शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

यंत्रमाग धारकांना ५० कोटींचा परतावा

By admin | Updated: March 22, 2016 01:04 IST

‘महावितरण’ला चपराक : चुकीच्या पध्दतीने इंधन अधिभाराची आकारणी - गुड न्यूज

विटा : राज्यातील यंत्रमाग धारकांकडून वसुली केलेली इंधन अधिभाराची सर्व रक्कम यंत्रमागधारक उद्योजकांना परत करण्याचा आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणला दिला आहे. या आदेशामुळे राज्यातील १० लाख यंत्रमाग धारकांना सुमारे ५० कोटी रूपयांची रक्कम परत मिळणार असून यंत्रमागधारक संघटनांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे यंत्रमागधारक उद्योजकांमध्ये ‘फिलगुड’चे वातावरण पसरले आहे.राज्यातील यंत्रमाग धारकांच्या वीज बिलात चुकीच्या पध्दतीने अन्यायकारक प्रति युनिट ४० पैशाप्रमाणे इंधन अधिभाराची आकारणी करून यंत्रमाग धारकांकडून बिलाची अन्यायकारक वसुली केल्याचा फटका महावितरण कंपनीला बसला आहे. महावितरणने नोव्हेंबर २०१५ ते मार्च २०१६ या पाच महिन्यात इतर उद्योगांच्या तुलनेत यंत्रमाग लघुउद्योजकांच्या वीज बिलात प्रति युनिटला जवळपास ४० पैसे जादा इंधन अधिभाराची आकारणी करून यंत्रमाग धारकांवर महावितरणने अन्याय केला होता. याबाबत यंत्रमाग धारकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. याप्रश्नी विटा, इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी यासह राज्यातील सर्व यंत्रमाग संघटना व राज्य वीज ग्राहक संघटनेने अनेकवेळा महावितरण, ऊर्जामंत्र्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीची दखल ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी घेत, मंत्रालयात अधिकारी व यंत्रमाग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.या बैठकीत वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे व इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी, चुकीच्या पध्दतीने झालेल्या इंधन अधिभाराची माहिती पुराव्यासह ऊर्जामंत्र्यांसमोर मांडली. याबाबत मंत्र्यांनी विचारणा केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली. त्यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही झालेली चुकीची आकारणी महावितरणने येणाऱ्या वीज बिलात कमी करून द्यावी, असे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे राज्यातील १० लाख यंत्रमाग धारकांना सुमारे ५० कोटी रूपयांचा परतावा मिळणार असल्याने यंत्रमाग धारकांनी केलेल्या संघर्षाचे फलित मिळाले असल्याची प्रतिक्रिया यंत्रमागधारक लघुउद्योजकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांच्या या आदेशामुळे विटा शहरातील ७ हजाराहून अधिक यंत्रमाग धारकांना सुमारे ४० लाख रूपयांचा परतावा मिळणार आहे. (वार्ताहर)महावितरणने यंत्रमाग धारकांवर अन्यायकारक इंधन अधिभाराची आकारणी करून यंत्रमाग धारकांवर अन्याय केला होता. परिणामी, यंत्रमाग लघुउद्योगच अडचणीत सापडला गेला. त्यामुळे ही आकारणी अन्यायकारक व चुकीची असल्याची तक्रार महावितरणने केली होती. परंतु, त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे यंत्रमागधारक संघटना व वीज ग्राहक संघटनांना संघर्ष करावा लागला. याबाबत दि. १६ मार्चला सायंकाळी मुंबईत ऊर्जामंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणल्याने, ऊर्जामंत्र्यांनी राज्यातील यंत्रमाग धारकांकडून वसूल केलेली ५० कोटी रूपये अतिरिक्त रक्कम परत करावी, असे आदेश दिले. यंत्रमागधारक व वीज ग्राहक संघटनांनी वेळोवेळी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून ही रक्कम आगामी बिलातून वजा होणार आहे.- किरण तारळेकर, विटासचिव, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना, मुंबईअन्यायी आकारणी : ऊर्जामंत्र्यांकडून दखलइंधन अधिभाराची आकारणी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने निश्चित करून दिलेल्या सूत्रानुसार त्या त्या प्रकारच्या वीज ग्राहकांच्या वर्गवारीनुसार लागू असलेल्या वीज शुल्काच्या प्रमाणात करावी लागते. असे असताना महावितरणने मनमानी करून यंत्रमागधारक वीज ग्राहकांवर इतर औद्योगिक वीज ग्राहकांपेक्षा सुमारे सरासरी ४० पैसे प्रति युनिटला जादा आकारणी करून यंत्रमाग धारकांवर अन्याय केला होता. ऊर्जामंत्र्यांच्या या आदेशाने महावितरणला चांगलीच चपराक बसली आहे.