शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘दरडींच्या खिंडी’त अडकले महाबळेश्वर!

By admin | Updated: August 5, 2014 23:40 IST

सत्र सुरूच : अंबेनळी, पसरणी, केळघर घाटात कोसळली दरड

सचिन काकडे -- सातारा महाबळेश्वरला येण्यासाठी पसरणी, केळघर आणि अंबेनळी असे तीन घाट आहेत. पावसाळ्यात कोणत्या न कोणत्या घाटात दरवर्षी दरड कोसळत असते; परंतु यावर्षी चक्क तिन्ही घाटांमध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरू असून याचा महाबळेश्वरच्या पर्यटन व दळणवळणावर परिणाम होत आहे. त्यामुळे दरडींच्या खिंडीत अडकले महाबळेश्वर असे म्हणण्याची वेळ आली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर मान्सूनने जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच आपला रुद्रावतार प्रकट केला, तो अद्याप सुरूच आहे. बारमाही हंगाम असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. महाबळेश्वरला येण्यासाठी पसरणी, केळघर आणि अंबेनळी असे तीन घाट आहेत. वाई-पाचगणी मार्गावर असणारा वाई घाट वगळता तर अन्य दोन्ही घाट वाहतुकीसाठी धोकादायक मानले जातात. अरुंद रस्ता, चढ-उतार आणि नागमोडी वळणे यामुळे या घाटांत सतत लहान-मोठे अपघात होत असतात. पावसाळा सुरू होताच दरवर्षी कोणत्या न कोणत्या घाटामध्ये दरड कोसळत असते; परंतु यावर्षी चक्क तिन्ही घाटामंध्ये दरड कोसळली आहे. हे सत्र सुरू असून याचा महाबळेश्वरच्या दळण-वळण आणि पर्यटनावर परिणाम होत आहे. कोकणातून येणारे बहुतांश पर्यटक हे अंबेनळी घाटातून महाबळेश्वरला येतात. या मार्गावर एसटी वाहतूक नेहमी सुरू असते. सोमवारी अंबेनळी घाटात दरड कोसळ्याने एसटीसह सर्व वाहतूक दोन दिवस बंद होती. काही दिवसांपूर्वी मेढा-महाबळेश्वर दरम्यान असणाऱ्या केळघर घाटात दरड कोसळली होती. याठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने पर्यटक व अन्य वाहन चालकांनी पर्याय म्हणून पसरणी घाटातून जाणे पसंत केले; परंतु याच दिवशी पसरणी घाटात देखील दरड कोसळली. परिणामी सर्वप्रकारची वाहतूक ठप्प झाल्याने याचा महाबळेश्वरच्या व्यापार, व्यवसाय, दळण-वळण अशा सर्वच गोष्टींवर प्रतिकूल परिणाम झाला. यावर्षी तिन्ही घाटांत दरडी कोसळण्याची बहुतांश ही पहिंलीच वेळ आहे. केळघर अथवा वाई घाटाची सद्यस्थिती पाहिली तर दोन्हीं ठिकाणी डोंगर उतारावर वृक्षांचे प्रमाण अत्यल्प आहे. डोंगरउतारावर वृक्षांमुळे मातीचे वहन थांबविले जाते. वृक्षांच्या मुळ्यांमुळे जमीन एकमेकांत घट्ट चिकटून राहते. त्यामुळे पावसाळ्यात भूस्खलन अथवा दरडी कोसळण्यासारख्या घटनांवर नियंत्रण येते. मात्र वृक्षच नसतील तर अशा घटना सतत घडत असतात. आणि हेच कारण सध्या या नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत ठरत आहे. - सुशील झाडे पर्यावरणपे्रमी, महाबळेश्वर सरासरी न गाठताही आपत्ती -महाबळेश्वरला गत वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. -जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर येथे जुलै महिन्यात पावसाला सुरूवात झाली. -३१ जुलै रोजी येथे सर्वाधिक ४३२ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. -यंदा पाच आॅगस्टपर्यंत एकूण ३९६६.३ मिमी तर गेल्या वर्षी याच दिवशी ५२३५ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वरला झाली होती. -गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस होऊनही दरडी कोसळतात, याला कारण वृक्षतोड हीच असल्याचा आरोपही पर्यावरणपे्रमींकडून केला जात आहे. -पाचगणी-वाई दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटातून सतत वाहतूक सुरू असते. दररोज शेकडो महाविद्यालयीन युवक या घाटातून मोटरसायकलींवर ये-जा करीत असतात. पाचगणीहून वाईकडे जाताना पूर्ण उतार असल्यामुळे काही युवक पेट्रोलची बचत करण्यासाठी गाडी बंद करुन प्रवास करतात. ४काही वेळेस खासगी वाहतूक करणारी वाहने देखील पेट्रोल बचतीसाठी ही पद्धत अवलंबतात. ४पावसामध्ये वाहनांचे आॅइल रस्त्यावर सांडल्याने रस्ते चिकट होतात. त्यामुळे वळणांवर वाहने स्लिप होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. अशा वेळी वाहनांवर नियंत्रण आणने देखील कठीण बनते. ४घाटात पेट्रोल बचत करणे धोक्याचे ठरत आहे. याकडे सर्वांनी गांर्भियाने लक्ष देणे गरजेचे आहे.