शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

किसानसभेचा २६ मार्चला भारत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:21 IST

कोल्हापूर : शेतकरी विरोधातील तीन कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी २६ मार्चला भारत बंद पुकारण्यात आला ...

कोल्हापूर : शेतकरी विरोधातील तीन कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी २६ मार्चला भारत बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उदय नारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने या प्रश्नांसोबतच तीन महिन्यांचे वीजबिल तातडीने माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी भारत बंद यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नारकर म्हणाले, गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांवर वीजबिलाचा बोजा पडला आहे. घरगुती वीज ग्राहक आर्थिक विवंचनेमुळे अगोदरच मेटाकुटीला आला आहे. यामध्येच विजेचा अनावश्यक आणि न परवडणारा बोजा सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन केला. जूनपर्यंत कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे जनतेचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. यामुळे जनतेला त्याची आर्थिक शिक्षा करणे योग्य नाही. मोदी सरकारने २० लाख कोटींची मदत जाहीर केली होती. यातून वीजग्राहकांना सवलत देणे शक्य आहे. मार्च ते जूनचे वीजबिल संपूर्ण माफ झाले पाहिजे. यासाठी आवश्यक असलेले सहा हजार कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली पाहिजे. केंद्राने मदत केली नाही तर राज्य शासनाने त्याची तरतूद करावी. केरळसह अन्य राज्य जर लॉकडाऊनमधील वीजबिल माफ करू शकतात तर महाराष्ट्र का नाही. या पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. सुभाष जाधव, अमोल नाईक, आप्पा परीट, संदेश जाधव आदी उपस्थित होते.