शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर नेते, अधिकाऱ्यांचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कमी कालावधीत प्रचंड पावसामुळे कोल्हापूरला महापूर आल्यानंतर आता त्याचे ...

कोल्हापूर : कमी कालावधीत प्रचंड पावसामुळे कोल्हापूरला महापूर आल्यानंतर आता त्याचे कवित्व सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, आधीच्या संकटातून नेते, अधिकारी, प्रशासन धडा घेत नसल्याने या सर्वांचा सोशल मीडियावर अक्षरश: पंचनामा सुरू आहे. २००५, २०१९ ला महापूर आला. त्यातून कोणता धडा या सर्वांनी घेतला आणि उपाययोजना केली, हे एकदा जाहीर करावे, अशी आता मागणी होत आहे.

या महापुराने अनेकांची घरे उद्‌ध्वस्त झाली. आर्थिक नुकसान झाले. प्रचंड मनस्ताप झाला. शासनाच्या यंत्रणेची राबवणूक झाली. परंतु, हे टाळण्यासाठी किंवा याची तीव्रता कमी करण्यासाठी शासन, प्रशासनाच्या हातात काहीच नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या ठिकाणी दरवर्षी पूर येतो, अशा पन्हाळा रस्त्यावर दोन्ही बाजूला बांधकाम करताना कोणत्याही शासकीय यंत्रणेला हे योग्य आहे की अयोग्य, हे विचारावेसे का वाटले नाही. एकाने जमीन घेऊन तेथे भराव टाकला. मंगल कार्यालय बांधले, दुसऱ्याने फर्निचर मॉल बांधला, मग तिसरा शांत कसा राहील, त्याने हॉटेल उभारले. असे करत करत जिथे नदीचे पाणी फिरत होते तिथे भरावच टाकला गेल्याने हे पाणी आणखी आत शिरले. परंतु, यावर कोणाचेच बंधन नाही, अशी स्थिती आहे.

कोल्हापूर शहरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. या ठिकाणी महापालिका नेते, नगरसेवक, अधिकारी, बांधकाम व्यावसायिक यांची मोठी गट्टी असल्याने वाट्टेल तसे नाले वळवणे, पाहिजे तेथे सिमेंटच्या भिंती बांधून टाकणे आणि पूररेषा वगैरे किरकोळ बाबींकडे फारसे लक्ष न देता अपार्टमेंटच्या अपार्टमेंट उभ्या करणे हे सातत्याने सुरू राहिले आहे. परिणाम दिसतो आहे. उलट परत पूर आला की पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेच सर्व जण बॅनर लावून उतरणार, अशा पद्धतीची टीका साेशल मीडियावरून सुरू आहे.

चौकट

याला जबाबदार कोण

१) धरणांतून पाण्याचा विसर्ग नसताना, सांगलीत पूरस्थिती गंभीर नसताना, कृष्णेमुळे पंचगंगेला फुगवटा नसताना, आलमट्टीने हवा तेवढा विसर्ग करूनही कोल्हापूर बुडाले. मग याला जबाबदार कोण? यापुढच्या काळात अशाच पद्धतीने कमी कालावधीत जास्त पाऊस झाला तर काय.. यासाठी आतापासूनच फेरनियोजनाची गरज आहे. ज्यामध्ये कटुता घेऊन निर्णय घेतले पाहिजेत.

चौकट

याचा विचार करण्याची गरज

शिवाजी पूल ते पन्हाळा रस्त्याच्या दोन्ही बाजू, फुलेवाडी ते गगनबावडा रस्त्याच्या दोन्ही बाजू तसेच शाहू नाका ते शिये फाटा रस्त्याच्या दोन्ही बाजू (आणि राष्ट्रीय महामार्ग सुद्धा) या जवळजवळ २० ते ३० फूट भराव टाकून उचलून घेऊन त्यावर इमारती बांधण्यात आल्या आहेत. हा भराव टाकताना कोणाची परवानगी घेतली आणि त्याची रॉयल्टी शासनास मिळाली आहे का? इथंपासून या भरावामुळे पाणी शहरामध्ये घुसण्याची प्रक्रिया वेगाने होते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

चौकट

राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मिनी आलमट्टी

राष्ट्रीय महामार्गामुळे तेथे एक भिंतच तयार झाली आहे. हेच मिनी आलमट्टी कोल्हापूर महापुराला जबाबदार असणाऱ्या अनेक घटकांपैकी एक आहे. येथे केवळ पुलाखालून पाणी जाण्यास वाव असल्याने पाणी उतरण्यास वेळ लागतो. या सर्व बाबींचा विचार होणार का, असा सवाल सोशल मीडियावरून उपस्थित केला जात आहे.

चौकट

नागरिकांना वाईटपणा नको असतो

संगनमताने जेव्हा बेकायदेशीर बाबी घडत असतात तेव्हा आवाज उठवण्यापेक्षा केवळ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नागरिकांचीही यात चूक आहे, असाही सूर सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. नेते, कार्यकर्ते, प्रशासन, अधिकारी कोणाचाच वाईटपणा घ्यायला नागरिक तयार नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

चौकट

पर्यायी जागा दिली असताना नागरिक राहतातच कसे?

चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांना अनेक वर्षांपूर्वी पर्यायी जागा देण्यात आल्या आहेत. तेथे जागा ताब्यात घेऊन या दोन्ही गावांचे ग्रामस्थ पुन्हा गावातच का राहतात, पर्यायी जागा दिल्यानंतर यांना घरातून बाहेर काढण्यासाठी शासनाला बोटी मागवाव्या लागत असतील तर हे कोणत्या तत्त्वात बसते, अशीही विचारणा केली जात आहे. नेते मतदारांचा वाईटपणा घ्यायला तयार नाहीत आणि अधिकारी नेत्यांच्या शब्दापुढे जात नाहीत. यामुळे हे होत असल्याची टिप्पणीही सुरू आहे.