शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई फार्सच !

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

साखर कारखानदारीतून तीव्र संताप : नदी प्रदूषणाचे नियम पाळण्याबाबत अनास्था दाखविणारे अन्य घटकांवर कारवाईच नाही

प्रकाश पाटील - कोपार्डे -नदी व तत्सम स्रोतांचे प्रदूषण केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांवर त्यांनी नदीतील प्रदूषणाला आळा बसविण्यासाठी केलेल्या सर्व उपाय योजनेनंतरही कारवाई केली गेली, ही केवळ साखर कारखान्यांनी दिलेल्या बँकहमीच्या रकमेवर डोळा ठेवून व नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य अस्थापनेला वाचविण्यासाठी केलेली खेळी असल्याच्या प्रतिक्रिया साखर कारखानदारीतून व्यक्त होत आहेत.गेल्या काही वर्षांपासून नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने अनेक गावात गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या साथीच्या रोगांची लागण होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र यातील प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकापर्यंत प्रदूषण मंडळ न पोहोचता ज्याच्यावर सहज कारवाई करता येईल अशा उद्योगांना वेठीला धरून आपल्यावरील जबाबदारी झटकत असल्याचे बोलले जात आहे.सध्या साखर कारखान्यांचे हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये वापर होणाऱ्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातो. यामुळेच प्रदूषण झाल्याचा दावा प्रदूषण मंडळाने केला असला तरी या दहापैकी केवळ ‘दत्त दालमिया आसुर्ले-पोर्ले या कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीला मिळाल्याची नोंद प्रमुख विभागाकडे २०१३-१४ च्या हंगामातील आहे. इतर नऊ कारखान्यांच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या सर्व नियम व अटींची पूर्तता केल्याची व पाणी वापरानंतर ते शेती सिंचनासाठी वापरले जात आहे. याचे दाखले वेळोवेळी दिले आहेत. मात्र, नदी प्रदूषणाबाबत सध्या जनतेच्या रोषाला या विभागाचे अधिकारी बळी पडत आहेत. जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्यासाठी हा खटाटोप असून कारखान्यांचे पैसे बँक हमीद्वारे हातात असल्याने सहज कारवाईला मूर्त स्वरुप देता येत असल्यानेच साखर कारखान्यांवरील कारवाई केली जात असल्याचे मत साखर उद्योगातील जबाबदार व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.मुळात भोगावतीचे पाणी नदीपर्यंत पोहोचतच नाही. साखर उद्योग हा माणसांचा विशेषत: ग्रामीण जनतेला जगवणारा उद्योग आहे. प्रदूषण मंडळाचे सर्व नियम व अटी पाळण्यासाठी सर्व कारखानदार आटोकाट प्रयत्न करतात, पण कारवाई कोणत्या निकषावर होते हे प्रदूषण मंडळालाच माहीत आहे. - धैर्यशील पाटील, अध्यक्ष, भोगावती कारखानाकुंभीचे पाणी प्रदूषण रोखणारे प्रदूषण मंडळाचे सर्व प्रकल्प उभा केले आहेत. प्रदूषण मंडळाने कुंभी-कासारीचे पाणी नदीत मिसळून प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आणून दिलेले नाही. बऱ्याच वेळा त्याबाबत तपासण्याही या विभागाकडून झाल्या आहेत. मात्र तरीही बँक हमी जप्तीची कारवाई न समजण्यासारखी आहे. - अरुण जाधव, पर्यावरण इंजिनियरमहानगरपालिकेचे दररोज ७५ दशलक्ष घन मीटर सांडपाणी जयंती नाल्याद्वारे सरळ नदीत मिसळत आहे. या पाण्याच्या ५० टक्के पाण्यावरही प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया केली जात नाही. हे पाणी सरळ नदीत मिसळत असताना प्रदूषण मंडळाचे लक्ष कोठे आहे? एवढेच नाही तर नदीकाठच्या गावांचे लाखो लिटर पाणी या गावाकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सरळ नदीत मिसळत असल्याचे प्रदूषण मंडळाकडे नोंदी असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.