शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन चालना, घनसाळ संवर्धन चर्चेपुरतेच

By admin | Updated: November 9, 2014 23:37 IST

अनेक प्रश्न अनुत्तरित : निधीचा अभाव; रोजगारनिर्मिती आवश्यक; वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज--आजरा तालुका

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा --जिल्ह्याच्या पश्चिम भागात वसलेल्या आजरा तालुक्याचा निसर्ग पर्यटकवर्गास निश्चितच मोहिनी घालणारा आहे. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हा तालुका तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. सुकृतदर्शनी तालुक्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे; परंतु तालुक्यात येणारा निधी हा अपुरा असल्याने अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.आजरा साखर कारखाना व त्यानंतर अलीकडेच सुरू झालेली सूतगिरणी ही रोजगार निर्मितीची केंद्रे असली, तरीही सहकारी संस्थांनी बऱ्यापैकी कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. सुशिक्षित बेरोजगार वर्ग काजू प्रक्रिया व पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहे; परंतु ग्रामीण भागातील युवक आजही रोजगारासाठी पुणे-मुंबई यासारख्या महानगरांकडे आकर्षित होत आहे. त्यासाठी तालुक्यात मोठा रोजगार निर्मिती उद्योग सुरू होणे आवश्यक आहे.तालुक्यातील उचंगी व सर्फनाला प्रकल्पांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्याची गरज प्रकर्षाने पुढे येत आहे. उचंगी प्रकल्प मार्गी लागल्यास पूर्व भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात निघणार आहे. आजरा बसस्थानकाच्या नूतनीकरणाची केवळ चर्चाच आहे. निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य आहे.शेतकरी मंडळाकडून घनसाळ भाताच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र त्यावर अनेक मर्यादा येताना दिसतात. ऊस पीक वाढीसाठीही खास प्रयत्न होताना दिसत नाहीत, तर काजू बियांची बोंडे मातीमोल भावाने विकली जात आहेत.तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी बरेच कष्ट घेतले; मात्र स्थानिक नेतेमंडळींना याचे गांभीर्यच नसल्याने क्रीडा संकुलाचे पुढे काय झाले? हा प्रश्न आजही कायम आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय आजरा तालुक्यात आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषिपूरक, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सांगली यासारख्या शहरांशिवाय पर्याय राहिलेला नाही. स्थानिक शिक्षणाच्या सोयीसाठी स्व. अण्णा-भाऊशिवाय कोणीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तालुक्यातील रस्ते, व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पुलाची उभारणी, साळगाव बंधाऱ्याची उंची वाढविणे हे प्रश्न ‘जैसे-थे’ आहेत. जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला शेतकरी वर्ग वैतागला आहे. अनेक शासकीय कार्यालये, आरोग्य सेवा पुरविणारी केंद्रे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागा रिक्तच आहेत. बदललेल्या सरकारकडून तालुक्यातील प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आहे.शैक्षणिक प्रश्नआजरा तालुक्यात उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज.तालुक्यातील कृषिउद्योग पार्श्वभूमी पाहता महाविद्यालयात कृषिआधारित अभ्यासक्रमांची आवश्यकताआजरा शहरमहिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीआजरा-आंबोली मार्गाचे रुंदीकरण आवश्यकपाणीपुरवठा योजनेतील त्रुटी काढणे आवश्यकमटण, मच्छिमार्केटसह कत्तलखाना गावाबाहेर नेणे गरजेचेरोजगार निर्मितीमहाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या जागी विविध उद्योग उभारण्याची गरजकाजू प्रक्रिया उद्योगाबरोबरच काजू बोंड प्रक्रिया उद्योग प्राधान्याने सुरू करणे आवश्यकजंगली फळांवर वनौषधी निर्मिती करणारे उद्योग उभे करणे गरजेचेपर्यटनाचे प्रश्नरामतीर्थ परिसर विकासासाठी निधी गरजेचातालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती आवश्यकचित्री प्रकल्पस्थळी बगीचा उभारण्याची गरजकृषी पर्यटन स्थळांची आवश्यकता.