शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दररोज ९० कोटींची उलाढाल थंडावली

By admin | Updated: August 4, 2015 00:30 IST

वस्त्रनगरी इचलकरंजी : ६० टक्के कापड उत्पादन ठप्प; सायझिंग संप, ‘बालोत्रा बंद’चा परिणाम

इचलकरंजी : शहरात सुरू असलेला सायझिंग कामगारांचा संप आणि बालोत्रा-राजस्थान येथील बंद असलेल्या कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स याचा परिणाम यंत्रमाग कारखान्यांवर झालाा असून, सुमारे ६० टक्के कापड उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे वस्त्रनगरीमध्ये दररोज होणारी ९० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब केली पाहिजे, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने सुरू केलेल्या संपाला दोन आठवडे उलटले. त्यामुळे शहर व परिसरातील सुमारे १४० सायझिंग कारखाने बंद पडले असून, त्यांचेही दररोज होणाऱ्या सूत बिमांचे उत्पादन ठप्प झाले आहे. सूत बाजारामध्ये दररोज होणारी सुताची उलाढाल मंदावली असून, साठ कोटींहून अधिक रुपयांच्या सुताची उलाढाल थांबली आहे.सायझिंग कारखान्यांकडून यंत्रमागासाठी अत्यावश्यक असलेल्या सुताची बिमे मिळत नसल्याने आता शहर व परिसरातील साठ टक्के यंत्रमाग बंद पडले आहेत. त्यातून होणारे दररोज ९० कोटी रुपयांचे कापड उत्पादनसुद्धा ठप्प झाले आहे. आणखीन आठवडाभर हा संप चालला, तर उर्वरित यंत्रमागसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.आॅटोलूमसाठी लागणाऱ्या सूत बिमांच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शहरात दररोज होणारी सुताची आवक थंडावली आहे. बाजारामध्ये गेल्या आठवड्याभरापासून प्रतिकिलो सुताच्या दरात दहा ते पंधरा रुपयांनी घट झाली असली, तरीसुद्धा गिऱ्हाईक मिळत नसल्याने सुताची खरेदी-विक्री होईनाशी झाली आहे.दरम्यान, राजस्थानातील बालोत्रा येथे असलेले प्रोसेसर्स प्रदूषणाच्या कारणामुळे १५ मेपासून बंद करण्यात आले आहेत. याबाबतची सुनावणी नवी दिल्ली येथील हरित लवादासमोर सुरू असून, ३१ जुलै रोजी होणारी सुनावणी आता ७ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. हरित लवादासमोरील सुनावणी अत्यंत कडक असल्यामुळे त्यादिवशीसुद्धा काही तोडगा निघेल किंवा निर्णय होईल, याबाबतची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील वस्त्रोद्योगाची परिस्थिती दयनीय होत आहे. (प्रतिनिधी)सूत कापड वाहतूक अडचणीतइचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाच्या बिघडणाऱ्या स्थितीमुळे शहरातील कापड व सूत वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. बालोत्र्याला दररोज वीस ट्रक जाणारे कापड बंद झाले असून, पालीस जाणाऱ्या कापडाच्या वाहतुकीवर ७० टक्के परिणाम झाला आहे. तर दररोज ८० ट्रक येणारे सूत आता सरासरी दहा ते पंधरा ट्रक इतकेच येत आहे, अशी माहिती इचलकरंजी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे आनंदराव नेमिष्टे यांनी सांगितली.