शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद!

By admin | Updated: December 3, 2014 00:40 IST

शिवसेनेतून संधी : अधिकृत घोषणा उद्यापर्यंत : फटाक्यांची आतषबाजी

कोल्हापूर : ‘शिवसेनेचे लढाऊ आमदार’ अशी प्रतिमा असलेल्या राजेश क्षीरसागर यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचे आज, मंगळवारी स्पष्ट झाले. त्यांचे राज्यमंत्रिपद निश्चित झाले असून त्याची अधिकृत घोषणा दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. स्वत: क्षीरसागर यांनीही त्यास दुजोरा दिला. वृत्तवाहिन्यांवर त्यासंबंधीच्या बातम्या दिवसभर सुरू राहिल्याने शहरात क्षीरसागर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. भाजप व शिवसेना सत्तेसाठी एकत्र येणार की नाही, हीच गेल्या महिन्याभरातील संभ्रमावस्था होती. सत्तेसाठीची रस्सीखेच या दोन्ही पक्षांत सुरू राहिल्याने कार्यकर्त्यांतही कमालीची घालमेल सुरू होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्णांतील दहापैकी सहा जागा मिळाल्या. पक्षाला कोल्हापुरात हे घवघवीत यश मिळाल्याने स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गेले. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर एक राज्यमंत्रिपद कोल्हापूरला मिळणार हे नक्कीच होते. त्यासाठी आमदार क्षीरसागर व आमदार चंद्रदीप नरके यांच्यात रस्सीखेच सुरू होती. नरके यांनीही या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती परंतु क्षीरसागर हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने व त्यांनी कोल्हापूर शहरात दोन्हीवेळा दणदणीत / पान ४ वरराज्यमंत्रिपदासाठीनरके यांचीही फिल्डिंगराज्यमंत्रिपदासाठी आमदार चंद्रदीप नरके यांचेही जोरदार प्रयत्न सुरू असून अजूनही त्यांनाच संधी मिळेल, असे त्यांच्या निकटवृत्तीयांकडून सांगण्यात आले.आधी नगरविकास नंतर गृह..क्षीरसागर यांच्या राज्यमंत्रिपदाची अद्याप अधिकृत घोषणा पक्ष अथवा सरकार या पातळीवर झालेली नाही. परंतु तरीही त्यांना नगरविकास राज्यमंत्रिपद मिळाल्याची चर्चा दुपारनंतर सुरू राहिली. दुपारनंतर त्यांना गृहराज्यमंत्रिपद मिळाल्याची हवा होती. सोशल मीडियावरही तसेच मेसेज फिरत होते. त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार या वृत्ताने शिवसेनेतील क्षीरसागर गटात कमालीचा उत्साह होता.विजय मिळविल्याने त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता ठळक झाली आहे. दुपारी सत्तेत शिवसेना सहभागी होणार हे निश्चित झाल्यावर क्षीरसागर यांच्या समर्थकांनी महापालिकेसमोर व शनिवार पेठ परिसरात जोरदार आतषबाजी केली. आमदार यांच्या पत्नी वृषाली क्षीरसागर यांचाही आज वाढदिवस असल्याने त्याचेच फटाके असतील असे लोकांना सुरुवातीला वाटले परंतु नंतर आमदारांचे राज्यमंत्रिपद निश्चित झाल्याची वार्ता शहरभर पसरली. त्यांच्या राज्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे निधन झाल्याने तीन दिवसांचा दुखवटा आहे. त्यामुळे त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा व शपथविधीची तारीख जाहीर होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)