शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बिगरशेती रद्दचा प्रशासनाचाही नकार

By admin | Updated: June 1, 2014 01:30 IST

‘आयआरबी’ला दिलेली जागा : कृती समिती गप्पच

कोल्हापूर : ‘आयआरबी’ला देण्यात आलेल्या टेंबलाईवाडी येथील जागेचा बिगरशेती दाखला चुकीच्या पद्धतीने तसेच खोट्या माहितीच्या आधारे देण्यात आल्याचे टोलविरोधी कृती समितीने कागदोपत्री पुरावे सादर केल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने तक्रार करणारे हितसंबंधी पक्षकार नाहीत, असे कारण देत बिगरशेती दाखला रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही आता आयआरबीच्या प्रभावाखाली काम करीत असल्याचे यावरून अधोरेखीत झाले. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी महिन्यापूर्वीच हा निकाल दिला असताना कृती समितीने तातडीने प्रतिक्रिया का दिली नाही, असा सवाल कृती समितीमधील काही सहकारी उपस्थित करीत आहेत. आरआरबी कंपनीने केलेला करार चुकीचा आहे, टेंबलाईवाडी येथे दिलेली जागा कशी चुकीच्या पद्धतीने दिली, या जागेचा बिगरशेती दाखला कसा खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिला, याचा पर्दाफाश सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने वेळोवेळी केला. टेंबलाईवाडी जागेचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने कसे उठविले, याची सर्व माहिती समाजासमोर आणली होती. तरीही महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासन आयआरबीला पाठीशी घालत असल्याचे कोल्हापूरकरांनी पाहिले. टेंबलाईवाडी येथील जागेवर असणारे टिंबर मार्केटचे आरक्षण उठवून आणि तेथील नाला नकाशावरून गायब करून बिगरशेती दाखला घेतला. कृती समितीने याबाबत काही कागदपत्रे मागवली होती. त्यावरून बिगरशेतीसाठी खोटी माहिती पुरविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कृती समितीने जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे व माहिती देऊन बिगरशेती दाखला रद्द करावा अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी माने यांनी मागविलेल्या वस्तुनिष्ठ अहवालावरून बिगरशेतीसाठी राबविणारी प्रक्रिया चुकीची होती हे स्पष्ट झाले. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने जबाबदारी झटकली. तक्रार अर्ज करणारे हितसंबंधी पक्षकार नाहीत, असे कारण देत बिगरशेती दाखला रद्द करण्यास जिल्हा प्रशासनाने नकार दिला आहे. (प्रतिनिधी)