शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

किसानसभेचा २६ मार्चला भारत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:21 IST

कोल्हापूर : शेतकरी विरोधातील तीन कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी २६ मार्चला भारत बंद पुकारण्यात आला ...

कोल्हापूर : शेतकरी विरोधातील तीन कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी २६ मार्चला भारत बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उदय नारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने या प्रश्नांसोबतच तीन महिन्यांचे वीजबिल तातडीने माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी भारत बंद यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नारकर म्हणाले, गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांवर वीजबिलाचा बोजा पडला आहे. घरगुती वीज ग्राहक आर्थिक विवंचनेमुळे अगोदरच मेटाकुटीला आला आहे. यामध्येच विजेचा अनावश्यक आणि न परवडणारा बोजा सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन केला. जूनपर्यंत कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे जनतेचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. यामुळे जनतेला त्याची आर्थिक शिक्षा करणे योग्य नाही. मोदी सरकारने २० लाख कोटींची मदत जाहीर केली होती. यातून वीजग्राहकांना सवलत देणे शक्य आहे. मार्च ते जूनचे वीजबिल संपूर्ण माफ झाले पाहिजे. यासाठी आवश्यक असलेले सहा हजार कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली पाहिजे. केंद्राने मदत केली नाही तर राज्य शासनाने त्याची तरतूद करावी. केरळसह अन्य राज्य जर लॉकडाऊनमधील वीजबिल माफ करू शकतात तर महाराष्ट्र का नाही. या पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. सुभाष जाधव, अमोल नाईक, आप्पा परीट, संदेश जाधव आदी उपस्थित होते.