शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

राजकीय बेरजेसाठी ‘मनशे’ एकत्र

By admin | Updated: October 5, 2014 23:35 IST

महाडिक-नरके-शेट्टींच्यात गुफ्तगू : ‘दक्षिण’च्या बदल्यात शिरोळसह चंदगडमध्ये संघटनेला मदतीची अपेक्षा

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, कॉँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी राजाराम साखर कारखान्यावर गुफ्तगू झाले. राधानगरी, चंदगड व शिरोळ मतदारसंघांत महाडिक गटाने ‘स्वाभिमानी’ला पाठबळ द्यायचे, त्याबदल्यात ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘दक्षिण’मध्ये ताकदीने अमल महाडिक यांच्या पाठीशी राहील, असे ठरल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. ‘करवीर’मध्ये स्वाभिमानीने चंद्रदीप नरके यांना सहकार्य करण्याची विनंती अरुण नरके यांनी शेट्टी यांना केली. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढत असल्याने सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आहेत. मतदान दहा दिवसांवर आले तरी अजूनही मतदारांचा अंदाज लागत नसल्याने उमेदवार गोंधळात आहेत. आपल्या मतांच्या पॉकेटशिवाय विरोधकांच्या मतांवर डल्ला मारल्याशिवाय विजय सोपा नसल्याची जाणीव झाल्याने पडद्याआड बेरजेची गणिते मांडली जात आहेत. ही बैठक म्हणजे अशा गणितांची जोडणी होती. ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात पूर्वेकडील काही गावांत शेट्टी यांना मानणारा मतदार आहे. राज्यात शेट्टी हे भाजपसोबतच आहेत; परंतु संघटना या मतदारसंघात अजून प्रचारात कुठेच उतरलेली नाही. त्याचेही कारण आहे. लोकसभेला शेतकरी संघटनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या विनय कोरे यांना महाडिक भेटले होते. तसेच माजी आमदार सत्यजित पाटील यांना काँग्रेसकडे जोडून देण्यातही महाडिक यांनीच पुढाकार घेतल्याचा राग संघटनेला आहे. त्यामुळे युती असली तरी शेट्टी ‘दक्षिण’मध्ये ‘वचपा’ काढणार, हे उघड गुपित होते. ते लक्षात आल्यामुळेच महाडिक यांनी शेट्टी यांची मनधरणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने राजाराम कारखान्यावर महाडिक व शेट्टी यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. यामध्ये महाडिक यांनी ‘दक्षिण’मध्ये अमल यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याची विनंती केली. शेट्टी यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली, पण त्याबदल्यात शिरोळ, राधानगरी व चंदगड मतदारसंघात महाडिक यांनी ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांना मदत करावी, अशी अट घातली. दोन्ही नेत्यांनी मदतीची ग्वाही दिल्याचे समजते. ‘करवीर’मध्ये चंद्रदीप नरके यांना मदत करण्याची विनंती अरुण नरके यांनी शेट्टी यांना केली. या मतदारसंघात भाजप-‘स्वाभिमानी’ युतीचा उमेदवार रिंगणात असल्याने तसे करता येणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितल्याचे समजते.