शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

भगदाडाची मालिका सुरूच

By admin | Updated: January 21, 2015 00:10 IST

रंकाळ्याची अखेरची घटका : वर्षात तिसऱ्यांदा संरक्षक भिंत कोसळली

कोल्हापूर : प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आपल्या अखेरच्या घटका मोजत असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील तटबंदीला काल, सोमवारी मध्यरात्री पुन्हा एक भगदाड पडले. वर्षभरात तिसऱ्यांदा भगदाड पडण्याचा प्रकार घडला. मात्र, महापालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने रंकाळाप्रेमींत संतापाची लाट पसरली असून हिंदू युवा प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.दिवसेंदिवस रंकाळ्याची तटबंदी धोकादायक बनत असताना महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. निखळणारे दगड काढणे, पडलेल्या तटबंदीची दुरुस्ती करणे, नारळ्याच्या फांद्यांपासून बचाव करण्यासाठी चर मारून आरसीसी भिंत उभारण्याच्या फक्त वल्गनाच लोकप्रतिनिधींकडून सुरु आहेत. प्रत्यक्षात कृती शून्य असल्याने प्रदूषणासह पायाभूत सुविधांच्या दुर्लक्षामुळे रंकाळ्याच्या मरणकळा वाढतच आहेत. आठ महिन्यांपूर्वी रंकाळ्याच्या कोसळलेल्या तटबंदीचे काम पैशांअभावी रेंगाळले. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांत पुन्हा तब्बल ४० फुटांपेक्षा अधिक तटबंदी कोसळली. ढासळणाऱ्या तटबंदीवर कायमचा उपाय काढण्यासाठी महापालिकेत स्थायी समिती व महासभेत फक्त चर्चा झाल्या. प्रत्यक्षात एक रुपयाचीही अद्याप तरतूद झालेली नाही. यामुळे अगोदरच मरणासन्न झालेल्या रंकाळ्याची तटबंदीही नाहीसी होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिमेकडे दुरुस्ती सुरू असलेल्या तटबंदी शेजारील मोठा भाग पाण्यात कोसळला. त्यामुळे आता पांढऱ्या घाटापर्यंत तटबंदीचे दगड कोसळण्याची दाट आहे. प्रदूषित पाणी तसेच तटबंदीजवळ असलेल्या नारळाची झाडे व भुसभुशीत जमीन यामुळेच संपूर्ण तटबंदी धोकादायक बनली आहे. उद्यानाकडील बाजूने तटबंदीचा भाग दीड ते दोन फुटांनी खचू लागला आहे. अनेक ठिकाणी तटबंदीही वेडी-वाकडी झाली आहे. एकमेकांपासून सुटत असलेले दगड काढून तटबंदी भक्कम करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, महापालिका प्रशासन व पदाधिकारी फक्त गप्पा व घोेषणाबाजीत रंगले आहेत.प्रदूषणाचा धोकारंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. गेली साडेचार वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन पूर्ण होऊनही सांडपाणी पूर्ण क्षमतेने वहन होत नाही. परिणामी मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळेच रंकाळ्याचे दुखणे वाढत आहे. दूषित पाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तेलकट तवंग साचला आहे. सांडपाण्याचे दुखणेशाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले. पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. आता मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे केंदाळाचे दुखणे पुन्हा वर काढत आहे.उपोषणाचा इशारातटबंदीचा मोठा भाग कोसळून चोवीस तास उलटले तरी महापालिका प्रशासनातील एकाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीने त्याची दाद घेतलेली नाही. महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास १ फेबु्रवारीपासून ‘बेमुदत उपोेषण’ करणार असल्याचा इशारा हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी दिला आहे.निव्वळ फार्सरंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळ्यासाठी’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे.उपायांची गरज ढासळलेल्या तटबंदीची बांधणी करणे तसेच मजबुतीकरणझाडांच्या मुळापासून असणारा धोका कमी करणे. संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.