शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

रेशन लिंकिंगचा सावळागोंधळ सुरूच

By admin | Updated: February 13, 2015 23:01 IST

प्रशासनाची गांधारीची भूमिका : आधार कार्डसाठी महिला नागरिकांची पिळवणूक

अतुल आंबी - इचलकरंजी -शिधापत्रिकेला आधार कार्ड व बॅँक खाते संलग्न करण्याच्या योजनेमध्ये इचलकरंजी शहर परिसरात सावळागोंधळ सुरूच आहे. नागरिकांना बॅँकेत व आधार कार्ड काढण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. त्याचबरोबर आर्थिक भुर्दंडही बसत आहे. याबाबत प्रशासन मात्र गांधारीची भूमिका साकारताना दिसत आहे.कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचे नाव शिधापत्रिकेवर लावण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचे आधार कार्ड व आयएफएससी कोड नंबर असणाऱ्या बॅँकेमध्ये खाते आवश्यक आहे. त्यानुसार महिलांना बॅँकेत खाती उघडावी लागत आहेत. शासनाने सर्वसामान्य जनतेचा विचार करून सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांना जन-धन योजनेंतर्गत शून्य रुपयाचे खाते उघडण्याचे आदेश दिले. मात्र, बॅँकांनी या आदेशाची पायमल्ली करत मनमानी कारभार सुरू केला. शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत रक्कम भरून घेऊनच नवीन बचत खाती काढली जात आहेत. त्यात हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे खाते नंबर व आयएफएससी कोड नंबर मिळायला पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे रेशन दुकानातील लिंकिंग प्रक्रिया थंडावली आहे.शिधापत्रिका व बॅँकेत खाते काढण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने ज्या महिलांचे आधार कार्ड पूर्वी काढूनही आले नाही व ज्यांना नवीन काढायचे आहे, अशा महिलांनी आधार कार्ड केंद्रांवर गर्दी केली आहे. प्राधान्याने आधार कार्ड मिळण्यासाठी अनेक महिला पहाटे पाच वाजल्यांपासून केंद्राच्या दारात रांगा लावत आहेत. याचा गैरफायदा घेत काही ई-सेवा केंद्र व आधार कार्ड केंद्रधारकांनी आर्थिक फायदा लाटण्यास सुरूवात केली आहे. ५० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात आहे. तर काही केंद्रांवर २०० रुपये दिल्यास अर्जंट कार्ड मिळण्याचीही सोय करण्यात आली असल्याची चर्चा आहे. सोमवारी (दि.९ फेब्रुवारी) यासंदर्भात येथील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी आधार केंद्रधारक व बॅँकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. मात्र, त्याचा कोणताच परिणाम यंत्रणेवर झाल्याचे दिसत नाही. उलट यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ सुरू आहे. परिणामी याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आधार केंद्रचालकांची अरेरावीएएससी महाविद्यालय परिसरातील एका आधार केंद्रावर गुरूवारी सायंकाळी बंद करण्याच्या वेळेस गोंधळ झाल्याने नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी केंद्रचालकाने शुक्रवारी केंद्र मुद्दाम बंद ठेवले. त्याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना उद्धट उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. तसेच राधाकृष्ण चित्रमंदिर येथील केंद्र गुरुवारपासून बंदच असून, भाग्यरेखा थिएटरसमोरील केंद्र अद्याप सरू झालेलेच नाही.गरिबाला कोण वाली नाही. गेल्या चार दिवसांपासून सहा महिन्यांच्या मुलाला कडेवर घेऊन हेलपाटे मारल्यानंतर शुक्रवारी आधार कार्ड काढण्यासाठी नंबर आला. आधार कार्ड काढले असले तरी कार्ड यायला किती दिवस लागणार, याची माहिती दिली जात नाही. - जास्मीन मुजावर (इचलकरंजी)एएससी महाविद्यालय, जवाहरनगर, जुनी नगरपालिका या सर्व ठिकाणी पायपीट करून शेवटी शुक्रवारी सकाळी गावचावडीजवळील आधार कार्ड केंद्रावर कार्ड काढण्यासाठी आलो आहे. येथेही नंबर आला तरच आज काम होईल; अन्यथा उद्या यावे लागेल, असे सांगितले जात आहे.- अलका वीर (कबनूर)आर्थिक पिळवणूकआधार केंद्राच्या परिसरामध्ये विनामूल्य फॉर्म मिळण्याची सोय असतानाही फॉर्मची किंमत पाच रुपये, तर लिहिण्यासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. तसेच झेरॉक्स प्रत काढण्याचे दरसुद्धा एक रुपयावरून दोन रुपये करण्यात आले आहे.