शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा --साखर कारखान्यांच्या राजकारणाचाच प्रभाव

By admin | Updated: October 3, 2014 00:34 IST

तीन तालुक्यांचा समावेश : पाच कारखान्यांसह १०३ वाड्यांनी व्यापलेला मतदारसंघ

राजाराम लोंढे - कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील १०३ वाड्यांनी हा मतदारसंघ व्यापला आहे. कार्यक्षेत्रातील पाच साखर कारखान्यांच्या सत्तेचे पडसाद या मतदारसंघात उमटत असतात. येथील निकाल हा कारखान्यांच्या राजकारणाभोवतीच फिरत असल्याने काटा लढत पाहावयास मिळते. पुनर्रचनेनंतर करवीरमध्ये दुसरी लढत होत असून, गेले लढतीत पी. एन. पाटील यांचा निसटता पराभव झाला होता; पण पाच वर्षांत अनेक संदर्भ बदलल्याने ही लढत रंगतदार होणार हे निश्चित आहे. जुन्या करवीर मतदारसंघातील ३४ गावे, जुन्या सांगरूळमधील ६० गावे, पन्हाळ्यातील ६२ गावे व गगनबावडा तालुका असा करवीर मतदारसंघ २००९ला तयार झाला. या मतदारसंघात ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘राजाराम’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’ व ‘ दत्त-आसुर्ले’ या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र येते. चंद्रदीप नरके, पी. एन. पाटील, संपतराव पवार, विनय कोरे, सतेज पाटील, पी. जी. शिंदे, महादेवराव महाडिक, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांना मानणारे गट कार्यरत आहेत. पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच २००९ च्या निवडणुकीत येथे चंद्रदीप नरके व पी. एन. पाटील यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने घेतलेली दुटप्पी भूमिका, नरके यांनी तीन वर्षे घेतलेली मेहनत व पाटील यांनी फारशी गांभीर्याने न घेतलेली निवडणूक या सर्व कारणाने नरकेंनी बाजी मारली. यावेळी पाटील व नरके यांच्याबरोबर जनसुराज्य-शेकापचे राजू सूर्यवंशी यांनी दंड थोपटले आहेत. सध्या राष्ट्रवादीने सूर्यवंशी यांना पाठिंबा दिला असला तरी हा पाठिंबा देताना मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येत धनंजय महाडिक यांना ३३ हजारांचे मताधिक्य दिले होते. दोन्ही कॉँग्रेसबरोबर ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके सोबत होते. आता सर्वच समीकरणे बदलल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. करवीर तालुक्यातील बहुतांश गावे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे या गावांच्या फारशा अपेक्षाही नसतात. येथील मतदान हे स्थानिक राजकारण व गटातंर्गतच होत असते. शहरालगतची गावे असल्याने करवीरमध्ये शक्यतो बेरोजगारीचा प्रश्न दिसत नाही; पण गगनबावडा तालुक्यात डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना सोडला, तर एकही नवीन प्रकल्प उभा राहिला नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. अजूनही येथील शेतकरी पारंपरिक शेतीवरच अवलंबून आहे. पाच वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा याचे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागलेले आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांवर अजूनही पाणी व रस्त्यांसारखे मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला धामणी प्रकल्प गेले अनेक वर्षे रेंगाळलेला आहे. गेल्या निवडणुकीत तिन्ही उमेदवारांच्या अजेंठ्यावर धामणी प्रकल्प होता; पण त्याचा फारसा पाठपुरावा झालेला दिसत नाही. जिल्हा परिषद बलाबलविमल पाटील, शशिकला रोटे, शांताबाई कांबळे (कॉँग्रेस-‘पी. एन.’समर्थक), विलास पाटील, एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, सुजाता पाटील (शिवसेना), मानसिंग पाटील (जनसुराज्य), मेघाराणी जाधव (राष्ट्रवादी), प्रिया वरेकर (काँग्रेस-सतेज पाटील समर्थक) व बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघ - सुवर्णा पाटील (शिवसेना).पंचायत समितीची सत्ता - करवीर- कॉँग्रेस, गगनबावडा-काँग्रेस (सतेज पाटील गट) सहकारात काँग्रेसचा दबदबाकरवीर मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा व पतसंस्थांवर निर्विवाद पी. एन. पाटील यांच्या गटांचे वर्चस्व आहे. ‘गोकुळ’ संचालकअरुण नरके (शिवसेना), विश्वास पाटील, सुरेश पाटील, निवास पाटील (कॉँग्रेस-‘पी. एन.’ समर्थक), बाबासाहेब चौगुले (कॉँग्रेस-सतेज पाटील समर्थक).बँका/कारखानेकुंभी बँक - चंद्रदीप नरके गट, यशवंत बँक - पी. एन. पाटील समर्थक.साखर कारखाने-भोगावती - राष्ट्रवादी काँग्रेसकुंभी - शिवसेनाडी. वाय. पाटील - काँग्रेसदत्त-आसुर्ले - दालमिया शुगर्सराजाराम - काँग्रेसविधानसभा मतदारसंघ क्रमांक २७५एकूण मतदारसंघ २ लाख ८८ हजार १७५जुना करवीर ९१ हजार ४९१जुना सांगरुळ १ लाख ४ हजार ५५७पन्हाळा६४ हजार ७९६गगनबावडा २४ हजार ९४१महिला मतदार १ लाख ३५ हजार ९६६पुरुष मतदार १ लाख ५१ हजार ४९२इतर १सर्व्हिस मतदार (महिला)२०८सर्व्हिस मतदार (पुरुष)४८७

 

निर्णायक मतांची गावेवडणगे१०२१०वाकरे ४४०७शिंगणापूर४२९५खुपिरे ४८८४प्रयाग चिखली४५१६शिये ६२५४निगवे दुमाला४७२२बालिंगा ३८९४सांगरुळ६६२२कसबा बीड ३०८९शिरोली दुमाला४२८१वाशी३८४४म्हाळुंगे ३३२३गगनबावडा१४७७यवलूज४५८०पडळ २९५८माजनाळ २२१३