शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ९० कोटींची उलाढाल थंडावली

By admin | Updated: August 4, 2015 00:30 IST

वस्त्रनगरी इचलकरंजी : ६० टक्के कापड उत्पादन ठप्प; सायझिंग संप, ‘बालोत्रा बंद’चा परिणाम

इचलकरंजी : शहरात सुरू असलेला सायझिंग कामगारांचा संप आणि बालोत्रा-राजस्थान येथील बंद असलेल्या कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स याचा परिणाम यंत्रमाग कारखान्यांवर झालाा असून, सुमारे ६० टक्के कापड उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे वस्त्रनगरीमध्ये दररोज होणारी ९० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब केली पाहिजे, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने सुरू केलेल्या संपाला दोन आठवडे उलटले. त्यामुळे शहर व परिसरातील सुमारे १४० सायझिंग कारखाने बंद पडले असून, त्यांचेही दररोज होणाऱ्या सूत बिमांचे उत्पादन ठप्प झाले आहे. सूत बाजारामध्ये दररोज होणारी सुताची उलाढाल मंदावली असून, साठ कोटींहून अधिक रुपयांच्या सुताची उलाढाल थांबली आहे.सायझिंग कारखान्यांकडून यंत्रमागासाठी अत्यावश्यक असलेल्या सुताची बिमे मिळत नसल्याने आता शहर व परिसरातील साठ टक्के यंत्रमाग बंद पडले आहेत. त्यातून होणारे दररोज ९० कोटी रुपयांचे कापड उत्पादनसुद्धा ठप्प झाले आहे. आणखीन आठवडाभर हा संप चालला, तर उर्वरित यंत्रमागसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.आॅटोलूमसाठी लागणाऱ्या सूत बिमांच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शहरात दररोज होणारी सुताची आवक थंडावली आहे. बाजारामध्ये गेल्या आठवड्याभरापासून प्रतिकिलो सुताच्या दरात दहा ते पंधरा रुपयांनी घट झाली असली, तरीसुद्धा गिऱ्हाईक मिळत नसल्याने सुताची खरेदी-विक्री होईनाशी झाली आहे.दरम्यान, राजस्थानातील बालोत्रा येथे असलेले प्रोसेसर्स प्रदूषणाच्या कारणामुळे १५ मेपासून बंद करण्यात आले आहेत. याबाबतची सुनावणी नवी दिल्ली येथील हरित लवादासमोर सुरू असून, ३१ जुलै रोजी होणारी सुनावणी आता ७ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. हरित लवादासमोरील सुनावणी अत्यंत कडक असल्यामुळे त्यादिवशीसुद्धा काही तोडगा निघेल किंवा निर्णय होईल, याबाबतची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील वस्त्रोद्योगाची परिस्थिती दयनीय होत आहे. (प्रतिनिधी)सूत कापड वाहतूक अडचणीतइचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाच्या बिघडणाऱ्या स्थितीमुळे शहरातील कापड व सूत वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. बालोत्र्याला दररोज वीस ट्रक जाणारे कापड बंद झाले असून, पालीस जाणाऱ्या कापडाच्या वाहतुकीवर ७० टक्के परिणाम झाला आहे. तर दररोज ८० ट्रक येणारे सूत आता सरासरी दहा ते पंधरा ट्रक इतकेच येत आहे, अशी माहिती इचलकरंजी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे आनंदराव नेमिष्टे यांनी सांगितली.