शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

काळाचा क्षार म्हणून कथा टिकून राहील

By admin | Updated: February 18, 2015 23:44 IST

किरण गुरव यांचा विश्वास --थेट संवाद

‘गवर’, ‘नभ उतरू आलं’, ‘राखीव सावल्यांचा खेळ’ यासारख्या कथा कष्टकरी स्त्रियांच्या आत्मभानाबद्दल विधान करू पाहतात. या कथांचे लेखक किरण गुरव यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद... प्रश्न : समकालीन मराठी कथा नवे रूप धारण करत आहे. अशा काळात तुमच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या साऱ्याकडे कसे पाहता ? उत्तर : मराठी साहित्य जगतातल्या या उल्लेखनीय पुरस्कारामुळे मला थोडं सुख मिळालं परंतु कथा या साहित्य प्रकाराचा या सन्मानासाठी विचार होणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. समकालीन मराठी कथा नवं रूप धारण करतंय, हे फार आशादायक चित्र आहे. गेल्या कालखंडात कथा किंवा लघुकथा हा अगदी निकृष्ट दर्जाचा साहित्य प्रकार आहे, असे बोलले जात होते. गेल्या एक-दोन दशकांमध्ये समाजजीवनाला प्रयोगशाळेतल्या धगधगत्या दिव्यावर धरलेल्या काच नलिकेतील खदखदणाऱ्या द्रावणाचं रूप आलेलं आहे. त्यातील पांचट यथावकाश वाफ होऊन हवेत विरून जाईल. सर्वांतून तावून-सुलाखून निघालेली गंभीर कथा या काळाचा क्षार म्हणून टिकून राहील, असा मला विश्वास वाटतो.प्रश्न : भूमी परिसराची एक अनाम ओढ तुमच्या कथांमध्ये आहे. ‘राखीव सावल्यांचा खेळ’ हा संग्रह तुम्ही आजीस व कपिलेश्वर गावास अर्पण केला आहे. तुमच्या घडणीवर या परिसराचा कोणता परिणाम झाला?प्रश्न : बालपणीचा माझा बराचसा काळ कपिलेश्वर या छोट्याशा गावात आजोळी गेला. पुढं शिक्षणासाठी कोल्हापूर मग नोकरीला पुणे, गारगोटी परत कोल्हापूर अशी छोटीशी गरगर माझ्या आजपर्यंतच्या काळात आहे. लहान असताना सलग काही वर्षे आजोळी राहिल्याने आजी-आजोबांचा आणि वातावरणाचा, परिसराचाही माझ्यावर सखोल ठसा उमटलेला आहे. माझे आजी-आजोबा खूप प्रामाणिक, कष्टाळू आणि नेकदिल माणसं होती म्हणून ‘राखीव सावल्यांचा खेळ’ हा कथासंग्रह मी माझ्या आजीस व कपिलेश्वर या गावाला अर्पण केला आहे.प्रश्न : मराठी ग्रामीण कथाकार आणि पूर्वसुरीतील लेखनपरंपरेतून कोणते प्रभावस्रोत तुमच्यापर्यंत आले आहेत? उत्तर : मराठी ग्रामीण कथेकडून किंवा एकंदरित साहित्याकडून लिहिण्यासाठी आणि जगण्यासाठी मला भरपूर काही मिळाले आहे. चारूता सागर, सखा कलाल, माडगूळकर, पूर्वसूरीच्या कथाकारांनी माझ्यात हे भान निर्माण केलं आहे. याशिवाय भाऊ पाध्ये, मेघना पेठे यांच्या ‘नागर’ कथेनेही महानगर जीवनातील ताण-तणाव, पेच, प्रासंगिकता, भरगर्दीतला एकटेपणा यांच्याशी मला परिचित केलं आहे पण ‘ढव्ह’ आणि ‘लख्ख ऊन’, ‘रिवणावायली मुंगी’, ‘तिच्या वळणाची गोष्ट’ या राजन गवस यांच्या कथा या अर्धनागर समूहाच्या घडणीचा कथारूप उद्गार आहे असं मला वाटतं. समकाळाचं भान आणि आपल्या आजूबाजूच्या जीवनव्यवस्थेकडे बघण्याची एक नवी दृष्टी या कथांनी मला दिली आहे.प्रश्न : अर्धनागर तालुकावजा गावाचा नव्या काळात वेगात घडणारे बदल तुम्ही संवेदनशीलतेने टिपलेले आहेत. याकडे तुम्ही कसे पाहता? उत्तर : खेड्यात अमूक गल्ली, तमूक जातीचा वाडा हे टिकून असलं तरी आर्थिकदृष्टीने थोड्या सक्षम असलेले लोक त्याबाहेर पडले आहेत. हा बदल सकारात्मक आहेत. काही मर्यादेपर्यंत विज्ञान मानवी आयुष्य सुकर, सुरक्षित, स्वस्थ करतं ही गोष्ट खरी आहे तरीही बेकार आणि हताश तरुणांचे जथ्थे गावोगावी वाढतच आहेत. श्रीलिपी या कथासंग्रहात गावोगावी उपजिविकेसाठी वणवण करणाऱ्या अशा तरुणांचं प्रातिनिधीक चित्रण आहे.प्रश्न : स्त्री चित्रणात तुमच्या कथेत एकाचवेळी शिवारातील व माजघरातले जग प्रभावीपणे आलेले आहे. ते कसे?उत्तर : स्त्री-पुरुष विषमता खेड्या-पाड्यांमध्ये आपला प्रभाव टिकवून आहे. खेड्यातल्या स्त्रियांना थोडं आत्मभान होणं गरजेचे आहे. कारण आजही कुटुंबव्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेत तिचं स्थान शून्य असते. ‘गवर’, ‘नभ उतरू आलं’, ‘राखीव सावल्यांचा खेळ’ यासारख्या कथा या कष्टकरी स्त्रियांच्या आत्मभानाबद्दल कदाचित काही एक विधान करू पाहतात. मी ज्या पद्धतीचे स्त्री जीवन लहानपणांपासून पाहत आलेलो आहे त्याचीच ही रूपे आहेत.प्रश्न : सध्या कोणत्या प्रकारच्या लेखनामध्ये गुंतलेला आहात ?उत्तर : याचं होय किंवा नाही किंवा असंच काहीतरी उत्तर देणे हे खरं तांत्रिक स्वरूपाचे आहे असं मला वाटतं. कारण दररोजच्या जगण्यात गुप्त पोलिसासारखा आपल्यातला लेखक आपल्याला जाणवतो आणि त्याच्या नेहमी काहीतरी लिहित असतो. खरंतर लेखकाचं अवघं आयुष्य हीच एक लेखनपूरक बाब आहे की काय, असाही विनोदी संशय मला अधून-मधून येतो.- रणधीर शिंदे