शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

चला जपूया जंगल, पाणवठे, पक्षी, प्राणी...

By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST

मोनेरा फौंडेशनची मोहीम : जंगलातील पाणवठे केले पुनर्जिवित; मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न

आंबा : ठिकाण वाघझऱ्या परिसरातील भिवतळीचे जंगल. पंधरा तरुणांचा ग्रुप हातात फावडे, कुदळ घेऊन जंगल कपारीतील पाण्याचा जिंवत झरा मोकळा करीत होते. दगड-गोटे, पाला अन् मातीने मुजलेले पाणवठे मोकळे करून पाणी वाहते करीत होते. या तरुणांनी दोन दिवसांत सहा पाणवठे पुनर्जीवित केले. निमित्य होते मोनेरा फौंडेशनच्या ‘चला जपुया जंगली पाणवठे’, या उपक्रमाचे. मोनेराच्या निसर्गप्रेमींनी परीक्षेचा शीण थेट जंगलातील पाणवठे पुनर्जीवित करण्यासाठी घालवला. जंगली प्राणी पाण्यासाठी मानवी वस्ती, शेतीत न येता जंगलातील पाणवठ्यांवरच स्थिर राहावेत, तसेच माणूस व प्राण्यांतील संघर्षाची तीव्रता कमी व्हावी म्हणून हा या निसर्गप्रेमींचा विधायक उपक्रम गेली दोन वर्षे चालू आहे. पर्यावरण अभ्यासक प्रमोद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य बेर्डे, प्रा. सुनील पाटील, वैभव पाटील, रेश्मा पाटील, रोहित पाटील, स्वप्निल सणगर, धनंजय अवसरे, स्वरूप अवसरे, हेंमत देशमुख, ओंकार चव्हाण, डॉ. योगेश फोंडे, संदीप वडर, विनोद ढोके, प्रथमेश शेळके, आदी मोनेरा फौंडेशनच्या सदस्यांनी चाळणवाडी येथील बाध्याचे पाणी व जखिणीचे पाणी, वाघझऱ्याजवळील पाथरझरा, माकडीणीचे तळे, आंबाघाटातील गायकुंड, आदी पाणवठे, तर रानडुकरांना उन्हात लोळण घेण्यासाठी मढबाथ तयार केले आहेत. येथे जंगली प्राणी, पक्षी चिखलात लोळून व मनसोक्त पाणी पिऊन उन्हाच्या झळा कमी करतात. याबाबत प्रमोद माळी म्हणाले, विविध टप्प्यांतील पाणवठ्यावर विविध प्रकारच्या पक्षी व प्राण्यांची तहान भागते. यांचा सर्व्हे करून त्यांची पुनरनिर्मिती हाती घेतली. यामुळे आता सर्व झरे नियमित पाझरू लागले असून, पाण्याची साठवण झाली आहे. धोपेश्वर परिसरातील बॉक्साईट उत्खननामुळे आंबा-विशाळगड जंगलाकडे सरकलेल्या पशु-पक्षांची तहाण या पाणवठ्यांवर भागत आहे. जंगल व्यवस्थापनासाठी स्थानिक वनसमित्या व पर्यावरणप्रेमी संघटनांची मदत मोलाची ठरत आहे. गरज प्राण्यांच्या गरजा जाणण्याचीमोनेरा फौंडेशन, सह्याद्री लोकविकास संस्था व वसुंधरा नेचर क्लब यांनी पाणवठे संवर्धनाचा प्रस्ताव कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांना मार्च महिन्यात सादर केला. प्राण्यांना जंगलातच पाणी व अन्न मिळाले, तर ते शेती व मानवी वस्तीकडे वळणार नाहीत. परिणामी माणूस व जंगली प्राणी असा संघर्ष नाहीसा होईल. त्यासाठी या प्रस्तावाबाबत वनविभागाने लक्ष वेधण्याची गरज आहे. जंगलतोड, वणवे व बॉक्साईटच्या उत्खननामुळे चारा व पाणी कमी झाल्याने गवे, डुक्कर कळपाने शेतीकडे मोर्चा वळवित आहेत.त्यामुळे जंगलालगतची शेती थांबली आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे प्राण्याचे हाल होत आहेत. प्राणीगणनेपुढे जाऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारे ठोस उपक्रम वनविभागाने हाती घेण्याची गरज आहे