शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

माहिती अधिकारात ‘बांधकाम’चा सावळागोंधळ

By admin | Updated: March 12, 2015 23:55 IST

एकाच योजनेची दोघांना दिली वेगळी माहिती : शिरढोण, टाकवडे पाणी योजनेतील नुकसानभरपाईच्या रकमेत तफावत

कुरूंदवाड : राष्ट्रीय ग्रामीण नळ  पाणीपुरवठा योजनेतून शिरढोण व टाकवडे (ता. शिरोळ) गावांसाठी कृष्णा नदीतून पाणी योजनेचे काम सुरू आहे. या पाईपलाईनसाठी रस्त्याची खुदाई केल्याने नुकसान भरपाईपोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दोघा तक्रारदारांना वेगवेगळी माहिती दिली आहे. यामध्ये तब्बल ३० लाख रूपयांचा फरक असून यातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यापासून सुटका मिळावी व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शिरढोण व टाकवडे गावाला कृष्णा नदीतून पाणी योजना केली जात आहे. दोन गावांसाठी स्वतंत्र योजना असताना एकाच चरीतून केलेली पाईपलाईन, निविदेप्रमाणे कामात त्रुटी, अशा विविध कारणांतून ही योजना गाजत असून, योजनेचे काम रडत-खडत चालू आहे. मात्र, याचा विरोध अद्याप संपला नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नुकसान भरपाईच्या सावळागोंधळाने वादात भर पडली आहे. या योजनेतील पाईपलाईनसाठी रस्त्याकडेने खुदाई केल्याने रस्त्याचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या रस्त्याच्या नुकसान भरपाई पोटी किती रकमेचा दंड करण्यात आल्याची माहिती टाकवडे येथील मारूती जनवाडे यांनी माहिती अधिकारात २२ आॅगस्ट २०१४ ला मागणी केल्यानुसार जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाने कुरूंदवाड ते शिरढोण २४०० मीटर व कुरूंदवाड ते टाकवडे ८५०० मीटर असा एकूण दहा हजार ९०० मीटर रस्त्याचे नुकसान झाले असून, प्रत्येक मीटरला २७५ प्रमाणे २९ लाख ९७ हजार पाचशे रुपयांसह एकूण ३२ लाख १५ हजार ५०३ रूपये दंड केला. तर सदाशिव पाटील यांनी २० जानेवारी १५ ला बांधकाम विभाग कोल्हापूरकडे मागणी केल्यानंतर रस्त्याचे केवळ ५० मीटरच नुकसान झाले असून दोन लाख २५ हजार ५६३ रूपये दंड आकारल्याचे माहिती दिली आहे.पाणीपुरवठा विभागात प्रत्यक्षात एक लाख ३३ हजार ९६३ रूपये सार्वजनिक विभागाकडे भरले आहेत. एकाच विभागाने माहिती अधिकारातून दोन वेगवेगळ्या दंडात्मक कारवाईची माहिती दिल्याने तसेच त्यामध्ये तब्बल ३० लाखांचा फरक असल्याने नुकसान अचानक कमी होण्यामध्ये काय गौडबंगाल आहे, असा सवाल आंदोलनकर्ते करत आहेत. त्यामुळे यामध्ये काहीतरी पाणी मुरत असल्याचा आरोप करत योजनेविरोधी आंदोलनकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून सार्वजनिक बांधकाम विभागालाच धारेवर धरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)...तर आमचा विरोधचगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पाणी योजना महत्त्वाची आहे. केवळ योजना पूर्ण होण्यापेक्षा ती टिकावू होणे गरजेचे आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार करत ग्रामस्थांच्या जिवाशी खेळत कुचकामी योजना होत असेल, तर त्याला आमचा विरोधच राहील.- अमोल चौगुले, उपसरपंच ग्रामपंचायत टाकवडेकोणताही गैरव्यवहार नाहीयोजनेमुळे रस्ता कॉँसिंग, साईटपट्ट्या याचा अंदाजे खर्च दाखविला आहे. ही नुकसान भरपाई नसून रस्त्यांचे नुकसान संबधित ठेकेदाराने पूर्ण करून द्यावयाची आहे. रकमेच्या तफावतीमध्ये गैरव्यवहार नाही. रस्त्याच्या खर्चाच्या मूल्यांकनाचे अधिकार बांधकाम विभागाकडेच आहेत. रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम पाणीपुरवठा विभागाने बांधकाम विभागाकडे भरली आहे.- कुमार गुळवे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, जयसिंगपूर