शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

दोन चाकावरचा गाडा रुतला समस्यांच्या गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2015 00:48 IST

व्यवसाय संकटात : मालवाहतूक गाड्यांच्या जमान्यात हातगाडीवाल्यांचे तुरळकच अस्तित्व

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -उन्हाळ्यात कडक उन्हाचे चटके सोसत, पावसाळ्यात ओल्याचिंब अंगाने पोटची खळगी भरण्यासाठी जिवाचा आकांत करत हातगाडी ओढण्यातच त्यांचे निम्मे आयुष्य संपलेले. अशातच भरगर्दीमध्ये प्रत्येकजण त्यांना ‘ए मामा, जरा बाजूला घे तुझा गाडा’ असा आदेश देत सायकलस्वारापासून चारचाकीवाले त्यांच्याकडे वैतागलेल्या नजरेने बघत बाजूने जात असतात. मात्र, त्यांचे दु:ख आणि वेदना कधी, कोणालाही दिसत नाही. आधुनिक स्पर्धेच्या युगात मानवी जीवन धावपळीचे बनले आहे. सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले आहेत. यांत्रिकीकरणामुळे काबाड कष्ट आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांवर मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी ज्यांच्याशिवाय पर्याय नसायचा, अशा हातगाडीवाल्यांनाही स्वत:च्या अस्तित्वासाठी आता झुंजावे लागत आहे. संगणकीय युगातही कष्टकऱ्यांना जगण्याचा आधार देणाऱ्या हातगाडीवाल्यांचे तुरळक अस्तित्व टिकून असले तरी आधुनिक वाहनांमुळे त्यांचा व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. सध्या कोल्हापुरात साधारणपणे ५० ते ६० हातगाड्यांवर कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्यांत ३५ वर्षांच्या तरुणांपासून ६५ वर्षीय दत्तू साळवी यांच्यापर्यंत हातगाडीवाल्यांचा समावेश आहे. कुणाला आपल्या एकवेळच्या जेवणाची, निवाऱ्याची तर कोणाला आपल्या मुलींच्या लग्नाची चिंता सतावत आहे. यासारख्या अनेक समस्यांचा डोंगरांच्या खाचखळग्यांतून हे आपला दोन चाकांचा संसार चालवत आहेत. लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड, टिंबर मार्केट, महानगरपालिका या परिसरात हे हातगाडीवाले दिसतात. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने हा व्यवसाय आता शेवटची घटका मोजत आहे. काही वर्षांपूर्वी दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये मिळत होते. आता दिवसाकाठी ६० ते १०० रुपये मिळणे कठीण होऊन बसले आहे. हातगाडी बनविण्यासाठी साधारणपणे सात ते दहा हजार रुपये खर्च येतो. या व्यवसायात ग्रामीण भागातील लोकांचा मोठा सहभाग आहे. गावाकडे तुटपुंजी शेती व अन्य उत्पन्नाची साधने नसल्याने सामान्य कुटुंबातील माणसे हा व्यवसाय करतात. बहुसंख्य निरक्षर असलेली ही माणसे व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत; पण त्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही. आधुनिकेतेची कास धरून जुनी किंवा नवीन एखादी गाडी घ्यायची म्हटले की, पुरेसा पैसा नाही की कोणतीही शासकीय योजना नाही. त्यामुळे हा घटक दुर्लक्षित पडला आहे.हातगाडी ओढणारे हे सर्व व्यक्ती माथाडी कामगारांमध्येच मोडतात. मात्र, हे सर्व व्यक्ती विखुरल्याने आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना शासकीय योजनेचे लाभ मिळत नाहीत तसेच शासनातर्फे त्यांना मदत करण्याबाबत उदासीनता दिसून येते. या सर्वांना एकत्र करून त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचे दु:ख समजून गरजेचे आहे. - रघु कांबळे, उपाध्यक्ष, कोल्हापूर फेरीवाले युनियन