शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मोफत प्रवेशाकडे पालकांची पाठ; ‘आरटीई’च्या ३५ टक्केच जागा भरल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशाला पालकांचा अपेक्षित ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशाला पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ टक्के म्हणजे ३१८१ पैकी १०९८ जागा भरल्या आहेत. अद्याप २०८३ जागा रिक्त आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई २००९) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. याअंतर्गत जिल्ह्यातील ३४५ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ३,१८१ जागा रिक्त आहेत. त्यासाठी २,६४५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, आतापर्यंत त्यापैकी १०९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी पालकांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. शासनाने प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनुसार दि. २३ जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत राहणार आहे.

पॉंइंटर

‘आरटीई’अंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद : ३४५

एकूण जागा : ३१८१

आतापर्यंत झालेले प्रवेश : १०९८

शिल्लक जागा : २०८३

तालुकानिहाय शाळा आणि जागा

तालुका शाळा जागा

शाहूवाडी ५ ४३

पन्हाळा २९ २६९

हातकणंगले ९७ ८९३

शिरोळ ३५ २८०

करवीर ४५ ३४१

गगनबावडा २ ४

राधानगरी ११ १०५

कागल २७ २९०

भुदरगड १० ४८

आजरा ६ ३५

गडहिंग्लज २२ २२२

चंदगड ११ १०१

कोल्हापूर शहर ४५ ५५०

चौकट

दुसऱ्यांदा मुदतवाढ

शासन आदेशानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्यांदा ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत होती. ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ती मुदत २३ जुलैपर्यंत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले.

चौकट

शाळांचे पैसे सरकार कधी देणार?

दरवर्षी आरटीई प्रवेशाच्या रकमेतील पहिला हप्ता शासनाने शाळांना ऑक्टोबरमध्ये, तर दुसरा एप्रिलमध्ये देणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून आरटीईचे पैसे खासगी शाळांना मिळालेले नाही. त्यामुळे इमारत भाडे, देखभाल-दुरुस्ती, वीज आणि पाणी बिल भरणे, आदी खर्च करणे अडचणीचे ठरत आहे. शासनाने शाळांना आरटीईचे पैसे लवकर द्यावेत, अशी मागणी मॉडर्न शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश कचरे यांनी केली.

पालकांच्या अडचणी काय?

आरटीई प्रवेशाची योजना खूप चांगली आहे. मात्र, प्रवेशाच्या प्रक्रियेत आणखी सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. शाळा आणि शिक्षण विभागातील समन्वय वाढविण्याची गरज आहे.

-मेघा लगारे, फुलेवाडी

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी आरटीई योजना महत्त्वाची आहे. शासनाकडून शाळांना आरटीईचे पैसे मिळत नसल्याने थोडी अडचण होत आहे. शासनाने वेळेत पैसे द्यावेत. पालकांनीदेखील शाळांना सहकार्य करावे.

-सपना पवार, शिवाजी पेठ