शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

कामगार कायद्यातील बदलांना विरोध

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

प्रांत कार्यालयावर मोर्चा : इचलकरंजीत कामगार संघटना कृती समितीचे आंदोलन

इचलकरंजी : भाजप सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी कामगार कायद्यांमध्ये कामगार हिताविरोधी बदल करीत आहे. त्यास देशातील विविध कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर येथील कामगार संघटना कृती समितीच्यावतीने मोर्चा काढून प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी निदर्शने करून सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.निवेदनामध्ये, सरकारने सुरू केलेले बदल कामगारविरोधी असून, यामुळे कामगार संघटना मोडीत निघण्याची शक्यता आहे. यामध्ये तीनशेपेक्षा कमी कामगार असणाऱ्या कारखानदाराला शासनाच्या परवानगीशिवाय कारखाना बंद करण्याचे स्वातंत्र्य, विविध कामगार संघटनांमध्ये कामगार संख्येच्या तीस टक्के सदस्य आवश्यक, दहा कामगारांना लागणारा फॅक्टरी अ‍ॅक्ट दुप्पट करून वीस कामगार करण्यात येणार, ५० पर्यंत कंत्राटी कामगार कामावर ठेवण्यास परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच महिला कामगारांसाठी बदल, असे अनेक नवीन नियम या कामगार कायद्यात सूचविण्यात येत आहेत. त्यामुळे याला सर्व कामगार संघटनांनी विरोध दर्शविला असून, सरकारने याबाबत विचार करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.शाहू पुतळ्यापासून मोर्चाची सुरूवात झाली. मुख्य मार्गांवरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. याठिकाणी निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. मोर्चात दत्ता माने, सदा मलाबादे, शामराव कुलकर्णी, आनंदा गुरव, धोंडिबा कुंभार, ए. बी. पाटील, आदींसह अकरा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)