शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

माहिती अधिकारात ‘बांधकाम’चा सावळागोंधळ

By admin | Updated: March 12, 2015 23:55 IST

एकाच योजनेची दोघांना दिली वेगळी माहिती : शिरढोण, टाकवडे पाणी योजनेतील नुकसानभरपाईच्या रकमेत तफावत

कुरूंदवाड : राष्ट्रीय ग्रामीण नळ  पाणीपुरवठा योजनेतून शिरढोण व टाकवडे (ता. शिरोळ) गावांसाठी कृष्णा नदीतून पाणी योजनेचे काम सुरू आहे. या पाईपलाईनसाठी रस्त्याची खुदाई केल्याने नुकसान भरपाईपोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दोघा तक्रारदारांना वेगवेगळी माहिती दिली आहे. यामध्ये तब्बल ३० लाख रूपयांचा फरक असून यातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यापासून सुटका मिळावी व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शिरढोण व टाकवडे गावाला कृष्णा नदीतून पाणी योजना केली जात आहे. दोन गावांसाठी स्वतंत्र योजना असताना एकाच चरीतून केलेली पाईपलाईन, निविदेप्रमाणे कामात त्रुटी, अशा विविध कारणांतून ही योजना गाजत असून, योजनेचे काम रडत-खडत चालू आहे. मात्र, याचा विरोध अद्याप संपला नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नुकसान भरपाईच्या सावळागोंधळाने वादात भर पडली आहे. या योजनेतील पाईपलाईनसाठी रस्त्याकडेने खुदाई केल्याने रस्त्याचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या रस्त्याच्या नुकसान भरपाई पोटी किती रकमेचा दंड करण्यात आल्याची माहिती टाकवडे येथील मारूती जनवाडे यांनी माहिती अधिकारात २२ आॅगस्ट २०१४ ला मागणी केल्यानुसार जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाने कुरूंदवाड ते शिरढोण २४०० मीटर व कुरूंदवाड ते टाकवडे ८५०० मीटर असा एकूण दहा हजार ९०० मीटर रस्त्याचे नुकसान झाले असून, प्रत्येक मीटरला २७५ प्रमाणे २९ लाख ९७ हजार पाचशे रुपयांसह एकूण ३२ लाख १५ हजार ५०३ रूपये दंड केला. तर सदाशिव पाटील यांनी २० जानेवारी १५ ला बांधकाम विभाग कोल्हापूरकडे मागणी केल्यानंतर रस्त्याचे केवळ ५० मीटरच नुकसान झाले असून दोन लाख २५ हजार ५६३ रूपये दंड आकारल्याचे माहिती दिली आहे.पाणीपुरवठा विभागात प्रत्यक्षात एक लाख ३३ हजार ९६३ रूपये सार्वजनिक विभागाकडे भरले आहेत. एकाच विभागाने माहिती अधिकारातून दोन वेगवेगळ्या दंडात्मक कारवाईची माहिती दिल्याने तसेच त्यामध्ये तब्बल ३० लाखांचा फरक असल्याने नुकसान अचानक कमी होण्यामध्ये काय गौडबंगाल आहे, असा सवाल आंदोलनकर्ते करत आहेत. त्यामुळे यामध्ये काहीतरी पाणी मुरत असल्याचा आरोप करत योजनेविरोधी आंदोलनकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून सार्वजनिक बांधकाम विभागालाच धारेवर धरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)...तर आमचा विरोधचगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पाणी योजना महत्त्वाची आहे. केवळ योजना पूर्ण होण्यापेक्षा ती टिकावू होणे गरजेचे आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार करत ग्रामस्थांच्या जिवाशी खेळत कुचकामी योजना होत असेल, तर त्याला आमचा विरोधच राहील.- अमोल चौगुले, उपसरपंच ग्रामपंचायत टाकवडेकोणताही गैरव्यवहार नाहीयोजनेमुळे रस्ता कॉँसिंग, साईटपट्ट्या याचा अंदाजे खर्च दाखविला आहे. ही नुकसान भरपाई नसून रस्त्यांचे नुकसान संबधित ठेकेदाराने पूर्ण करून द्यावयाची आहे. रकमेच्या तफावतीमध्ये गैरव्यवहार नाही. रस्त्याच्या खर्चाच्या मूल्यांकनाचे अधिकार बांधकाम विभागाकडेच आहेत. रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम पाणीपुरवठा विभागाने बांधकाम विभागाकडे भरली आहे.- कुमार गुळवे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, जयसिंगपूर