शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
12
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
13
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
14
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
15
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
16
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
17
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
18
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
19
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
20
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 

सत्तर प्रभागांचे गुरुवारी नव्याने आरक्षण

By admin | Updated: August 4, 2015 00:53 IST

निवडणूक आयोगाचे आदेश : महापालिकेला फटकारले, चुकीची पद्धत अवलंबिल्याचा परिणाम; इच्छुकांची मनसुबे उधळले

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरक्षण सोडत न काढता अतिउत्साही अधिकाऱ्यांनी आपली अक्कल पाजळल्याने त्याचा फटका महानगरपालिक ा प्रशासनाला सोमवारी बसला. चुकीची आरक्षण सोडत काढणाऱ्या महापालिका प्रशासनाला फटकारताना ही चूक सुधारण्यासाठी ६ आॅगस्टला नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे महापालिकेच्या ८१ पैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील अकरा प्रभाग सोडून उर्वरित ७० प्रभागांतील आरक्षण सोडत पद्धतीने नव्याने काढण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता बहुउद्देशीय हॉल येथे ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या प्रकारामुळे गोंधळ उडाला असून मनपा प्रशासनही हादरून गेले आहे. शिवसेनेने हा तर भाजपचाच कुटिल डाव असून त्याविरोधात बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेला दणका आणि पाठोपाठ नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा मनपा प्रशासनाचा निर्णय जाहीर होताच शहरात खळबळ उडाली. वाऱ्यासारखी ही वार्ता शहरभर पसरताच इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले. महापालिकेने राबविलेल्या  चुकीच्या पद्धतीमुळे तीव्र नाराजीही पसरली. चुकीची पद्धत अवलंबिल्यामुळे मनपा प्रशासनावर मोठी नामुष्की ओढावली आहे. आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने ३१ जुलैला सकाळी जाहीरपणे आरक्षणाची सोडत काढली होती. प्रथम अनुसूचित जातीसाठीचे ११ प्रभाग जाहीर करण्यात आले. त्यानंतर ‘नागरिकांचा मागासवर्ग’ या प्रवर्गासाठी एकदम २२ प्रभाग आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. नेमकी याच ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांनी चूक केली. अनुसूचित जातीचे अकरा प्रभाग निश्चित केल्यानंतर राहिलेल्या ७० प्रभागांतून नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित होणाऱ्या २२ पैकी आधी ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ११ प्रभाग निश्चित केले जावेत, असा राज्य आयोगाचे निर्देश होते, पण ही पद्धत आरक्षण सोडत काढताना प्रत्यक्षात राबविली नाही. पालिकेतर्फे राज्य निवडणूक आयोगाला आरक्षण सोडतीची माहिती पाठविण्यात आली तेव्हा ही चूक आयोगाच्या लक्षात आली. याबाबत आयोगाने महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले आणि पुन्हा एकदा आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाचे अवर सचिव एन. जे. वागळे यांचे पत्र आजच महापालिकेला प्राप्त झाले, त्यामुळे ६ आॅगस्टला नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येत असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. चुकीची आरक्षण सोडत राबविण्याच्या प्रकाराला जबाबदार कोण, असा सवाल केला असता केला असता ही जबाबदारी प्रशासनाची असल्याचे आयुक्तांनी मान्य केले. याबाबत कोणावर कारवाई करणार का या प्रश्नाचे उत्तर न देताच त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. शहरात खळबळ; विश्वासार्हतेचा प्रश्न ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांमध्ये खळबळ उडाली. चुकीची पद्धत राबविली गेल्यामुळे आता एकूणच विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागाची रचनाही चुकीची झाली असल्याची उघड तक्रार आता होऊ लागली आहे. एकू णच मनपा निवडणुकीसाठीचे प्रभाग आणि त्यावरील आरक्षण हे विश्वासार्हतेच्या वादाच्या अडकले आहेत. काहीजण याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत असून आरक्षण प्रक्रियेस तसेच प्रभाग निश्चितीस काही हरकत घेता येईल का, याबाबत मार्गदर्शन घेतले जात आहे. नामुष्की...अगोदरच कोल्हापूर महापालिकेचे कोणतेही काम म्हणजे वादाशिवाय सुरू होत नाही. त्यात निवडणुकीच्या कामांबाबत लोक व राजकीय कार्यकर्तेही अधिक संवेदनशील असतात, परंतु त्यातील पायाभूत कामातच चूक झाल्याने महापालिकेच्या कारभाराबद्दल सर्वसामान्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. निवडणुकीचे आरक्षण थेट नव्याने टाकण्याची कोल्हापूरच्याच नव्हे तर राज्यभरातील महापालिकेच्या इतिहासातील ही पहिली घटना असावी.इच्छुकांच्या आशेवर पाणी...प्रभाग रचना झाली. आरक्षण निश्चित झाल्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. रविकिरण इंगवले यांनी रविवारीच शिंदे लॉनमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ केला. महेश सावंत यांचा राजलक्ष्मीनगर प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी त्याचा दाखला काढण्यासाठी तयारी सुरू केली होती. इच्छुक जोरात कामाला लागले होते. त्यांच्या आनंदावर सायंकाळनंतर विरजण पडले. याउलट ज्यांची आरक्षणामध्ये संधी हुकली होती त्यांना आता नव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. मधुकर रामाणेसारखे नगरसेवक आरक्षण बदलणार म्हणून खूश होते.