे पाणी जाईल, अशी सोय. हे सगळं बागेचं नयनरम्य दृश्य मनाला प्रसन्नता देणारे. विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांच्या परिश्रमातून फुललेली ही बाग. मुलींचे झांजपथक लयबद्ध व संगीतमय स्वागताला. मनाचा उल्हास आणि प्रत्यक्ष शाळा व वर्ग पाहताना तो चढत्या क्रमाने वाढत जाण्याचा अनुभव. ज्ञान संपन्नता वाढविणारी ही शाळा आहे ‘अ’ श्रेणीतील कागल तालुक्यातील विद्यामंदिर व्हन्नूर. येथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून पटसंख्या २२६ आणि ९ शिक्षक आहेत. या शाळेत इमारत, क्रीडांगण, स्टेज, किचन शेड अशा सुविधा आहेत. स्टेज अगदी कायम स्वरूपाचे व त्यापुढे मंडप आहे. परिपाठावेळी मुलांना ऊन व पावसाचा त्रास होऊ नये म्हणून तसेच स्नेहसंमेलन व अन्य कार्यक्रमांसाठी हे स्टेज उभारले आहे.शाळेची शून्यातून घोडदौड सुरू आहे. दिवस-रात्र ध्यानात-मनात, विचारात-आचारात शाळा आणि गुणवत्ता हाच निकष पाहणारे शिक्षक येथे आहेत. ‘शाळा गावात पोहोचलीय आणि गाव शाळेत’ अशी स्थिती. शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास राखण्यात शाळेने सातत्य राखले आहे. ‘रोटरी’ने ४.५० लाख रु. खर्च करून मुला-मुलींसाठी भिंतीसह टाईल्स लावून टॉयलेट व मुताऱ्या बांधून दिल्या आहेत. ग्रंथालयालासुद्धा ५००० रुपयांची देणगी दिली आहे. लोकसहभागातून शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून बाग, टॉयलेट, ग्रंथखरेदी, स्टेज वगैरेंमुळे शाळा पर्यावरण, श्रमसंस्कार मूल्य, ज्ञानसंवर्धन व स्वच्छता साध्य करणारी आहे.व्हन्नूर शाळेने शासनाच्या प्रवेश धोरणाचे काटेकोर पालन केले आहे. शाळेत २५ टक्के प्रवेश हा वंचित मुलांना द्यावा, हा शासन निर्णय आहे. शाळेत ४२ टक्के मुले-मुली मिळून मागास व धनगर समाजाची आहेत. बेल्ट, टाय, बूट, सॉक्स, ओळखपत्र अशा युनिफॉर्ममध्ये चेहऱ्यावर आत्मविश्वास असलेली मुल-मुली येथे आहेत. मुलींचे लेझीम पथक आहे. विद्यार्थ्यांसाठी योगासने घेतली जातात. एवढेच काय तर शिक्षक पालकांसाठीही योगासन शिबिराचे आयोजन करतात. अगदी सकाळच्या प्रहरी जवळपास १२० पालक योगासनवर्गाला हजर असतात. आठ कॉम्प्युटर असलेल्या संगणक कक्षात विद्यार्थी ते हाताळतात. कॉम्प्युटरच्या तासांच्या टाईमटेबलमुळे हा कक्ष सतत बिझी असतो. वर्गनिहाय चौथी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी संगणक हाताळतात. अध्ययनासाठी व जनरल नॉलेजसाठी नेट व लॅपटॉप आहे. बागेतील हिरवळ, फुलझाडे, कंपाऊंड लगतचे वृक्ष ही सर्जनशीलता विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून तयार झाली आहे. इंग्रजी, मराठी भाषेतून परिपाठ, प्रश्नमंजूषा, भाषणं, नकला, नृत्यनाटिका, बालसभा वगैरेत पारंगत असलेली मुलं-मुली ही तर शाळेसाठी भूषणावह. बागकाम वर्गनिहाय वार वाटून दिलेले आहे. शाळा बिनकुलपाची असून विद्यार्थी शाळेत अध्ययनासाठी नियमितपणे येतात. गट व गटप्रमुख ही पद्धत आणि शिस्त व संस्कारातून अध्ययन सुपरव्हिजनशिवायसुद्धा चालू राहते. खेळ, कॉम्युटर व अन्यही सराव शाळेच्या वेळेव्यतिरिक्त चालू असतो. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे पटसंख्या, गुुणवत्ता वाढीच्यादृष्टीने योगदान खूप मोठे आहे. शिक्षकांच्या सच्चेपणाची व कृतिशील साथ असून गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न होत राहिल्याने जिल्हा परिषदेची शाळा असूनसुद्धा पट टिकून आहे. ‘माझी शाळा’ ही भावना लोकप्रतिनिधींची, पालकांची व ग्रामस्थांची. - डॉ. लीला पाटीलशाळेची वैशिष्ट्येबोलके व्हरांडे, डिजिटल वर्ग, पुस्तक पताका, नकाशे, तक्ते यामुळे विद्यार्थी ज्ञानसमृद्ध होण्यास मदत होत आहे. पहिली ते सातवीसाठी बेंच व्यवस्था, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी सदैव खुली. अल्पसंख्येने अप्रगत विद्यार्थी व त्यासाठी जादा तास आहेत. लेखन, वाचन व गणित क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. शुद्धलेखन, हस्ताक्षर स्पर्धा, सराव, प्रकट वाचन, तोंडी, लेखी आणि गणिताची तयारी. या गट पद्धतीने अध्ययन व गट अध्ययन उपक्रम नियोजनबद्ध राबिवले जाते. तोंडी-लेखी गणित, कोडी, गणिती खेळ, प्रयोग करून लेखन, पाढे पाठांतर वगैरेंमुळे विद्यार्थी गुणवत्तेत मागे नाहीत.गावातील एखाद्या कुटुंबात दु:खद घटना घडल्यास विद्यार्थी व शिक्षक त्या घरी जाऊन सांत्वन करण्याची पद्धत पाळणारे, सुखद घटनांमध्ये अभिनंदन करून सहभाग, वाढदिवसानिमित्त विद्यार्थी शाळेला पुस्तक भेट देण्याचा पायंडा. हात धुवादिन, स्वच्छतागृहांची सफाई, बाग, क्रीडांगणाची देखभाल, स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग.दिवाळी व उन्हाळी सुटीमध्ये संस्कार शिबिर.मुलांना कोथिंबिरीच्या पेंडीच्या किमतीपासून पंतप्रधानांचे परदेशी दौरे व जागतिक घडामोडींची माहिती मुक्त लायब्ररी, वृतपत्र वाचनयातून ‘वाचाल तरच वाचाल’ हा संदेश कृतीत उतरविला आहे. १२०० पुस्तकांची लायब्ररी व ओपन लायब्ररी ही संकल्पना राबविली आहे.