शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पानसरेंचे मारेकरी कोण..सनातनी सनातनी

By admin | Updated: February 22, 2015 01:07 IST

अंत्ययात्रेत राज्य सरकारचा निषेध : फडणवीस यांच्यासह भाजपचा धिक्कार

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांचे मारेकरी कोण... सनातनी सनातनी...मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद..धिक्कार असो, धिक्कार असो..काळी टोपी, खाकी चड्डीचा धिक्कार असो, अशा त्वेषाने दिलेल्या घोषणांनी अंत्ययात्रेच्या मार्गावरील वातावरण शेवटपर्यंत तणावपूर्ण राहिले. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने पानसरे यांच्या हल्ल्यास सनातनी प्रवृत्तींच्या संघटनांनाच थेटपणे जबाबदार धरले. कामगार संघटनांतील हेवेदावे अथवा टोल आंदोलन पुढे करून त्याच्या आडाला हिंदुत्ववाद्यांना लपविले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सर्वच नेत्यांनी केला. पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकातील मंडपात ठेवले होते. दुपारी पावणेदोन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारच्यावतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली; पण त्याचवेळी जमावातून भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा झाल्या. त्यामुळे तिथे फार काळ न थांबताच पाटील यांनी निघून जाणे पसंत केले. पोलिसांनीही त्यांना अंत्यदर्शनासाठी जाऊ नये, अशीच विनंती केली होती. तिथे सुरू झालेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा स्मशानभूमीत पानसरे यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतरच थांबल्या. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सजविलेल्या ट्रॉलीतून पानसरे यांची अंत्ययात्रा सुरू झाली. पानसरे यांचे पार्थिव लाल झेंड्यामध्ये गुंडाळून शवपेटीत ठेवले होते. शवपेटीही लाल झेंड्यात गुंडाळलेली होती. त्या शेजारी पक्षाचे सच्चे कार्यकर्ते रघु कांबळे, भालचंद्र कांगो, एस. बी. पाटील, विक्रम कदम आणि उमेश पानसरे शोकमग्न बसून होते. सूर्य तापला होता आणि दुसरा सूर्य अखेरच्या प्रवासाला निघाला होता. पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकातून हलविल्यानंतर दु:खाचा कोलाहल वाढला. अंत्ययात्रा दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ््यास वळसा घालून ही अंत्ययात्रा बिंदू चौकाकडे निघाली. सगळीकडे ‘लाल सलाम, लाल सलाम..’च्या घोषणा आणि फडफडणारे लाल झेंडेच दिसत होते. दुतर्फा लोक जागा मिळेल तिथे उभारून या धीरोदात्त नेत्याचे अंत्यदर्शन घेत होते. घोषणा देणारे तरुण होते, महिला होत्या, कामगार होते, ज्येष्ठ नागरिक होते. अंत्ययात्रा बिंदू चौकातील पानसरे यांच्या भाकप कार्यालयासमोर आली आणि ती काही क्षण स्तब्धच झाली. गर्दीतून आरोळी उमटली, ‘कॉम्रेड गोविंद पानसरेंका अधुरा काम कौन पुरा करेगा..?’ हजारोंनी मुठी आवळून उंचावल्या व त्यास प्रतिसाद दिला. ‘हम करेंगे..हम करेंगे..’ कॉम्रेड अवि पानसरे यांच्या अंत्ययात्रेवेळी गोविंद पानसरे यांनी ३ आॅक्टोबर २००३ ला अशीच दिलेली आरोळी आसमंत भेदून गेली होती. पानसरे यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. शिवाजी रोडमार्गे अंत्ययात्रा शिवाजी चौकात आली. पुढे महापालिकेच्यावतीने त्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर बार असो.च्यावतीने आपल्या माजी अध्यक्षास पुष्पचक्र वाहिले. काळा कोट परिधान करून न्यायालयासमोर युक्तिवाद करणारे अण्णा आता कधीच दिसणार नाहीत अशाच भावना तिथे व्यक्त झाल्या. जुना बुधवार पेठेतून अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली, तेव्हा घोषणांना त्वेष चढला होता. कारण अण्णांच्या अखेरच्या निरोपाची वेळ जवळ आली होती...!