शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई फार्सच !

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

साखर कारखानदारीतून तीव्र संताप : नदी प्रदूषणाचे नियम पाळण्याबाबत अनास्था दाखविणारे अन्य घटकांवर कारवाईच नाही

प्रकाश पाटील - कोपार्डे -नदी व तत्सम स्रोतांचे प्रदूषण केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांवर त्यांनी नदीतील प्रदूषणाला आळा बसविण्यासाठी केलेल्या सर्व उपाय योजनेनंतरही कारवाई केली गेली, ही केवळ साखर कारखान्यांनी दिलेल्या बँकहमीच्या रकमेवर डोळा ठेवून व नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य अस्थापनेला वाचविण्यासाठी केलेली खेळी असल्याच्या प्रतिक्रिया साखर कारखानदारीतून व्यक्त होत आहेत.गेल्या काही वर्षांपासून नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने अनेक गावात गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या साथीच्या रोगांची लागण होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र यातील प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकापर्यंत प्रदूषण मंडळ न पोहोचता ज्याच्यावर सहज कारवाई करता येईल अशा उद्योगांना वेठीला धरून आपल्यावरील जबाबदारी झटकत असल्याचे बोलले जात आहे.सध्या साखर कारखान्यांचे हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये वापर होणाऱ्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातो. यामुळेच प्रदूषण झाल्याचा दावा प्रदूषण मंडळाने केला असला तरी या दहापैकी केवळ ‘दत्त दालमिया आसुर्ले-पोर्ले या कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीला मिळाल्याची नोंद प्रमुख विभागाकडे २०१३-१४ च्या हंगामातील आहे. इतर नऊ कारखान्यांच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या सर्व नियम व अटींची पूर्तता केल्याची व पाणी वापरानंतर ते शेती सिंचनासाठी वापरले जात आहे. याचे दाखले वेळोवेळी दिले आहेत. मात्र, नदी प्रदूषणाबाबत सध्या जनतेच्या रोषाला या विभागाचे अधिकारी बळी पडत आहेत. जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्यासाठी हा खटाटोप असून कारखान्यांचे पैसे बँक हमीद्वारे हातात असल्याने सहज कारवाईला मूर्त स्वरुप देता येत असल्यानेच साखर कारखान्यांवरील कारवाई केली जात असल्याचे मत साखर उद्योगातील जबाबदार व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.मुळात भोगावतीचे पाणी नदीपर्यंत पोहोचतच नाही. साखर उद्योग हा माणसांचा विशेषत: ग्रामीण जनतेला जगवणारा उद्योग आहे. प्रदूषण मंडळाचे सर्व नियम व अटी पाळण्यासाठी सर्व कारखानदार आटोकाट प्रयत्न करतात, पण कारवाई कोणत्या निकषावर होते हे प्रदूषण मंडळालाच माहीत आहे. - धैर्यशील पाटील, अध्यक्ष, भोगावती कारखानाकुंभीचे पाणी प्रदूषण रोखणारे प्रदूषण मंडळाचे सर्व प्रकल्प उभा केले आहेत. प्रदूषण मंडळाने कुंभी-कासारीचे पाणी नदीत मिसळून प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आणून दिलेले नाही. बऱ्याच वेळा त्याबाबत तपासण्याही या विभागाकडून झाल्या आहेत. मात्र तरीही बँक हमी जप्तीची कारवाई न समजण्यासारखी आहे. - अरुण जाधव, पर्यावरण इंजिनियरमहानगरपालिकेचे दररोज ७५ दशलक्ष घन मीटर सांडपाणी जयंती नाल्याद्वारे सरळ नदीत मिसळत आहे. या पाण्याच्या ५० टक्के पाण्यावरही प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया केली जात नाही. हे पाणी सरळ नदीत मिसळत असताना प्रदूषण मंडळाचे लक्ष कोठे आहे? एवढेच नाही तर नदीकाठच्या गावांचे लाखो लिटर पाणी या गावाकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सरळ नदीत मिसळत असल्याचे प्रदूषण मंडळाकडे नोंदी असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.