शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

५५ हजार नागरिकांमागे एक पोलीस

By admin | Updated: November 28, 2015 00:26 IST

करवीर पोलीस ठाणे : ११७ गावांची सुरक्षेची जबाबदारी केवळ ८५ पोलीस कर्मचाऱ्यांकडे

प्रकाश पाटील -- कोपार्डे---वाढते औद्योगिकीकरण, नागरिकीकरण यापाठोपाठ समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. करवीर तालुका हा करवीर पोलीस ठाण्यापासून किमान ५० ते ५५ कि. मी. लांब पसरला असून, गुन्हा घडण्याअगोदर पोहोचणे सोडाच; पण गुन्हा घडल्यानंतरही पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागत आहेत. जवळजवळ १४ लाख लोकसंख्या असणाऱ्या या तालुक्यासाठी केवळ ८५ पोलीस कर्मचारी असून, किमान ५५ हजार नागरिकांचे संरक्षण एक पोलीस कर्मचारी करत आहे. करवीर तालुक्याचा निम्मा भाग हा शहर व उपनगरांत मोडतो, तर बराचसा भाग दुर्गम वाड्यावस्त्या व गाव यामध्ये मोडतो. या तालुक्याचा पूर्वेकडील भाग गांधीनगर पोलीस ठाण्यामुळे थोडा कमी झाला असला, तरी करवीर पोलीस ठाण्यावर सध्या ११७ गावांच्या सुरक्षेचा भार आहे. या पोलीस ठाण्यासाठी इस्पुर्ली, माळ्याची शिरोली, सांगरूळ या पोलीस चौक्या कार्यरत आहेत. मात्र, पोलीस कर्मचारी कमी असल्याने या पोलीस चौकींना कायमस्वरूपी पोलीस मिळत नाहीत. करवीरच्या पश्चिमेकडील भाग हा बारा वाड्या व दुर्गम भागाचा आहे. येथे वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहेत. येथून मोठ्या प्रमाणावर नरक्या तस्कराची प्रकरणे उघड झाली आहेत. तर काही गुन्हे तेथे पोलीस पोहोचू शकत नसल्याने उघड होऊ शकले नाहीत.करवीर पोलीस ठाणे व या अंतर्गत येणाऱ्या गावाचे अंतर पाहता किमान ५० ते ५५ कि. मी. अंतरावर असल्याचे दिसून येते. या पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव, फुलेवाडी यासारखी उपनगरेही येतात. तालुक्याची वाढलेली लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून, शहराजवळ असणाऱ्या गावांतील शेतजमिनीला सोन्याचा भाव आल्याने लॅण्डमाफियांची पकड मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. यातून खून, मारामाऱ्या, धमक्या, अपहरण असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याशिवाय कौटुंबिक वादावादी, अपघात, दारू, जुगार यासारखे गुन्ह्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तालुक्यात मुलींच्या अपहरणाबरोबरच, मुली हरवण्याची संख्या वाढली आहे. किमान वर्षभरात दोनशे ते तीनशे मुली गायब होण्याची प्रकरणे करवीरमध्ये नोंद होताना पाहायला मिळत आहेत. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी केवळ ८५ कर्मचाऱ्यांना अग्निदिव्य पार पाडावे लागत आहे. तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे असले तरी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम सुरू आहे. सर्व कर्मचारी आपल्या कामाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. जनतेनेही गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अथवा गुन्हा रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.- दयानंद ठोमे, पोलीस निरीक्षक, करवीरकरवीरची लोकसंख्या व वाढणारे औद्योगिकीकरण यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सांगरूळ, माळ्याची शिरोली या पोलीस चौक्या पूर्ण क्षमतेने कार्यरत होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करू.- राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य, करवीरपोलीस कस्टडीची अवस्थाही वाईटमुळात करवीर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचणे म्हणजे दिव्य आहे. आरोपीसाठी असणारी कस्टडी, कार्यालय व त्यासाठी भौतिक सुविधांचा मोठा अभाव आहे. चौकीत प्रवेश करताना समोरच मुतारी असल्याने चौकीत नाक धरून जावे लागते.