शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हाळवणकर यांना बळ, इचलकरंजीत कमळ

By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST

लोकसभेसारखीच स्थिती

राजाराम पाटील / अतुल आंबी - इचलकरंजी --विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय, राष्ट्रवादी कॉँग्रेससह भाजप-शिवसेना यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी इचलकरंजीकरांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना बळ देत पुन्हा कमळ फुलविले. हाळवणकर व कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात लढत झाली. आमदार हाळवणकर यांना १५,२२५ चे मताधिक्य मिळाले, तर राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्यासह सर्वांनाच अनामत गमवावी लागली.राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये आज, रविवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली. चौदा टेबलांवर होणाऱ्या मतमोजणीसाठी १८ फेऱ्या होत्या, तर पोस्टल ३३४ मते दोन टेबलांवर मोजली गेली. सुरुवातीच्या फेरीपासूनच हाळवणकर यांनी मताधिक्य घेतले. पहिल्या १४ इलेक्ट्रॉनिक यंत्रांत १ ते १३ यंत्रे कोरोची गावाची व एक तारदाळमधील होते. या फेरीत हाळवणकर यांना ६०३७, आवाडेंना ३७०३ व कारंडेंना ६८६ मते मिळाली. मतमोजणीच्या फेऱ्या मोजल्या जात असताना सुरेश हाळवणकर यांचे मताधिक्य वाढत गेले.हाळवणकर यांना चंदूर वगळता ग्रामीण परिसरातील चार गावांत मताधिक्य मिळाले, तर शहापूर, नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ व ८, विक्रमनगर, प्रभाग क्रमांक २ व ९, तसेच गावभागातील अवधूत आखाडा, टाकवडे वेस, बौद्ध विहार, आंबी गल्ली, श्रीपादनगर, जुना चंदूर रोड परिसरात आवाडेंना, तर उर्वरित शहरात हाळवणकर यांना मताधिक्य मिळाले. राज्यात आघाडी फुटली आणि भाजप-शिवसेना युती तुटली आणि कॉँग्रेसचे प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, भाजपचे सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे मुरलीधर जाधव असे उमेदवार उभे राहिले. बहुरंगी लढतीत आवाडे, हाळवणकर यांच्या स्पर्धेत राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनीही आपले घोडे पुढे दामटले आणि रंगत निर्माण केली; पण मतमोजणीनंतर मात्र आवाडे-हाळवणकर अशीच एकास एक लढत झाली आणि आवाडे यांना हार पत्करावी लागली.पत्रकारांचे ठिय्या आंदोलनमतमोजणी होणाऱ्या राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना त्यांच्या कॅमेऱ्यासह प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी नकार दिल्याने सुमारे दीड तास पत्रकारांना ठिय्या आंदोलन करावे लागले. ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या बातम्यांचे वृत्त चित्रवाहिनीवर झळकू लागल्याने अखेर जिरंगे यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी छायाचित्रकार व पत्रकारांना प्रवेश दिला.‘नोटा’ची १५०५ मतेनिवडणुकीसाठी एकूण १ लाख ९९ हजार ९४९ मतदान झाले होते. त्यापैकी ४७.११ टक्के मते हाळवणकरांना, ३९.५ टक्के मतदान आवाडेंना, तर ७.५ टक्के कारंडे यांना मिळाली. तसेच, मतदानाचा (नोटा) हक्क ०.७५ टक्के मतदारांनी बजावला.पोस्टाच्या १५४मतपत्रिका अवैधपोस्टामार्फत ३३४ मतपत्रिका मिळाल्या. त्यापैकी फक्त १५० मतपत्रिका वैध ठरल्या. त्यामध्ये ७९ मते हाळवणकरांना, ४९ मते आवाडेंना व १२ मते अन्य उमेदवारांना मिळाली. विशेष म्हणजे १२०० मतपत्रिका पोस्टल मतदारांसाठी पाठविण्यात आल्या होत्या.लोकसभेसारखीच स्थितीनुकत्याच झालेल्या एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय कॉँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यात २० हजार मतांचा फरक होता. काहीसा कमी होत, तसाच फरक विधानसभा निवडणुकीतही आमदार हाळवणकर-प्रकाश आवाडेंमध्ये राहिला.कडक बंदोबस्त मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र व शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस निरीक्षक भीमानंद नलवडे, संजय साळुंखे, सतीश पवार यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुख मंजू थापा हे प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. चार दिवस स्ट्रॉँगरूममध्ये ठेवलेल्या मतपेट्यांची सुरक्षा व्यवस्था या दलाने पार पाडली.