शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गुणवत्ता कायम राखत ‘ग्लोबल’ झेप घ्यावी

By admin | Updated: January 29, 2015 00:53 IST

एन. जे. पवार : निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य केली

संतोष मिठारी-कोल्हापूर -कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव यशस्वी करणे आणि विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे ही उद्दिष्टे बाळगली होती. विद्यापीठाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन ही उद्दिष्टे साध्य केली. शिवाय देशात विद्यापीठाला गुणवत्तेसह लौकिक मिळवून दिला. गुणवत्तेसह लौकिकाचे स्थान कायम राखत विद्यापीठाने ‘ग्लोबल’ झेप घ्यावी, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी व्यक्त केली.विद्यापीठाचा ५१ वा दीक्षान्त समारंभ उद्या, गुरुवारी होणार आहे. कुलगुरू डॉ. पवार यांच्या कारकिर्दीतील हा त्यांचा अखेरचा दीक्षान्त समारंभ. त्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत विद्यापीठातील कामगिरीचे विविध पैलू त्यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून उलघडले.‘ग्रामीण चेहरा असलेले विद्यापीठ’, नाव घेताच वेगळ्या नजरेने पाहण्याचा विद्यार्थ्यांना आलेला अनुभव, केली जाणारी कुचेष्टा, या विद्यापीठाची पदवी असेल, तर नोकरी देताना दिली जाणारी बगल, अशा स्वरूपातील विद्यापीठाबाबतचे गैरसमज दूर करणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक, संशोधनाला गती देणे, आदी स्वरूपातील आव्हाने कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्यासमोर होती, असे डॉ. पवार यांनी सांगितले. अशा स्थितीत बदलत्या काळाची गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्रचना, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक प्रणाली, भक्कम प्रशासकीय कामकाज, संशोधनात वेगळेपण, आदींच्या माध्यमातून प्रशासन, यंत्रणा कार्यान्वित केली. २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळवायचे, या ध्येयाने विद्यापीठातील प्रत्येक घटकाने तयारी केली. नवीन अभ्यासक्रम, अंतर्गत सुविधा, अध्यायन-अध्यापन आणि मूल्यमापन, आदी मुद्द्यांवर सरस कामगिरी करत सर्वाधिक गुणांकनासह ‘अ’ मानांकन पटकाविले. गुणवत्ता सिद्ध करत राज्यातील अन्य विद्यापीठांना मागे टाकत विविध स्वरूपांतील असलेले गैरसमज पुसून टाकले आहेत. गुणवत्तेच्या स्पर्धेत विद्यापीठ उतरले आहे. कार्यभार स्वीकारला त्या दिवसापासून ‘लोकल टू ग्लोबल’ असे ध्येय घेऊन काम करण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यावर ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळाले. बदलत्या परिस्थितीचा वेध घेऊन शिवाजी विद्यापीठाने ‘ग्लोबल’ झेप घ्यावी. शिवाय गुणवत्तेबाबतचे स्थान कायम राखावे, अशी या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि येथून निरोप घेतानाची माझी अपेक्षा असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.‘सुवर्ण महोत्सवी’ निधीची खंत...विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव धडाक्यात साजरा झाला. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविले. शिवाय राज्य शासनाकडून ४५ कोटींचा विशेष निधी विद्यापीठाला जाहीर झाला; पण राज्य शासनाकडून जाहीर झालेला सुवर्णमहोत्सवी निधी पूर्णपणे माझ्या कारकिर्दीत मिळाला नाही. त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत असल्याची खंत डॉ. पवार यांनी व्यक्त केली. कुलगुरूंची कामगिरीगेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची भरती करून शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेला ‘बुस्ट’ दिले.जैवतंत्रज्ञान विभागाला बळ दिल्याने देशातील ‘टॉप टेन’मध्ये या विभागाने स्थान पटकविले. विविध संशोधनविषयक उपक्रम राबविल्याने विद्यापीठाने संदर्भमूल्याधिष्ठित संशोधनात १४ वे स्थान पटकाविले.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानातून मनुष्यबळ, स्वयंअध्ययन साहित्य निर्मितीसाठी दूरशिक्षण केंद्राला बळ दिले.पन्हाळगडावरील अवकाश संशोधन केंद्राद्वारे विद्यापीठाच्या नव्या विद्याशाखेचा प्रारंभ.राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी सामंजस्य करार करून विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना अभिनव व नावीन्यपूर्ण संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली. तीन महिने चालणाऱ्या परीक्षांचा कालावधी ६० दिवसांवर आणून परीक्षा विभागाने वेळ, पैशांच्या बचतीचे पाऊल टाकले. ग्रीन आॅडिट, वॉटर आॅडिट व ‘नो व्हेईकल डे’, क्रांतिवनाच्या अद्ययावतीकरणातून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केले. प्रशासन, परीक्षा प्रक्रियेत ‘आयटीसी’चा वापर वाढविला.