शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कुरुंदवाडच्या यात्रेस गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज

By admin | Updated: February 23, 2015 00:21 IST

प्रदर्शनाला उतरती कळा : ७० वर्षांपासून कृषी, पशू प्रदर्शनाची परंपरा

गणपती कोळी - कुरुंदवाड -पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील सर्वांत मोठे असलेल्या येथील कृष्णा वेणी यात्रेतील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व जनावरांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने सुमारे सत्तर वर्षांपूर्वीपासून सुरू असलेली पशू व कृषी प्रदर्शनाची परंपरा आजही सुरू आहे. या प्रदर्शनातील पशू तर गायब झालेच आहेत. मात्र, प्रदर्शनही नावापुरतेच राहिले आहे. पालिकेकडून या प्रदर्शनाचे नियोजन केले जात असून, याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी यात्रा समितीने लक्ष घालण्याची गरज आहे.यात्रा व प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, चिक्कोडी, अथणी, निपाणी, बेळगाव, आदी भागांतील शेतकरी बैलगाडीने यात्रेस येत. त्यांचा चार दिवस मुक्काम होत असे. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर या यात्रेचे नियोजन पालिकेकडे आले. यात्रा समितीकडून यात्रेकरूंची सर्व प्रकारची सोय केली जात असे.मात्र, परिस्थिती बदलली. प्रत्येक भागात शेती प्रदर्शन भरत असल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाने जनावरांची संख्याही घटत आहे. वाहतुकीची निर्माण झालेली साथ, साधने व माणसाला वेळही नसणे, आदी कारणांमुळे यात्रेबरोबरच पशू व कृषी प्रदर्शन केवळ नावापुरतेच राहिले आहे.प्रदर्शनामध्ये विक्रमी शेतीच्या पिकांचे नमुने ठरावीक शेतकरीच आणून ठेवत आहेत. बैलांची संख्याही घटली आहे. त्यामुळे पशू प्रदर्शन गायब झाले असून, केवळ औपचारिक पद्धतीने जातिवंत बैलांची निवड केली जाते. एकूणच जनावरांची घटती संख्या, जागेची कमतरता, नियोजनाचा अभाव, चाऱ्याची टंचाई, आदींमुळे प्रदर्शन लोप पावत असून, याला पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी पालिका पदाधिकारी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. यात्रेकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पशू व कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाग घेण्यासाठी आकर्षक बक्षीस योजना राबविणे, त्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांनी वेळ दिल्यास व नियोजनबद्ध, राजकारणविरहित उपक्रम राबविल्यास यात्रेतील पशू व कृषी प्रदर्शन पुन्हा कात टाकल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येक गावात कोणत्यातरी देवाच्या नावाने यात्रा भरवली जाते. मात्र, कुरुंदवाडमधील यात्रा याला अपवाद आहे. कृष्णाकाठी असलेल्या या शहरात प्रत्येकवर्षी महाशिवरात्रीनिमित्त कृष्णावेणी यात्रा भरविण्याची पद्धत संस्थान काळापासून चालू आहे. पूर्वी शेती प्रदर्शन भरले जात नव्हते अन् कुरुंदवाड हे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान व्हावे, विक्रमी उत्पन्न घेतलेल्या पिकांचे दर्शन व्हावे, जातिवंत बैल, गाय, म्हैस व शेळ्यांची प्रदर्शनाच्या माध्यमातून खरेदी-विक्री व्हावी या उद्देशाने येथील चिंतामणराव पटवर्धन सरकारांकडून १९४३ पासून पंचगंगा-कृष्णा घाट रस्त्यावर सुमारे दीडशे एकर क्षेत्रावर हे प्रदर्शन भरवले जात होते.