शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

पाचशे कर्मचार्‍यांना मिळणार बढती

By admin | Updated: June 1, 2014 01:29 IST

प्रशासकांचा निर्णय : बारा वर्षांनंतर बढतीची प्रक्रिया

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) तब्बल पाचशे कर्मचार्‍यांना बढती मिळणार आहे. बॅँकेत बारा वर्षांनंतर बढतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय बॅँकेचे प्रशासकांनी घेतल्याने कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शिपाईपासून सरव्यवस्थापकापर्यंत बढती मिळणार असून, बढतीच्या माध्यमातून प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा बॅँकेत २००१-०२ ला कर्मचार्‍यांच्या बढतीची प्रक्रिया राबविली होती. यावेळी संचालक मंडळ व कर्मचारी संघटना यांच्यातील समन्वयातून कर्मचार्‍यांच्या सेवा काळ व बढतीचा पॅटर्न ठरवण्यात आला होता. यामध्ये ज्युनिअर क्लार्कचा सेंकड ग्रेडच्या बढतीसाठी दहा वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला होता. सेंकडमधून फर्स्ट ग्रेडसाठी सात, तर फर्स्टमधून मॅनेजरसाठी पाच वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला होता. संचालक मंडळाने १९९० व १९९३ ला नोकरभरती केली होती. त्यानंतर झालेल्या बढतीत या भरतीतील काही कर्मचार्‍यांना लाभ मिळाला. संचालक मंडळाने २००५-०६ ला १०२ रोजंदारी कर्मचार्‍यांची भरती केली. या काळात बॅँकेतील राजकीय स्थित्यंतरामुळे कर्मचार्‍यांची बढती प्रक्रिया रखडली होती. नोव्हेंबर २००९ ला जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक मंडळ आल्याने गेली चार वर्षे ही प्रक्रिया थांबली होती. गेल्या चार वर्षांत अनेक महत्त्वाच्या पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर बढती नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये निरुत्साह दिसत आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी कर्मचार्‍यांच्या बढतीचा निर्णय घेतला. येत्या दोन दिवसांत बढतीचा प्रस्ताव पूर्ण करून मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. साधारणत: जूनअखेर बढतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)