शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

महाविद्यालयांचे सरसकट मूल्यांकन

By admin | Updated: August 19, 2015 22:52 IST

उपोषण मागे : पाचही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश निर्गमित

आरवली : कोल्हापूर उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात आले नव्हते. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे विभागीय उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांना कोल्हापूरचे उपसंचालक गोंधळी यांनी तातडीने सरसकट मूल्यांकन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आणि तसे आदेशही संबंधीत पाचही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत.२४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘कायम’ शब्द वगळून अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी आॅनलाईन पद्धतीने मुल्यांकन करण्यात आले व यानंतर प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमून प्रत्यक्ष आॅनलाईन स्वरुपात भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे पाहून संबंधित कनिष्ठ महाविद्यालय पात्र की अपात्र आहे हे ठरणार होते. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला चमू प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचला. परंतु, कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाला पाने पुसत कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी न देता अपात्र ठरविले. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या प्रक्रियेकडे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या निषेधार्थ पाचही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कोल्हापूर येथील विभागीय उपसंचालक कार्यालय येथे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत उपसंचालक गोंधळी यांनी चर्चेसाठी बोलावून कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृ ती समितीतर्फे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.शासन जोपर्यंत विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्षात अनुदान देत नाही व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलने केली जाणार आहेत. यामध्ये ३१ आॅगस्टला पुणे संचालक कार्यालयावर आंदोलन, त्यानंतर ५ सप्टेंबरला विनाअनुदानित प्राध्यापक ‘काळा दिन’ साजरा करणार आहेत. १५ सप्टेंबरला आझाद मेदानावर धरणे आंदोलन तर ११ नोव्हेंबरपासून आझाद मैदानावरच उपोषण करणार आहेत. आंदोलनावेळी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृ ती समितीचे अध्यक्ष टी. एम. नाईक, रत्नाकर माळी, गौरव पोंक्षे, शिवभूषण नामजोशी, संदीप कुराडे, अभिजीत सुर्वे, विपुल देसाई, अभिजीत सहस्त्रबुद्धे, माजी आमदार भगवान साळुंखे उपस्थित होते. (वार्ताहर)