शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

इचलकरंजीची महापालिका सध्या दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST

तीव्र राजकीय इच्छाशक्तीची गरज (लोगो) १५०१२०२१-आयसीएच-१५ अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : निकषांमध्ये बसत असल्यास इचलकरंजी नगरपालिकेला महापालिका ...

तीव्र राजकीय इच्छाशक्तीची गरज

(लोगो)

१५०१२०२१-आयसीएच-१५

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : निकषांमध्ये बसत असल्यास इचलकरंजी नगरपालिकेला महापालिका करू, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले; परंतु त्यासाठी बरीचशी उठाठेव करावी लागणार असल्याने सद्य:स्थितीला तरी ते दिवास्वप्नच म्हणावे लागेल. त्यातूनही महापालिका करावयाची झाल्यास तीव्र राजकीय इच्छाशक्ती पणाला लावावी लागेल. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील.

इचलकरंजी नगरपालिका सध्या ‘अ’ वर्ग असल्याने त्या निकषात बसणाऱ्या शासनाच्या विविध विकासकामांच्या योजना शहरात राबविल्या जातात. त्याचबरोबर येथील लोकप्रतिनिधी काही बसत नसलेल्या बाबींना ‘विशेष बाब’ म्हणून मंजूर करून आणतात, असा प्रपंच सध्या सुरू आहे. परंतु नियोजनबद्ध व पारदर्शक कारभार नसल्याने आवश्यक नागरी सुविधा योग्यरित्या दिल्या जात नाहीत.

महापालिका होण्यासाठी पाच लाख लोकसंख्या, पर कॅपिटा उत्पन्न, क्षेत्रफळ हे किमान निकष पूर्ण करावे लागतात. त्यानंतरच ‘ड’ वर्ग महापालिकेची मंजुरी मिळू शकते; परंतु त्यासाठी खूपच उठाठेव करावी लागणार आहे. शहराची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार दोन लाख ८९ हजार नोंद आहे तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शहरालगतच्या पाचही गावांचा विचार केला तरीही एकूण संख्या पाच लाखांवर जाण्याची शक्यता दिसत नाही. त्याचबरोबर त्या गावांमधील शेतीवर आरक्षण पडण्याची शक्यता असल्याने त्यांची समजूत काढून या गावांना महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यासाठी तयार करावे लागेल, हा खटाटोप वेगळाच.

विशेष म्हणजे महापालिका करावी म्हणून इचलकरंजी नगरपालिकेने कधीही प्रस्ताव पाठविला नाही. परंतु अधिकचा निधी व योजना यांचा लाभ मिळावा; तसेच शहराचा विस्तार होऊन मोठे शहर बनावे, यासाठी तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी ७ सप्टेंबर २०१० ला इचलकरंजी शहर हद्दवाढीसह महापालिका व्हावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे केली होती, ती अद्याप प्रलंबित आहे.

नगरपालिकेने पाठविलेल्या हद्दवाढ प्रस्तावाला २० डिसेंबर १९७९ ला मंजुरी मिळून शासनाने नगरविकास विभाग क्रमांक एमयुपी/१५८२/१४२४/सीआर-१५८/युडी/८ मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक ५ फेब्रुवारी १९८२ च्या शासननिर्णयाद्वारे घोषणा केली. त्यामध्ये कबनूरचा काही भाग व शहापूर नगरपालिकेत समाविष्ट झाले. त्यानंतर सन २०११-१२ मध्ये काही भाग नगरपालिकेत समाविष्ट झाला तेथे अलीकडे विकासकामे झाली.

चौकट

यापूर्वीही आश्वासन

यापूर्वीही १७ डिसेंबर २०११ ला हिवाळी अधिवेशनात तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांनीही ‘विशेष बाब’ म्हणून महापालिका करण्यासाठी मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते.

प्रतिक्रिया

राजकीय व्यक्तींनी सवंग लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा सध्या अ वर्ग नगरपालिका असताना नागरिकांना योग्य मूलभूत सुविधा दिल्या जातात का, हे तपासून पाहावे. त्यामध्ये सुधारणा करावी, अशी अपेक्षा आहे.

शशांक बावचकर, नगरसेवक इचलकरंजी.