शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

क्रांतिदिनापासून ‘आयआरबी चले जाव’

By admin | Updated: July 27, 2014 01:04 IST

टोलप्रश्न; धरणे धरणार; आमरण उपोषण; जलसमाधी घेण्याचा इशारा

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याच्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारने ८ आॅगस्टपर्यंत करावी अन्यथा क्रांतिदिनापासून ‘आयआरबी चले जाव’चा नारा देत आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, असा इशारा देतानाच ९ आॅगस्ट रोजी भवानी मंडपात एक दिवसाचे धरणे धरण्याचा निर्णय आज सायंकाळी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आचारसंहिता लागण्यापूर्वी टोल रद्द झाला नाही तर निवडणुकीत विरोध करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. कृती समितीच्या सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर अध्यक्ष निवासराव साळोखे यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. ८ आॅगस्टपर्यंत टोल रद्द करण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोल्हापुरातील नव्या क्रांतीची लढाई सुरू होईल. ९ आॅगस्ट रोजी सागरमाळ येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून कृती समितीचे सर्व कार्यकर्ते मोर्चाने भवानी मंडपात येतील आणि दिवसभर धरणे धरतील. त्यानंतर १५ आॅगस्ट रोजी जनतेच्या वतीने गांधी मैदानावर ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शासकीय ध्वजारोहण समारंभाऐवजी जनतेने गांधी मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन साळोखे यांनी केले आहे. मूल्यांकन समितीचे काम लांबत जाईल आणि आचारसंहितेची तारीख जवळ येईल तशी टोलविरोधी आंदोलकांत तीव्र नाराजी निर्माण होऊ लागली आहे. आजच्या बैठकीत अनेकांनी सरकारबद्दल आणि मंत्र्यांबद्दल संताप व्यक्त केला. एवढेच नाही तर कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत आता त्यांच्या दारात न जाण्याचा निर्णय घेतला गेला. बैठकीत पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची इच्छा काही कार्र्यकर्त्यांनी व्यक्त केली. परंतु उपोषण न करता ‘आयआरबी चले जाव’चाच लढा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. बाबा इंदुलकर, अनिल घाटगे, दिलीप देसाई यांनी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री जनतेच्या बाजूने राहणार नसतील तर त्यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घ्या अशी सूचना इंदूलकर यांनी केली. एकदा आमरण उपोषण सुरु केल्यावर कोणाही नेत्याचे ऐकून घेणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला. प्रसाद जाधव यांनी आम्ही काही कार्यकर्ते जलसमाधी घेण्यास तयार असल्याचे जाहीर केले. यावेळी लालासाहेब गायकवाड, पंडितराव सडोलीकर यांनीही मते मांडली. (प्रतिनिधी)