शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘त्यांच्या’ बोटांनी हिरवाई नटली

By admin | Updated: December 9, 2014 00:29 IST

कृषी क्रांतीचे शिलेदार-- व्ही. एन. शिंदे

‘त्यांच्या’ बोटांनी हिरवाई नटलीकृषी क्रांतीचे शिलेदारमानवाच्या उत्क्रांतीपासूनची सर्वांत महत्त्वाची गरज होती, ती म्हणजे अन्न. निवाऱ्यासाठी कृत्रिम घरे उभी राहिली. पॉलिमरची वस्त्रे तयार होत आहेत. मात्र, कृत्रिमरीत्या शाकाहारी अन्ननिर्मितीचा उपाय अद्यापपर्यंत शोधला गेलेला नाही आणि भविष्यात याचा शोध लागेल, अशी शक्यताही कमी आहे. मानवाचा मूळ आहार हा शाकाहारच आहे, असे मानवाची शरीररचना अभ्यासणाऱ्या संशोधकांनीही सिद्ध केले आहे. सुरुवातीला लोकसंख्या कमी होती व मोठ्या प्रमाणात जंगले होती. तेव्हा फारसे कष्ट न करताही निसर्गत: वाढलेली फळे, अन्नधान्ये खाऊन जगणे मानवाला शक्य होते; पण लोकसंख्या वाढत गेली आणि जीवनपद्धतीही विकसित होत गेली. मानवाने बुद्धीच्या जोरावर जसजसा विकास केला तसतसे अनेक घटक कार्यरत झाले. मानवाचा विकास हा चौफेर होत होता; पण तो भौतिक सुखांच्या मागे लागून निसर्गाचा ऱ्हास करू लागला. निसर्गाचे संतुलन एकीकडे बिघडत होते, तर दुसरीकडे सिमेंटची जंगले निर्माण होत होती. वाढते आयुर्मान, घटलेला बालमृत्यू दर यांमुळे या प्रगतीसोबत लोकसंख्याही प्रचंड वेगाने वाढत होती आणि आजही काही देशांत वाढते औद्योगिकीकरण प्रदूषणाचे काम करू लागले आणि प्रदूषणपातळी संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक असणारे हिरवे आच्छादन नष्ट होऊ लागले. भूजल पातळी कमी होणे, पाणी प्रदूषित होणे, जलचरांवर त्यांचा अनिष्ट परिणाम या सर्व बाबी वृक्षांच्या संख्येत घट होत असताना दिसू लागल्या. अशा परिस्थितीचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी, वनराईला अबाधित राखण्यासाठी, अधिक उत्पादन देणारी शेती बनविण्यासाठी, पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी, तसेच मानवी जीवन अधिक सुखकारक करण्यासाठी झटणारे समाजसेवक, संशोधक ही खऱ्या अर्थाने देवमाणसेच म्हणावी लागतील. काळाच्या ओघात वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या कालखंडांत असे अनेक थोर शास्त्रज्ञ झाले, ज्यांनी मानवाची ही प्रथम गरज भागविण्यासाठी आपले आयुष्य वेचले. जेथे-जेथे त्यांची बोटे फिरली तेथील शिवार हिरवेगार झाले. अशा हिरव्या बोटांची आणि मनाची व्यक्तिमत्त्वे समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहोत. कार्व्हर यांच्यासारखं कदाचित त्यांच्याहून खडतर असं आयुष्ये लाभलेली ही व्यक्तिमत्त्वे त्या-त्या परिस्थितीत सर्वोच्च कार्य करीत राहिली. त्यांच्यामुळे अनेकदा अन्नामुळे होऊ घातलेली युद्धे टळली आणि मानवी समाज हा सुसंस्कृत राहिला. कार्ल लिनियससारख्या स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञाने १८व्या शतकात वनस्पतींच्या वर्गीकरणाची पद्धती विकसित केली, तर अलेक्झांडर फॉन हंबोल्ट यांनी वनस्पतीचे विश्व सादर केले. योहान मेंडेल यांनी अनुवंशशास्त्र विकसित करीत संकरित वाणाच्या शास्त्राची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींंना भावना असतात, हे सिद्ध केले. मसानोबू फुकुओका या जपानी संशोधकाने निसर्गशेतीचा पुरस्कार केलाय, तर नॉर्मन बरलॉग यांनी वैश्विक हरितक्रांती आणली. एम. एस. स्वामिनाथन यांनी भारतात हरितक्रांती घडविली. कृषिपूरक उद्योगातून दुग्ध व्यवसायाद्वारा वर्गीस कुरियन यांनी धवलक्रांती घडवून आणली. अशा अनेक व्यक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वावर आज विश्व शांततामय स्थितीत आहे, अशा महापुरुषांना स्मरण्याचा या लेखमालेचा प्रयत्न राहील. या सर्वांचे कर्तृत्व चार-पाचशे शब्दांत सांगणे कठीण आहे; पण त्यांचे स्मरण होणे तितकेच आवश्यक आहे. कारण, इतिहासाचे पान उलगडुनी चरित्र त्यांचे पाहा जरा, त्यांच्यासम आपण व्हावे, हाच सापडे बोध खरा!!- डॉ. व्ही. एन. शिंदेउपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.