शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सत्तर प्रभागांचे गुरुवारी नव्याने आरक्षण

By admin | Updated: August 4, 2015 00:53 IST

निवडणूक आयोगाचे आदेश : महापालिकेला फटकारले, चुकीची पद्धत अवलंबिल्याचा परिणाम; इच्छुकांची मनसुबे उधळले

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरक्षण सोडत न काढता अतिउत्साही अधिकाऱ्यांनी आपली अक्कल पाजळल्याने त्याचा फटका महानगरपालिक ा प्रशासनाला सोमवारी बसला. चुकीची आरक्षण सोडत काढणाऱ्या महापालिका प्रशासनाला फटकारताना ही चूक सुधारण्यासाठी ६ आॅगस्टला नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे महापालिकेच्या ८१ पैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील अकरा प्रभाग सोडून उर्वरित ७० प्रभागांतील आरक्षण सोडत पद्धतीने नव्याने काढण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता बहुउद्देशीय हॉल येथे ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या प्रकारामुळे गोंधळ उडाला असून मनपा प्रशासनही हादरून गेले आहे. शिवसेनेने हा तर भाजपचाच कुटिल डाव असून त्याविरोधात बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेला दणका आणि पाठोपाठ नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा मनपा प्रशासनाचा निर्णय जाहीर होताच शहरात खळबळ उडाली. वाऱ्यासारखी ही वार्ता शहरभर पसरताच इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले. महापालिकेने राबविलेल्या  चुकीच्या पद्धतीमुळे तीव्र नाराजीही पसरली. चुकीची पद्धत अवलंबिल्यामुळे मनपा प्रशासनावर मोठी नामुष्की ओढावली आहे. आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने ३१ जुलैला सकाळी जाहीरपणे आरक्षणाची सोडत काढली होती. प्रथम अनुसूचित जातीसाठीचे ११ प्रभाग जाहीर करण्यात आले. त्यानंतर ‘नागरिकांचा मागासवर्ग’ या प्रवर्गासाठी एकदम २२ प्रभाग आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. नेमकी याच ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांनी चूक केली. अनुसूचित जातीचे अकरा प्रभाग निश्चित केल्यानंतर राहिलेल्या ७० प्रभागांतून नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित होणाऱ्या २२ पैकी आधी ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ११ प्रभाग निश्चित केले जावेत, असा राज्य आयोगाचे निर्देश होते, पण ही पद्धत आरक्षण सोडत काढताना प्रत्यक्षात राबविली नाही. पालिकेतर्फे राज्य निवडणूक आयोगाला आरक्षण सोडतीची माहिती पाठविण्यात आली तेव्हा ही चूक आयोगाच्या लक्षात आली. याबाबत आयोगाने महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले आणि पुन्हा एकदा आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाचे अवर सचिव एन. जे. वागळे यांचे पत्र आजच महापालिकेला प्राप्त झाले, त्यामुळे ६ आॅगस्टला नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येत असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. चुकीची आरक्षण सोडत राबविण्याच्या प्रकाराला जबाबदार कोण, असा सवाल केला असता केला असता ही जबाबदारी प्रशासनाची असल्याचे आयुक्तांनी मान्य केले. याबाबत कोणावर कारवाई करणार का या प्रश्नाचे उत्तर न देताच त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. शहरात खळबळ; विश्वासार्हतेचा प्रश्न ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांमध्ये खळबळ उडाली. चुकीची पद्धत राबविली गेल्यामुळे आता एकूणच विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागाची रचनाही चुकीची झाली असल्याची उघड तक्रार आता होऊ लागली आहे. एकू णच मनपा निवडणुकीसाठीचे प्रभाग आणि त्यावरील आरक्षण हे विश्वासार्हतेच्या वादाच्या अडकले आहेत. काहीजण याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत असून आरक्षण प्रक्रियेस तसेच प्रभाग निश्चितीस काही हरकत घेता येईल का, याबाबत मार्गदर्शन घेतले जात आहे. नामुष्की...अगोदरच कोल्हापूर महापालिकेचे कोणतेही काम म्हणजे वादाशिवाय सुरू होत नाही. त्यात निवडणुकीच्या कामांबाबत लोक व राजकीय कार्यकर्तेही अधिक संवेदनशील असतात, परंतु त्यातील पायाभूत कामातच चूक झाल्याने महापालिकेच्या कारभाराबद्दल सर्वसामान्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. निवडणुकीचे आरक्षण थेट नव्याने टाकण्याची कोल्हापूरच्याच नव्हे तर राज्यभरातील महापालिकेच्या इतिहासातील ही पहिली घटना असावी.इच्छुकांच्या आशेवर पाणी...प्रभाग रचना झाली. आरक्षण निश्चित झाल्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. रविकिरण इंगवले यांनी रविवारीच शिंदे लॉनमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ केला. महेश सावंत यांचा राजलक्ष्मीनगर प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी त्याचा दाखला काढण्यासाठी तयारी सुरू केली होती. इच्छुक जोरात कामाला लागले होते. त्यांच्या आनंदावर सायंकाळनंतर विरजण पडले. याउलट ज्यांची आरक्षणामध्ये संधी हुकली होती त्यांना आता नव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. मधुकर रामाणेसारखे नगरसेवक आरक्षण बदलणार म्हणून खूश होते.