शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

शिक्षकांचे प्रशासकीय पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : शिक्षकांनी एकत्रित येऊन मूळ पाच प्रश्न द्यावेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू. जे प्रश्न प्रशासकीय पातळीवर अडकले ...

कोल्हापूर : शिक्षकांनी एकत्रित येऊन मूळ पाच प्रश्न द्यावेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू. जे प्रश्न प्रशासकीय पातळीवर अडकले आहेत, ते प्राधान्याने मार्गी लावू, अशी ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. महाराष्ट्र गुणवत्तेत अव्वल यावे, ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी असून, उद्याच्या महाराष्ट्रात हजारो डिसले गुरुजींसारखे जागतिक दर्जाचे शिक्षक निर्माण व्हावेत, असे दर्जेदार शिक्षण द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय परिषद शनिवारी कोल्हापुरात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील होते.

मंत्री गायकवाड म्हणाले, ‘प्राथमिक शाळांतील रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने सहा हजार शिक्षक भरतीसाठी मंजुरी घेतली आहे. महापालिका शिक्षकांसह इतर प्रश्नांबाबत उद्या, सोमवारी नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक आहे. पदोन्नतीसह इतर मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करू, तुम्ही मात्र गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील रहा.’

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘कोकणातून १६०० शिक्षक इतर जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र तिथे शिक्षक भरल्याशिवाय हे करता येत नाही. शिक्षकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच; मात्र काळानुरूप त्यांनी बदलले पाहिजे. कोरोनाने आपणांस खूप शिकवले असून, आता डिजिटल शिक्षणाकडे वळले पाहिजे. आगामी काळात गोरगरीब विद्यार्थ्यांना मोबाइल देऊन त्यांनाही या प्रवाहात आणले पाहिजे, नाविन्यपूर्ण योजनेतून तालुक्यातील दहा शाळा डिजिटल करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घ्यावा.’ पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘गावात झालेल्या फौजदारी गुन्ह्यात शिक्षकांची साक्ष घेतली जाते, याबाबत लवकरच बैठक घेऊन शिक्षकांना वगळण्याबाबत निर्णय घेऊ.’ संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी प्रास्ताविकात मागण्या मांडल्या. सरचिटणीस केशवराव जाधव यांनी स्वागत केले. संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांनी आभार मानले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, भैया माने, राहूल माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या बदल्यांबाबत माझ्याकडे उत्तर नाही

पती-पत्नी सोयीची बदली, आई-वडील आजारी, हवामान मानवत नाही म्हणून बदल्या करण्याचा आग्रह शिक्षकांचा असतो. गेल्या दहा महिन्यात शिक्षकांच्या बदल्यांबाबत मलाच उत्तर सापडलेले नाही. सर्व संघटनांनी एकत्रित यावे आणि बदल्यांचा अध्यादेश काढावा, आपण डोळे झाकून सही करतो, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.