शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

महाविद्यालयांचे सरसकट मूल्यांकन

By admin | Updated: August 19, 2015 22:52 IST

उपोषण मागे : पाचही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश निर्गमित

आरवली : कोल्हापूर उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात आले नव्हते. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे विभागीय उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांना कोल्हापूरचे उपसंचालक गोंधळी यांनी तातडीने सरसकट मूल्यांकन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आणि तसे आदेशही संबंधीत पाचही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत.२४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘कायम’ शब्द वगळून अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी आॅनलाईन पद्धतीने मुल्यांकन करण्यात आले व यानंतर प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमून प्रत्यक्ष आॅनलाईन स्वरुपात भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे पाहून संबंधित कनिष्ठ महाविद्यालय पात्र की अपात्र आहे हे ठरणार होते. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला चमू प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचला. परंतु, कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाला पाने पुसत कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी न देता अपात्र ठरविले. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या प्रक्रियेकडे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या निषेधार्थ पाचही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कोल्हापूर येथील विभागीय उपसंचालक कार्यालय येथे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत उपसंचालक गोंधळी यांनी चर्चेसाठी बोलावून कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृ ती समितीतर्फे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.शासन जोपर्यंत विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्षात अनुदान देत नाही व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलने केली जाणार आहेत. यामध्ये ३१ आॅगस्टला पुणे संचालक कार्यालयावर आंदोलन, त्यानंतर ५ सप्टेंबरला विनाअनुदानित प्राध्यापक ‘काळा दिन’ साजरा करणार आहेत. १५ सप्टेंबरला आझाद मेदानावर धरणे आंदोलन तर ११ नोव्हेंबरपासून आझाद मैदानावरच उपोषण करणार आहेत. आंदोलनावेळी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृ ती समितीचे अध्यक्ष टी. एम. नाईक, रत्नाकर माळी, गौरव पोंक्षे, शिवभूषण नामजोशी, संदीप कुराडे, अभिजीत सुर्वे, विपुल देसाई, अभिजीत सहस्त्रबुद्धे, माजी आमदार भगवान साळुंखे उपस्थित होते. (वार्ताहर)