शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

शिक्षकांचे प्रशासकीय पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : शिक्षकांनी एकत्रित येऊन मूळ पाच प्रश्न द्यावेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू. जे प्रश्न प्रशासकीय पातळीवर अडकले ...

कोल्हापूर : शिक्षकांनी एकत्रित येऊन मूळ पाच प्रश्न द्यावेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू. जे प्रश्न प्रशासकीय पातळीवर अडकले आहेत, ते प्राधान्याने मार्गी लावू, अशी ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. महाराष्ट्र गुणवत्तेत अव्वल यावे, ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी असून, उद्याच्या महाराष्ट्रात हजारो डिसले गुरुजींसारखे जागतिक दर्जाचे शिक्षक निर्माण व्हावेत, असे दर्जेदार शिक्षण द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय परिषद शनिवारी कोल्हापुरात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील होते.

मंत्री गायकवाड म्हणाले, ‘प्राथमिक शाळांतील रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने सहा हजार शिक्षक भरतीसाठी मंजुरी घेतली आहे. महापालिका शिक्षकांसह इतर प्रश्नांबाबत उद्या, सोमवारी नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक आहे. पदोन्नतीसह इतर मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करू, तुम्ही मात्र गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील रहा.’

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘कोकणातून १६०० शिक्षक इतर जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र तिथे शिक्षक भरल्याशिवाय हे करता येत नाही. शिक्षकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच; मात्र काळानुरूप त्यांनी बदलले पाहिजे. कोरोनाने आपणांस खूप शिकवले असून, आता डिजिटल शिक्षणाकडे वळले पाहिजे. आगामी काळात गोरगरीब विद्यार्थ्यांना मोबाइल देऊन त्यांनाही या प्रवाहात आणले पाहिजे, नाविन्यपूर्ण योजनेतून तालुक्यातील दहा शाळा डिजिटल करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घ्यावा.’ पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘गावात झालेल्या फौजदारी गुन्ह्यात शिक्षकांची साक्ष घेतली जाते, याबाबत लवकरच बैठक घेऊन शिक्षकांना वगळण्याबाबत निर्णय घेऊ.’ संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी प्रास्ताविकात मागण्या मांडल्या. सरचिटणीस केशवराव जाधव यांनी स्वागत केले. संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांनी आभार मानले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, भैया माने, राहूल माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या बदल्यांबाबत माझ्याकडे उत्तर नाही

पती-पत्नी सोयीची बदली, आई-वडील आजारी, हवामान मानवत नाही म्हणून बदल्या करण्याचा आग्रह शिक्षकांचा असतो. गेल्या दहा महिन्यात शिक्षकांच्या बदल्यांबाबत मलाच उत्तर सापडलेले नाही. सर्व संघटनांनी एकत्रित यावे आणि बदल्यांचा अध्यादेश काढावा, आपण डोळे झाकून सही करतो, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.