शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मोफत प्रवेशाकडे पालकांची पाठ; ‘आरटीई’च्या ३५ टक्केच जागा भरल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशाला पालकांचा अपेक्षित ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशाला पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ टक्के म्हणजे ३१८१ पैकी १०९८ जागा भरल्या आहेत. अद्याप २०८३ जागा रिक्त आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई २००९) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. याअंतर्गत जिल्ह्यातील ३४५ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ३,१८१ जागा रिक्त आहेत. त्यासाठी २,६४५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, आतापर्यंत त्यापैकी १०९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी पालकांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. शासनाने प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनुसार दि. २३ जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत राहणार आहे.

पॉंइंटर

‘आरटीई’अंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद : ३४५

एकूण जागा : ३१८१

आतापर्यंत झालेले प्रवेश : १०९८

शिल्लक जागा : २०८३

तालुकानिहाय शाळा आणि जागा

तालुका शाळा जागा

शाहूवाडी ५ ४३

पन्हाळा २९ २६९

हातकणंगले ९७ ८९३

शिरोळ ३५ २८०

करवीर ४५ ३४१

गगनबावडा २ ४

राधानगरी ११ १०५

कागल २७ २९०

भुदरगड १० ४८

आजरा ६ ३५

गडहिंग्लज २२ २२२

चंदगड ११ १०१

कोल्हापूर शहर ४५ ५५०

चौकट

दुसऱ्यांदा मुदतवाढ

शासन आदेशानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्यांदा ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत होती. ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ती मुदत २३ जुलैपर्यंत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले.

चौकट

शाळांचे पैसे सरकार कधी देणार?

दरवर्षी आरटीई प्रवेशाच्या रकमेतील पहिला हप्ता शासनाने शाळांना ऑक्टोबरमध्ये, तर दुसरा एप्रिलमध्ये देणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून आरटीईचे पैसे खासगी शाळांना मिळालेले नाही. त्यामुळे इमारत भाडे, देखभाल-दुरुस्ती, वीज आणि पाणी बिल भरणे, आदी खर्च करणे अडचणीचे ठरत आहे. शासनाने शाळांना आरटीईचे पैसे लवकर द्यावेत, अशी मागणी मॉडर्न शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश कचरे यांनी केली.

पालकांच्या अडचणी काय?

आरटीई प्रवेशाची योजना खूप चांगली आहे. मात्र, प्रवेशाच्या प्रक्रियेत आणखी सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. शाळा आणि शिक्षण विभागातील समन्वय वाढविण्याची गरज आहे.

-मेघा लगारे, फुलेवाडी

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी आरटीई योजना महत्त्वाची आहे. शासनाकडून शाळांना आरटीईचे पैसे मिळत नसल्याने थोडी अडचण होत आहे. शासनाने वेळेत पैसे द्यावेत. पालकांनीदेखील शाळांना सहकार्य करावे.

-सपना पवार, शिवाजी पेठ