शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

चला जपूया जंगल, पाणवठे, पक्षी, प्राणी...

By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST

मोनेरा फौंडेशनची मोहीम : जंगलातील पाणवठे केले पुनर्जिवित; मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न

आंबा : ठिकाण वाघझऱ्या परिसरातील भिवतळीचे जंगल. पंधरा तरुणांचा ग्रुप हातात फावडे, कुदळ घेऊन जंगल कपारीतील पाण्याचा जिंवत झरा मोकळा करीत होते. दगड-गोटे, पाला अन् मातीने मुजलेले पाणवठे मोकळे करून पाणी वाहते करीत होते. या तरुणांनी दोन दिवसांत सहा पाणवठे पुनर्जीवित केले. निमित्य होते मोनेरा फौंडेशनच्या ‘चला जपुया जंगली पाणवठे’, या उपक्रमाचे. मोनेराच्या निसर्गप्रेमींनी परीक्षेचा शीण थेट जंगलातील पाणवठे पुनर्जीवित करण्यासाठी घालवला. जंगली प्राणी पाण्यासाठी मानवी वस्ती, शेतीत न येता जंगलातील पाणवठ्यांवरच स्थिर राहावेत, तसेच माणूस व प्राण्यांतील संघर्षाची तीव्रता कमी व्हावी म्हणून हा या निसर्गप्रेमींचा विधायक उपक्रम गेली दोन वर्षे चालू आहे. पर्यावरण अभ्यासक प्रमोद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य बेर्डे, प्रा. सुनील पाटील, वैभव पाटील, रेश्मा पाटील, रोहित पाटील, स्वप्निल सणगर, धनंजय अवसरे, स्वरूप अवसरे, हेंमत देशमुख, ओंकार चव्हाण, डॉ. योगेश फोंडे, संदीप वडर, विनोद ढोके, प्रथमेश शेळके, आदी मोनेरा फौंडेशनच्या सदस्यांनी चाळणवाडी येथील बाध्याचे पाणी व जखिणीचे पाणी, वाघझऱ्याजवळील पाथरझरा, माकडीणीचे तळे, आंबाघाटातील गायकुंड, आदी पाणवठे, तर रानडुकरांना उन्हात लोळण घेण्यासाठी मढबाथ तयार केले आहेत. येथे जंगली प्राणी, पक्षी चिखलात लोळून व मनसोक्त पाणी पिऊन उन्हाच्या झळा कमी करतात. याबाबत प्रमोद माळी म्हणाले, विविध टप्प्यांतील पाणवठ्यावर विविध प्रकारच्या पक्षी व प्राण्यांची तहान भागते. यांचा सर्व्हे करून त्यांची पुनरनिर्मिती हाती घेतली. यामुळे आता सर्व झरे नियमित पाझरू लागले असून, पाण्याची साठवण झाली आहे. धोपेश्वर परिसरातील बॉक्साईट उत्खननामुळे आंबा-विशाळगड जंगलाकडे सरकलेल्या पशु-पक्षांची तहाण या पाणवठ्यांवर भागत आहे. जंगल व्यवस्थापनासाठी स्थानिक वनसमित्या व पर्यावरणप्रेमी संघटनांची मदत मोलाची ठरत आहे. गरज प्राण्यांच्या गरजा जाणण्याचीमोनेरा फौंडेशन, सह्याद्री लोकविकास संस्था व वसुंधरा नेचर क्लब यांनी पाणवठे संवर्धनाचा प्रस्ताव कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांना मार्च महिन्यात सादर केला. प्राण्यांना जंगलातच पाणी व अन्न मिळाले, तर ते शेती व मानवी वस्तीकडे वळणार नाहीत. परिणामी माणूस व जंगली प्राणी असा संघर्ष नाहीसा होईल. त्यासाठी या प्रस्तावाबाबत वनविभागाने लक्ष वेधण्याची गरज आहे. जंगलतोड, वणवे व बॉक्साईटच्या उत्खननामुळे चारा व पाणी कमी झाल्याने गवे, डुक्कर कळपाने शेतीकडे मोर्चा वळवित आहेत.त्यामुळे जंगलालगतची शेती थांबली आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे प्राण्याचे हाल होत आहेत. प्राणीगणनेपुढे जाऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारे ठोस उपक्रम वनविभागाने हाती घेण्याची गरज आहे