शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

इचलकरंजीला लाचखोरीची वाळवी

By admin | Updated: July 27, 2014 23:00 IST

१०-२० हजारांची लाच घेणारे नामानिराळेच : फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवरून पोलिसांवर टीका

अतुल आंबी : इचलकरंजी, शहराला लाचखोरीची वाळवी लागत असून, गेल्या वर्षभरामध्ये महसूल खाते १, नगरपालिका १ व पोलीस खाते २ असे चारजण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडले आहेत. या कारवाईनंतर तरी अन्य अधिकारी व कर्मचारी धडा घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गुरुवारी दोन हजार रुपयांची लाच घेताना आझाद गडकरी हा वाहतूक शाखेचा पोलीस कॉन्स्टेबल सापडला. या आधी १ जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हरिश्चंद्र बुरटे हाही दोन हजारांची लाच घेताना सापडला होता. साधारण सहा महिन्यांपूर्वी नगरपालिकेतील जलअभियंता आर. वाय. जोशी २५ हजारांची लाच घेताना सापडला, तर एप्रिल २०१३ मध्ये प्रभारी दुय्यम निबंधक व्ही. एस. चव्हाण हा अधिकारी १२०० रुपयांची लाच घेताना सापडला. हे झाले तक्रार दिल्याने अडकलेले मोहरे. मात्र ज्यांच्याविषयी तक्रार होत नाही अशांचे काय? पालिकेतील अभियंता जोशी सापडला तेव्हा संबंधित तक्रारदाराने पालिकेतील टक्केवारीचा सविस्तर भांडाफोडच केला होता. नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सभापतींपासून ते साखळीतील सर्व लोकांची टक्केवारीनुसार सविस्तर माहिती दिली होती. या प्रकरणानंतर नागरिक नगरपालिका क्षेत्राबद्दल व तेथील कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. त्यानंतर पोलीस खात्यातील लोक सापडल्यानंतर त्यांच्याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होती. काल आझाद सापडल्यानंतर शहरात फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पोलिसांवर टीका सुरू झाली. यामध्ये हा सापडला बरे झाले. माझ्याकडून एवढे पैसे घेतले होते, असे व यापेक्षा विचित्र कमेंटही करण्यात आले आहेत. तसेच रिक्षा, मोटार व वडापच्या थांब्यांवरील कट्ट्यावर गडकरी हा चांगला माणूस होता. त्यापेक्षा मोठे मासे चुकले आणि तो बिचारा सापडला, अशीही चर्चा ऐकावयास मिळाली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार बुरटे सापडल्यानंतरही पोलीस ठाण्यात ‘नेहमी येणाऱ्या’ नागरिकांतही अशीच चर्चा होती. बुरटे खूप चांगले होते. केवळ दोन हजार रुपयांसाठी ते सापडले. मात्र, १०-१० व २०-२० हजार रुपये घेणाऱ्यांचे काय, ते यातून नामानिराळेच राहिले. कारण त्यांच्याविरोधात तक्रार झालीच नाही. तक्रार होणार तरी कशी? अलीकडील काळात लाचलुचपत विभागाच्या वतीने होणाऱ्या कारवायांमुळे तरी किमान या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडा घ्यावा व इचलकरंजीला लागलेली लाचखोरीची वाळवी रोखावी, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.‘ओळखीने’ तडजोड करून प्रकरण मिटतेकित्येकजणांचा कधीतरीच एखाद्या कामानिमित्त पोलीस ठाण्याशी संपर्क येतो. तेही एखाद्या अडचणीत सापडल्यावरच. मग त्यांच्याविरोधात तक्रार करून उद्या जायचे कुणाकडे, त्यात कामही अडचणीचे असते. मग ‘आलिया भोगासी असावे सादर’ असे म्हणत होणाऱ्या मागणीत ‘ओळखीने’ तडजोड करायची आणि प्रकरण मिटवायचे, असा प्रकार सर्रास चालतो. मात्र, याबाबत कोणताच पुरावा निर्माण करता येत नाही. त्यामुळे सर्व काही आलबेल चाललेले असते, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.