शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवली? कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:45 IST

वीजबिल सवलत प्रकरण अर्थसंकल्पात लघुउद्योजकाला ठेंगा इचलकरंजी : यंदाच्या अर्थसंकल्पात लघुउद्योजकाला कोणताही दिलासा मिळाला नाही तसेच सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी वीजतोडणीला ...

वीजबिल सवलत प्रकरण

अर्थसंकल्पात लघुउद्योजकाला ठेंगा

इचलकरंजी : यंदाच्या अर्थसंकल्पात लघुउद्योजकाला कोणताही दिलासा मिळाला नाही तसेच सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी वीजतोडणीला स्थगिती दिली होती. ती कोण उठविली? बेकायदेशीरपणे दांडगावा करून वीजतोडणी खपवून घेतली जाणार नाही, यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनात वेळ मिळाला नसल्याने सर्व प्रश्न टपालाने पाठविणार असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले होते. त्यामध्ये लघुउद्योग व यंत्रमाग उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना या अर्थसंकल्पात काहीतरी तरतूद केली जाईल, अशी आशा होती. परंतु सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. कृषी संजीवनी योजनेप्रमाणे औद्योगिक संजीवनी योजना राबवून यंत्रमाग व लहान उद्योजकांना दिलासा देणे आवश्यक आहे.

गरिबांना घरे देण्यासाठी राज्य शासनाची एकही योजना नाही. केंद्र सरकारच्या योजनेवरच सर्वजण अवलंबून असले तरी त्याचा सर्वांनाच लाभ मिळेल, असे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री घरकुल योजना सुरू करावी. महिलांना २५ लाखांपर्यंत कर्ज व व्याजदरात सात टक्क्यांची सवलत, अशी योजना द्यावी. औद्योगिक वसाहतीत लघु उद्योजकांना जागा द्यावी. वसाहतींच्या विकासासाठी निधी द्यावा, आदी मागण्या आहेत.

वीज सवलतीबाबतची घोषणा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांनी असे पाचवेळा केली; परंतु ती देण्यात आली नाही. त्यानंतर वीजजोडणी तोडण्याला स्थगिती देऊन याबाबत आंदोलकांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली होती. त्यावर ही स्थगिती कोण उठवली? आणि बेकायदेशीररित्या जोडणी तोडण्याचे काम सुरू करण्याचा आदेश कोण दिला, असा सवालही आवाडे यांनी केला.

चौकट

पाच टक्के सवलत लवकरच

शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणातील यंत्रमाग उद्योजकांना पाच टक्के सवलत झाली. ती मिळाली नाही. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर प्रलंबित असलेली सुमारे पाच कोटी रुपयांची ८५० प्रकरणे मुंबई मंत्रालयाकडे पोहोचली आहेत. ती लवकरच मंजूर करू, असे आश्वासन शासनाने दिले आहे. त्यावर मार्चअखेरपर्यंत मंजुरीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आवाडे यांनी सांगितले.