शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

सामाजिक, शैक्षणिक मागासांना आरक्षण हवे

By admin | Updated: October 16, 2015 00:40 IST

अनिल वैद्य : धम्मक्रांती दिनानिमित्त व्याख्यान

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण हवे, अशी भूमिका घेतली. अजूनही मागासलेपण पूर्णपणे कमी झालेले नाही. त्यामुळे अनुसूचित व अन्य जातींना आरक्षण हवेच, असे ठाम मत निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांनी व्यक्त केले. धम्म संघातर्फे येथील शाहू स्मारकात आयोजित ५९ व्या धम्मक्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘भारतीय संविधान : बौद्ध आणि आरक्षण’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. धम्म संघाचे अध्यक्ष अशोक चोकाककर अध्यक्षस्थानी होते.वैद्य म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक आहेत. त्यांनी आरक्षण सुरू केल्यामुळे मागास घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोठी मदत झाली आहे. डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण मिळावे, असे सांगितले. त्यांनी फक्त विशिष्ट समाजालाच आरक्षण द्यावे, असे कोठेही म्हटलेले नाही. अलीकडे मागासवर्गीय, अनुसूचित जातींमधील काही स्वत:ला शहाणे समजणारे पांढरपेशी आरक्षण कशाला हवे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत; पण अजूनही समाजातील तुच्छतेची मानसिकता पूर्णपणे कमी झालेली नाही.बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांना राज्यात अनुसूचितांच्या सर्व सवलती मिळतात. मात्र, केंद्राच्या यादीत बौद्ध धर्माचा अनुसूचित जातीमध्ये समावेश नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून केंद्राच्या अनुसूचित जातींच्या यादीत बौद्ध धर्माचाही समावेश करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी लावून धरणे गरजेचे आहे. डी. एल. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. संपत कांबळे, सचिन कपूर, आदी उपस्थित होते. मंगेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संपत कांबळे यांनी आभार मानले. स्वतंत्र कायद्याला विरोधबौद्ध विवाह कायदा समितीचा मी सदस्य आहे. समितीच्या बैठकीत डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या हिंदू विवाह कायद्यातील कलम (२) मध्ये बौद्ध, शीख, जैन यांनाही कायदा लागू असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे बौद्धांसाठी वेगळा विवाह कायदा करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली, असेही वैद्य यांनी सांगितले.