शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

सर्व खातेदारांना ओव्हरड्राफ्ट नाही!

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

पंतप्रधान जन-धन योजना : २ लाख ४५ हजार ७४ जणांना रूपेकार्ड प्रदान

संदीप खवळे- मुंबई -पंतप्रधान जन-धन योजनेतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यात लीड बँकेअंतर्गत येणाऱ्या बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत २,५०,५८६ खाती खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी २,४५,०७४ जणांना रूपेकार्ड देण्यात आली आहेत. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ व्यवहार करणाऱ्या खातेदारांना पाच हजारांचा ओव्हरड्राफ्ट देण्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात मात्र सहा महिन्यांत खात्यावर जमा झालेल्या रकमेच्या पन्नास टक्के किमतीचा ओव्हरड्राफ्ट देण्याच्या सूचना बँकांना दिलेल्या आहेत़ त्यामुळे खातेधारकांना सरसकट पाच हजारांचा ओव्हरड्राफ्ट मिळणार नाही़ सहा महिन्यांत खातेधारकांच्या खात्यावर जेवढी रक्कम जमा झालेली आहे, त्या रक्कमेच्या बेरजेच्या पन्नास टक्के किंवा कमाल ५ हजार रुपये, असे या लाभाचे स्वरूप असल्याचे बँकांना पाठविलेल्या सूचनापत्रकावरू न दिसून आले आहे़ ओव्हरड्राफ्टची कमाल मर्यादा पाच हजार आहे़ सहा महिन्यांमध्ये पाच हजारांपेक्षा कमी पैसे खात्यावर जमा झालेल्या खातेधारकांना त्याचा फटका बसणार आहे़ केंद्राने ओव्हरड्राफ्टच्या रकमेसाठी हमी देण्याची घोषणा केली होती, पण अद्याप हमीबाबत सूचना नसल्यामुळे बँकांनी हात आखडता घेतल्याचे बँक सूत्रांकडून समजते. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मूलभूत बँकिंग पोहोचावे यासाठी पंतप्रधान जनधन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ आॅगस्ट २०१४ सुरू करण्यात आली. या योजनेस प्रत्यक्ष प्रारंभ २८ आॅगस्ट २०१४ रोजी झाला. या योजनेतंर्गत शून्य रकमेवर खाते उघडण्याची सुविधा आहे. याशिवाय खातेदारांना रूपे डेबिट कार्ड, एक लाख रुपयांचा अपघाती विमा, ३० हजार रुपयांचा जीवन विमा, डीबीटीएल आणि सहा महिन्यांनंतर पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट या सुविधांची तरतूद या योजनेत होती़ लीड बँकेतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी आणि ग्रामीण आदी ३३ बँकेच्या ५६० शाखांच्या माध्यमातून जनधन योजना जोमाने राबविण्यात आली. जूनअखेर जिल्ह्यात अडीच लाख खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेची मुदत ३० जूनऐवजी ३० आॅगस्टपर्यंत वाढविली आहे. जमेच्या ५० टक्के किमतीचा ओव्हरड्राफ्ट जनधन योजनेंतर्गत सहा महिने झालेल्या खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट देण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत़ बँकांकडून त्यांच्या स्तरावर ओव्हरड्राफ्ट देण्याचे काम सुरू आह़े सर्वांना सरसकट पाच हजार रूपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळणार नाही़ सहा महिन्यांत खातेधारकांच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेच्या पन्नास टक्के किंवा कमाल पाच हजार रकमेपर्यंतचा लाभ खातेधारकांना मिळणार आहे - एम. जी. कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक, कोल्हापूर