शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाचशे कर्मचार्‍यांना मिळणार बढती

By admin | Updated: June 1, 2014 01:29 IST

प्रशासकांचा निर्णय : बारा वर्षांनंतर बढतीची प्रक्रिया

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) तब्बल पाचशे कर्मचार्‍यांना बढती मिळणार आहे. बॅँकेत बारा वर्षांनंतर बढतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय बॅँकेचे प्रशासकांनी घेतल्याने कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शिपाईपासून सरव्यवस्थापकापर्यंत बढती मिळणार असून, बढतीच्या माध्यमातून प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा बॅँकेत २००१-०२ ला कर्मचार्‍यांच्या बढतीची प्रक्रिया राबविली होती. यावेळी संचालक मंडळ व कर्मचारी संघटना यांच्यातील समन्वयातून कर्मचार्‍यांच्या सेवा काळ व बढतीचा पॅटर्न ठरवण्यात आला होता. यामध्ये ज्युनिअर क्लार्कचा सेंकड ग्रेडच्या बढतीसाठी दहा वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला होता. सेंकडमधून फर्स्ट ग्रेडसाठी सात, तर फर्स्टमधून मॅनेजरसाठी पाच वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला होता. संचालक मंडळाने १९९० व १९९३ ला नोकरभरती केली होती. त्यानंतर झालेल्या बढतीत या भरतीतील काही कर्मचार्‍यांना लाभ मिळाला. संचालक मंडळाने २००५-०६ ला १०२ रोजंदारी कर्मचार्‍यांची भरती केली. या काळात बॅँकेतील राजकीय स्थित्यंतरामुळे कर्मचार्‍यांची बढती प्रक्रिया रखडली होती. नोव्हेंबर २००९ ला जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक मंडळ आल्याने गेली चार वर्षे ही प्रक्रिया थांबली होती. गेल्या चार वर्षांत अनेक महत्त्वाच्या पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर बढती नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये निरुत्साह दिसत आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी कर्मचार्‍यांच्या बढतीचा निर्णय घेतला. येत्या दोन दिवसांत बढतीचा प्रस्ताव पूर्ण करून मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. साधारणत: जूनअखेर बढतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)