शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

इचलकरंजीची महापालिका सध्या दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST

तीव्र राजकीय इच्छाशक्तीची गरज (लोगो) १५०१२०२१-आयसीएच-१५ अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : निकषांमध्ये बसत असल्यास इचलकरंजी नगरपालिकेला महापालिका ...

तीव्र राजकीय इच्छाशक्तीची गरज

(लोगो)

१५०१२०२१-आयसीएच-१५

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : निकषांमध्ये बसत असल्यास इचलकरंजी नगरपालिकेला महापालिका करू, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले; परंतु त्यासाठी बरीचशी उठाठेव करावी लागणार असल्याने सद्य:स्थितीला तरी ते दिवास्वप्नच म्हणावे लागेल. त्यातूनही महापालिका करावयाची झाल्यास तीव्र राजकीय इच्छाशक्ती पणाला लावावी लागेल. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील.

इचलकरंजी नगरपालिका सध्या ‘अ’ वर्ग असल्याने त्या निकषात बसणाऱ्या शासनाच्या विविध विकासकामांच्या योजना शहरात राबविल्या जातात. त्याचबरोबर येथील लोकप्रतिनिधी काही बसत नसलेल्या बाबींना ‘विशेष बाब’ म्हणून मंजूर करून आणतात, असा प्रपंच सध्या सुरू आहे. परंतु नियोजनबद्ध व पारदर्शक कारभार नसल्याने आवश्यक नागरी सुविधा योग्यरित्या दिल्या जात नाहीत.

महापालिका होण्यासाठी पाच लाख लोकसंख्या, पर कॅपिटा उत्पन्न, क्षेत्रफळ हे किमान निकष पूर्ण करावे लागतात. त्यानंतरच ‘ड’ वर्ग महापालिकेची मंजुरी मिळू शकते; परंतु त्यासाठी खूपच उठाठेव करावी लागणार आहे. शहराची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार दोन लाख ८९ हजार नोंद आहे तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शहरालगतच्या पाचही गावांचा विचार केला तरीही एकूण संख्या पाच लाखांवर जाण्याची शक्यता दिसत नाही. त्याचबरोबर त्या गावांमधील शेतीवर आरक्षण पडण्याची शक्यता असल्याने त्यांची समजूत काढून या गावांना महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यासाठी तयार करावे लागेल, हा खटाटोप वेगळाच.

विशेष म्हणजे महापालिका करावी म्हणून इचलकरंजी नगरपालिकेने कधीही प्रस्ताव पाठविला नाही. परंतु अधिकचा निधी व योजना यांचा लाभ मिळावा; तसेच शहराचा विस्तार होऊन मोठे शहर बनावे, यासाठी तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी ७ सप्टेंबर २०१० ला इचलकरंजी शहर हद्दवाढीसह महापालिका व्हावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे केली होती, ती अद्याप प्रलंबित आहे.

नगरपालिकेने पाठविलेल्या हद्दवाढ प्रस्तावाला २० डिसेंबर १९७९ ला मंजुरी मिळून शासनाने नगरविकास विभाग क्रमांक एमयुपी/१५८२/१४२४/सीआर-१५८/युडी/८ मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक ५ फेब्रुवारी १९८२ च्या शासननिर्णयाद्वारे घोषणा केली. त्यामध्ये कबनूरचा काही भाग व शहापूर नगरपालिकेत समाविष्ट झाले. त्यानंतर सन २०११-१२ मध्ये काही भाग नगरपालिकेत समाविष्ट झाला तेथे अलीकडे विकासकामे झाली.

चौकट

यापूर्वीही आश्वासन

यापूर्वीही १७ डिसेंबर २०११ ला हिवाळी अधिवेशनात तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांनीही ‘विशेष बाब’ म्हणून महापालिका करण्यासाठी मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते.

प्रतिक्रिया

राजकीय व्यक्तींनी सवंग लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा सध्या अ वर्ग नगरपालिका असताना नागरिकांना योग्य मूलभूत सुविधा दिल्या जातात का, हे तपासून पाहावे. त्यामध्ये सुधारणा करावी, अशी अपेक्षा आहे.

शशांक बावचकर, नगरसेवक इचलकरंजी.