शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

दोन चाकावरचा गाडा रुतला समस्यांच्या गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2015 00:48 IST

व्यवसाय संकटात : मालवाहतूक गाड्यांच्या जमान्यात हातगाडीवाल्यांचे तुरळकच अस्तित्व

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -उन्हाळ्यात कडक उन्हाचे चटके सोसत, पावसाळ्यात ओल्याचिंब अंगाने पोटची खळगी भरण्यासाठी जिवाचा आकांत करत हातगाडी ओढण्यातच त्यांचे निम्मे आयुष्य संपलेले. अशातच भरगर्दीमध्ये प्रत्येकजण त्यांना ‘ए मामा, जरा बाजूला घे तुझा गाडा’ असा आदेश देत सायकलस्वारापासून चारचाकीवाले त्यांच्याकडे वैतागलेल्या नजरेने बघत बाजूने जात असतात. मात्र, त्यांचे दु:ख आणि वेदना कधी, कोणालाही दिसत नाही. आधुनिक स्पर्धेच्या युगात मानवी जीवन धावपळीचे बनले आहे. सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले आहेत. यांत्रिकीकरणामुळे काबाड कष्ट आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांवर मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी ज्यांच्याशिवाय पर्याय नसायचा, अशा हातगाडीवाल्यांनाही स्वत:च्या अस्तित्वासाठी आता झुंजावे लागत आहे. संगणकीय युगातही कष्टकऱ्यांना जगण्याचा आधार देणाऱ्या हातगाडीवाल्यांचे तुरळक अस्तित्व टिकून असले तरी आधुनिक वाहनांमुळे त्यांचा व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. सध्या कोल्हापुरात साधारणपणे ५० ते ६० हातगाड्यांवर कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्यांत ३५ वर्षांच्या तरुणांपासून ६५ वर्षीय दत्तू साळवी यांच्यापर्यंत हातगाडीवाल्यांचा समावेश आहे. कुणाला आपल्या एकवेळच्या जेवणाची, निवाऱ्याची तर कोणाला आपल्या मुलींच्या लग्नाची चिंता सतावत आहे. यासारख्या अनेक समस्यांचा डोंगरांच्या खाचखळग्यांतून हे आपला दोन चाकांचा संसार चालवत आहेत. लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड, टिंबर मार्केट, महानगरपालिका या परिसरात हे हातगाडीवाले दिसतात. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने हा व्यवसाय आता शेवटची घटका मोजत आहे. काही वर्षांपूर्वी दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये मिळत होते. आता दिवसाकाठी ६० ते १०० रुपये मिळणे कठीण होऊन बसले आहे. हातगाडी बनविण्यासाठी साधारणपणे सात ते दहा हजार रुपये खर्च येतो. या व्यवसायात ग्रामीण भागातील लोकांचा मोठा सहभाग आहे. गावाकडे तुटपुंजी शेती व अन्य उत्पन्नाची साधने नसल्याने सामान्य कुटुंबातील माणसे हा व्यवसाय करतात. बहुसंख्य निरक्षर असलेली ही माणसे व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत; पण त्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही. आधुनिकेतेची कास धरून जुनी किंवा नवीन एखादी गाडी घ्यायची म्हटले की, पुरेसा पैसा नाही की कोणतीही शासकीय योजना नाही. त्यामुळे हा घटक दुर्लक्षित पडला आहे.हातगाडी ओढणारे हे सर्व व्यक्ती माथाडी कामगारांमध्येच मोडतात. मात्र, हे सर्व व्यक्ती विखुरल्याने आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना शासकीय योजनेचे लाभ मिळत नाहीत तसेच शासनातर्फे त्यांना मदत करण्याबाबत उदासीनता दिसून येते. या सर्वांना एकत्र करून त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचे दु:ख समजून गरजेचे आहे. - रघु कांबळे, उपाध्यक्ष, कोल्हापूर फेरीवाले युनियन