शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक, शैक्षणिक मागासांना आरक्षण हवे

By admin | Updated: October 16, 2015 00:40 IST

अनिल वैद्य : धम्मक्रांती दिनानिमित्त व्याख्यान

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण हवे, अशी भूमिका घेतली. अजूनही मागासलेपण पूर्णपणे कमी झालेले नाही. त्यामुळे अनुसूचित व अन्य जातींना आरक्षण हवेच, असे ठाम मत निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांनी व्यक्त केले. धम्म संघातर्फे येथील शाहू स्मारकात आयोजित ५९ व्या धम्मक्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘भारतीय संविधान : बौद्ध आणि आरक्षण’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. धम्म संघाचे अध्यक्ष अशोक चोकाककर अध्यक्षस्थानी होते.वैद्य म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक आहेत. त्यांनी आरक्षण सुरू केल्यामुळे मागास घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोठी मदत झाली आहे. डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण मिळावे, असे सांगितले. त्यांनी फक्त विशिष्ट समाजालाच आरक्षण द्यावे, असे कोठेही म्हटलेले नाही. अलीकडे मागासवर्गीय, अनुसूचित जातींमधील काही स्वत:ला शहाणे समजणारे पांढरपेशी आरक्षण कशाला हवे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत; पण अजूनही समाजातील तुच्छतेची मानसिकता पूर्णपणे कमी झालेली नाही.बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांना राज्यात अनुसूचितांच्या सर्व सवलती मिळतात. मात्र, केंद्राच्या यादीत बौद्ध धर्माचा अनुसूचित जातीमध्ये समावेश नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून केंद्राच्या अनुसूचित जातींच्या यादीत बौद्ध धर्माचाही समावेश करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी लावून धरणे गरजेचे आहे. डी. एल. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. संपत कांबळे, सचिन कपूर, आदी उपस्थित होते. मंगेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संपत कांबळे यांनी आभार मानले. स्वतंत्र कायद्याला विरोधबौद्ध विवाह कायदा समितीचा मी सदस्य आहे. समितीच्या बैठकीत डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या हिंदू विवाह कायद्यातील कलम (२) मध्ये बौद्ध, शीख, जैन यांनाही कायदा लागू असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे बौद्धांसाठी वेगळा विवाह कायदा करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली, असेही वैद्य यांनी सांगितले.