शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

मानधन पंचवीस रूपये...

By admin | Updated: July 24, 2015 00:40 IST

प्रतिष्ठेसाठी लाखोंची उधळपट्टी

सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे -लाखो रुपये खर्चून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मानधनापोटी दरमहा मिळतात अवघे पंचवीस रुपये, तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी चढाओढी काही कमी नाहीत. निवडणुकीच्या चुरशीत विकासकामांच्या चर्चेला तिलांजली मिळते. त्यामुळे गावभागातील महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच कायम राहिलेले आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा ‘श्री गणेशा’ करणारा कार्यकर्ता स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किती मोजेल याचा काही नेम नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक विकासकामांसाठी लढविली जाते की प्रतिष्ठेसाठी, असा प्रश्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून पुढे येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील आणि गटातील ताकद दाखविणाऱ्या असतात. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांचे या निवडणुकीत बारकाईने लक्ष असते. अलीकडील काही वर्षांत कोणत्याही निवडणुकीत बऱ्यापैकी पैसा असेल, तर जिंकणे सोपे होते, असा समज रुळला आहे. वारेमाप खर्चामुळे निवडणूूक म्हटले की, सामान्य कार्यकर्त्याला धडकी भरते. त्यामुळे गटाला उमेदवार मिळविताना गटनेत्यांची दमछाक होते. गावभागात विभागलेल्या पाचशे हजारांच्या प्रभागात लाखोंची उधळपट्टी करावी लागते. गावच्या विकासाचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असावी, असे गावातील गट नेत्यांना वाटत असते. त्यासाठी गटनेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. ग्रामपंचायतीच्या सदस्याने दरमहा सभेला उपस्थिती दर्शविली, तरच पंचवीस रुपये मानधन मिळते. वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने विकास निधी मिळाला, तरच गावातील प्रभागाचा विकास, अन्यथा सारा गाव भकास. सरकारच्या पातळीवर मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा गटनेत्यांच्या मर्जीतील सदस्याला मिळतात. त्यामध्ये सदस्यांची चढाओढ असते. अनेक सदस्य ग्रामपंचायतीच्या मासिक उपस्थितीचे सोडाचं, ग्रामसभेला बोलतच नाहीत. सदस्य म्हणून निवडून आलो आहे, गावात ‘पुढारी’पणाचा बाज ठेवत मिरविण्यात पुढे असतात. सत्तेत सहभागी नसणाऱ्या सदस्यांची अवस्था म्हणजे ‘असून घोटाळा, नसून खोळंबा’ अशीच असते. म्हणून ती मिळविण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याची प्रवृत्ती अलीकडच्या निवडणुकीत बळावली आहे. गावातील सत्ता जरूर मिळवा; परंतु ती मिळविण्यासाठी जेवढी ताकद लावता त्यांच्या निम्मी ताकद जर आपल्या प्रभागातील प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी लावली, तर प्रभागाचा विकास तर होईलच शिवाय निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वारेमाप खर्चाला लगाम मिळेल. पंचवीस रुपयांच्या मानधनासाठी की स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या उमेदवारांपुढे समाजसेवा करून निवडणूक लढविणारा सामान्य कार्यकर्ता अर्थिक कोंडमाऱ्यामुळे हताश होऊन प्रचार करीत आहे.