शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पावलोपावली होते मानवी हक्कांची पायमल्ली

By admin | Updated: December 9, 2014 23:25 IST

अधिकारांबाबत अनभिज्ञता : असुरक्षिततेने घेतली अधिकारांची जागा, यंत्रणेअभावी होत आहे घुसमट::मानवाधिकारदिन विशेष

अविनाश कोळी : सांगली :संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने स्वीकारलेल्या मानवाधिकाराच्या घोषणापत्राला आता ६६ वर्षे उलटली आहेत. इतक्या वर्षांतही मानवी अधिकाराची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकली नाही. अधिकाराबाबतच अनभिज्ञता असल्याने या दिनाला केवळ औपचारिक स्वरूप प्राप्त झाले आहे. अन्याय, अत्याचार, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर येणारी गदा, सामाजिक, शासकीय दबाव अशा अनेक कारणांनी पावलोपावली मानवी हक्कांची पायमल्ली सांगलीसारख्या छोट्या जिल्ह्यातही होताना दिसत आहे. स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याच्या मूलभूत अधिकारावरच आधारलेल्या या संकल्पनेला सामाजिक व शासकीय स्तरावरील यंत्रणाच धक्के देत असल्याचे दिसत आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास याठिकाणी मानवी अधिकारांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. बहुतांशी नागरिकांना मानवाधिकाराबद्दलची कोणतीच कल्पना नाही. असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याने बहुतांश सामान्य नागरिकांची घुसमट झाली आहे. मानवाधिकार म्हणजे काय?संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र स्वीकारले. हे घोषणापत्र दुसऱ्या महायुद्धात जगाने अनुभवलेल्या नृशंस आत्याचाराचा परिणाम म्हणून अस्तित्वात आले. सर्व मानवाच्या जन्मसिद्ध अधिकाराची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्राकडे पाहण्यात येते. यात एकूण ३० कलमे आहेत. या घोषणापत्रावर आधारित ‘मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक’ १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. १९७६ मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्यास आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले. प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा, सुरक्षिततेचा, माणूस म्हणून जगण्याचा, अभिव्यक्तीचा, मालमत्तेचा, समानतेचा, राष्ट्रीयत्वाचा, वास्तव्याचा, स्थलांतराचा, विवाहाचा, सभास्वातंत्र्याचा, शासकीय सेवेत प्रवेश मिळविण्याच्या समानतेचा, महिलांच्या समानतेचा असे अनेक अधिकार या घोषणापत्रात आहेत. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. धर्म, जात, पंत किंवा अन्य कारणांवरून हक्क डावलता येणार नाही. कोणाचीही मालमत्ता जबरदस्ती बळकावता येणार नाही, कोणाचाही छळ, गुलाम बनविण्याचा प्रकार आदी गोष्टींना घोषणापत्रात मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्याची स्थितीसांगली जिल्ह्यात आजही ६७ हजार ३४२ कुटुंबांना भाड्याच्या घरात रहावे लागते. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी छताशिवाय राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यात ८० हजार कुटुंबांना दारिद्र्यरेषेखालील जीवन जगावे लागत आहे.२०१३-२०१४ मध्ये जिल्ह्यात कर्जाच्या नावाखाली मालमत्ता हडप करणाऱ्या दीडशे सावकारांवर गुन्हे दाखल झाले. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात सुरक्षिततेचे धिंडवडे उडवित १० जणांचे खून झाले. जातीबाहेर लग्न केल्याच्या कारणावरून मारामारी व खुनाच्या घटना वारंवार घडताहेतजिल्ह्यातील ४७.१ टक्के जनता ड्रेनेजच्या सुविधांपासून वंचित आहेजिल्ह्यातील ६५,८९३ कुटुंबे पाण्याच्या स्त्रोतापासून दूर आहेत. पाण्यासाठी सतत त्यांची धावाधाव सुरू आहे.भंगार गोळा करणारी, वीट भट्टीवर, हॉटेलमध्ये काम करणारी, भीक मागणारी हजारो मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत. महिलांच्या छेडछाडीच्या, विनयभंगाच्या, बलात्काराच्या घटनाही वारंवार घडत आहेत. शंभर लोकसंख्येमागे महिलांसाठी १ मुतारी आवश्यक असताना महापालिका क्षेत्रात १ लाखामागे १ मुतारी असे प्रमाण आहे. अपंगांसाठी सार्वजनिक इमारतींमध्ये व्हिलचेअर व अन्य व्यवस्था बऱ्याच ठिकाणी नाही.