शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मानधन पंचवीस रूपये...

By admin | Updated: July 24, 2015 00:40 IST

प्रतिष्ठेसाठी लाखोंची उधळपट्टी

सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे -लाखो रुपये खर्चून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मानधनापोटी दरमहा मिळतात अवघे पंचवीस रुपये, तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी चढाओढी काही कमी नाहीत. निवडणुकीच्या चुरशीत विकासकामांच्या चर्चेला तिलांजली मिळते. त्यामुळे गावभागातील महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच कायम राहिलेले आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा ‘श्री गणेशा’ करणारा कार्यकर्ता स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किती मोजेल याचा काही नेम नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक विकासकामांसाठी लढविली जाते की प्रतिष्ठेसाठी, असा प्रश्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून पुढे येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील आणि गटातील ताकद दाखविणाऱ्या असतात. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांचे या निवडणुकीत बारकाईने लक्ष असते. अलीकडील काही वर्षांत कोणत्याही निवडणुकीत बऱ्यापैकी पैसा असेल, तर जिंकणे सोपे होते, असा समज रुळला आहे. वारेमाप खर्चामुळे निवडणूूक म्हटले की, सामान्य कार्यकर्त्याला धडकी भरते. त्यामुळे गटाला उमेदवार मिळविताना गटनेत्यांची दमछाक होते. गावभागात विभागलेल्या पाचशे हजारांच्या प्रभागात लाखोंची उधळपट्टी करावी लागते. गावच्या विकासाचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असावी, असे गावातील गट नेत्यांना वाटत असते. त्यासाठी गटनेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. ग्रामपंचायतीच्या सदस्याने दरमहा सभेला उपस्थिती दर्शविली, तरच पंचवीस रुपये मानधन मिळते. वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने विकास निधी मिळाला, तरच गावातील प्रभागाचा विकास, अन्यथा सारा गाव भकास. सरकारच्या पातळीवर मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा गटनेत्यांच्या मर्जीतील सदस्याला मिळतात. त्यामध्ये सदस्यांची चढाओढ असते. अनेक सदस्य ग्रामपंचायतीच्या मासिक उपस्थितीचे सोडाचं, ग्रामसभेला बोलतच नाहीत. सदस्य म्हणून निवडून आलो आहे, गावात ‘पुढारी’पणाचा बाज ठेवत मिरविण्यात पुढे असतात. सत्तेत सहभागी नसणाऱ्या सदस्यांची अवस्था म्हणजे ‘असून घोटाळा, नसून खोळंबा’ अशीच असते. म्हणून ती मिळविण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याची प्रवृत्ती अलीकडच्या निवडणुकीत बळावली आहे. गावातील सत्ता जरूर मिळवा; परंतु ती मिळविण्यासाठी जेवढी ताकद लावता त्यांच्या निम्मी ताकद जर आपल्या प्रभागातील प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी लावली, तर प्रभागाचा विकास तर होईलच शिवाय निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वारेमाप खर्चाला लगाम मिळेल. पंचवीस रुपयांच्या मानधनासाठी की स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या उमेदवारांपुढे समाजसेवा करून निवडणूक लढविणारा सामान्य कार्यकर्ता अर्थिक कोंडमाऱ्यामुळे हताश होऊन प्रचार करीत आहे.