शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पानसरेंचे मारेकरी कोण..सनातनी सनातनी

By admin | Updated: February 22, 2015 01:07 IST

अंत्ययात्रेत राज्य सरकारचा निषेध : फडणवीस यांच्यासह भाजपचा धिक्कार

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांचे मारेकरी कोण... सनातनी सनातनी...मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद..धिक्कार असो, धिक्कार असो..काळी टोपी, खाकी चड्डीचा धिक्कार असो, अशा त्वेषाने दिलेल्या घोषणांनी अंत्ययात्रेच्या मार्गावरील वातावरण शेवटपर्यंत तणावपूर्ण राहिले. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने पानसरे यांच्या हल्ल्यास सनातनी प्रवृत्तींच्या संघटनांनाच थेटपणे जबाबदार धरले. कामगार संघटनांतील हेवेदावे अथवा टोल आंदोलन पुढे करून त्याच्या आडाला हिंदुत्ववाद्यांना लपविले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सर्वच नेत्यांनी केला. पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकातील मंडपात ठेवले होते. दुपारी पावणेदोन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारच्यावतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली; पण त्याचवेळी जमावातून भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा झाल्या. त्यामुळे तिथे फार काळ न थांबताच पाटील यांनी निघून जाणे पसंत केले. पोलिसांनीही त्यांना अंत्यदर्शनासाठी जाऊ नये, अशीच विनंती केली होती. तिथे सुरू झालेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा स्मशानभूमीत पानसरे यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतरच थांबल्या. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सजविलेल्या ट्रॉलीतून पानसरे यांची अंत्ययात्रा सुरू झाली. पानसरे यांचे पार्थिव लाल झेंड्यामध्ये गुंडाळून शवपेटीत ठेवले होते. शवपेटीही लाल झेंड्यात गुंडाळलेली होती. त्या शेजारी पक्षाचे सच्चे कार्यकर्ते रघु कांबळे, भालचंद्र कांगो, एस. बी. पाटील, विक्रम कदम आणि उमेश पानसरे शोकमग्न बसून होते. सूर्य तापला होता आणि दुसरा सूर्य अखेरच्या प्रवासाला निघाला होता. पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकातून हलविल्यानंतर दु:खाचा कोलाहल वाढला. अंत्ययात्रा दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ््यास वळसा घालून ही अंत्ययात्रा बिंदू चौकाकडे निघाली. सगळीकडे ‘लाल सलाम, लाल सलाम..’च्या घोषणा आणि फडफडणारे लाल झेंडेच दिसत होते. दुतर्फा लोक जागा मिळेल तिथे उभारून या धीरोदात्त नेत्याचे अंत्यदर्शन घेत होते. घोषणा देणारे तरुण होते, महिला होत्या, कामगार होते, ज्येष्ठ नागरिक होते. अंत्ययात्रा बिंदू चौकातील पानसरे यांच्या भाकप कार्यालयासमोर आली आणि ती काही क्षण स्तब्धच झाली. गर्दीतून आरोळी उमटली, ‘कॉम्रेड गोविंद पानसरेंका अधुरा काम कौन पुरा करेगा..?’ हजारोंनी मुठी आवळून उंचावल्या व त्यास प्रतिसाद दिला. ‘हम करेंगे..हम करेंगे..’ कॉम्रेड अवि पानसरे यांच्या अंत्ययात्रेवेळी गोविंद पानसरे यांनी ३ आॅक्टोबर २००३ ला अशीच दिलेली आरोळी आसमंत भेदून गेली होती. पानसरे यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. शिवाजी रोडमार्गे अंत्ययात्रा शिवाजी चौकात आली. पुढे महापालिकेच्यावतीने त्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर बार असो.च्यावतीने आपल्या माजी अध्यक्षास पुष्पचक्र वाहिले. काळा कोट परिधान करून न्यायालयासमोर युक्तिवाद करणारे अण्णा आता कधीच दिसणार नाहीत अशाच भावना तिथे व्यक्त झाल्या. जुना बुधवार पेठेतून अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली, तेव्हा घोषणांना त्वेष चढला होता. कारण अण्णांच्या अखेरच्या निरोपाची वेळ जवळ आली होती...!