शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जल आराखड्यात’ केवळ ‘भाषणबाजी’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 01:13 IST

व्यापक बैठकीची मागणी : शेतकऱ्यांना सोबत घेऊन नियोजनाची गरज

राम मगदूम - गडहिंग्लज -शेतकऱ्यांऐवजी पुढाऱ्यांचीच गर्दी आणि सल्ला मसलतीऐवजी फक्त भाषणबाजीच अधिक झाल्यामुळे गडहिंग्लजमधील जल आराखडा कार्यशाळा म्हणजे केवळ सोपस्कारच ठरला. त्यामुळे घटप्रभा उपखोऱ्यातील ‘जल आराखड्यासाठी’ संबंधित सर्व खात्यांचे अधिकारी, शेती व पाणीतज्ज्ञांच्या उपस्थितीत पुन्हा व्यापक बैठक बोलावण्यात यावी, अशी समस्त शेतकरी बांधवांची मागणी आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे घटप्रभा उपखोऱ्यातील एकात्मिक जल आराखडा प्रारूप स्वरूपात तयार करण्यात आला आहे. त्यावर उपखोऱ्यातील लाभार्थी शेतकरी-पाणी वापरकर्ते यांच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात ही कार्यशाळा झाल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.गडहिंग्लज विभागात ‘घटप्रभा’ ही प्रमुख नदी, तर हिरण्यकेशी, ताम्रपर्णी व मार्कंडेय या उपनद्या आहेत. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार या विभागाच्या वाट्याला ७ टीएमसी पाणी मिळाले आहे. त्यासाठी जंगमहट्टी, चित्री, फाटकवाडी, जांबरे, उचंगी, सर्फनाला व आंबेओहळ या धरणांची कामे हाती घेण्यात आली. यापैकी उचंगी, सर्फनाला व आंबेओहळ या प्रकल्पाची कामे रखडली आहेत. वाट्याला आलेल्या पाण्याचा कोटा संपल्यामुळे तीन टीएमसीचा ‘किटवडे’ प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. तो पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी व भविष्यासाठी लागणारे पाणी यावर विचारमंथन होऊन परिपूर्ण आराखडा आणि ठोस कृती कार्यक्रम निश्चित होण्याची गरज आहे. मात्र, गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांतील शेतकरी आणि बहुतेक लोकप्रतिनिधींनी जल आराखड्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, त्यामुळेच ही कार्यशाळा फक्त ‘सरकारी’ ठरली.यांनीही फिरवली पाठकृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार नरसिंगराव पाटील, श्रीपतराव शिंदे व माजी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याकडे पाठ फिरवली. त्यांच्या अनुभवांची व सूचनांची नोंद घेणे आवश्यक आहे.अर्धवट प्रकल्पांचे काय ?निधी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे रखडलेल्या उचंगी, सर्फनाला व आंबेओहळ या प्रकल्पांचे काय होणार ? याविषयी संबंधित शेतकरी व प्रकल्पग्रस्त संभ्रमात आहेत. त्यामुळे या अर्धवट प्रकल्पांचे काय होणार ? याचेही उत्तर मिळायला हवे.२५० टीएमसी पाणी जाते वाया दरवर्षी घटप्रभा उपखोऱ्यातून सुमारे २५० टीएमसी पाणी वाया जाऊन कर्नाटकात जाते. या अतिरिक्त पाण्याबरोबरच पावसामुळे उपलब्ध होणारे स्थानिक व बाहेरून येणाऱ्या पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन व्हायला हवे. यासाठी कृषी, वन, जलसंधारण आणि पाटबंधारे आदी संबंधित विभागांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन परिपूर्ण व आदर्श जल आराखडा बनवायला हवा. नसमन्यायी व गावनिहाय वाटणीघटप्रभा उपखोऱ्यातील लोकसंख्या आणि लागवडीलायक सिंचन क्षेत्र किती ? पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी किती पाणी लागणार ? धरणे व तलावात साठले जाणारे आणि अडविल्या जाणाऱ्या पाण्याचे समन्यायी व गावनिहाय वाटणी कशी करणार ? प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी कसे पोहोचणार ? याचाही कृती कार्यक्रम ठरवायला हवा.