शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

इचलकरंजीला लाचखोरीची वाळवी

By admin | Updated: July 27, 2014 23:00 IST

१०-२० हजारांची लाच घेणारे नामानिराळेच : फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवरून पोलिसांवर टीका

अतुल आंबी : इचलकरंजी, शहराला लाचखोरीची वाळवी लागत असून, गेल्या वर्षभरामध्ये महसूल खाते १, नगरपालिका १ व पोलीस खाते २ असे चारजण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडले आहेत. या कारवाईनंतर तरी अन्य अधिकारी व कर्मचारी धडा घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गुरुवारी दोन हजार रुपयांची लाच घेताना आझाद गडकरी हा वाहतूक शाखेचा पोलीस कॉन्स्टेबल सापडला. या आधी १ जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हरिश्चंद्र बुरटे हाही दोन हजारांची लाच घेताना सापडला होता. साधारण सहा महिन्यांपूर्वी नगरपालिकेतील जलअभियंता आर. वाय. जोशी २५ हजारांची लाच घेताना सापडला, तर एप्रिल २०१३ मध्ये प्रभारी दुय्यम निबंधक व्ही. एस. चव्हाण हा अधिकारी १२०० रुपयांची लाच घेताना सापडला. हे झाले तक्रार दिल्याने अडकलेले मोहरे. मात्र ज्यांच्याविषयी तक्रार होत नाही अशांचे काय? पालिकेतील अभियंता जोशी सापडला तेव्हा संबंधित तक्रारदाराने पालिकेतील टक्केवारीचा सविस्तर भांडाफोडच केला होता. नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सभापतींपासून ते साखळीतील सर्व लोकांची टक्केवारीनुसार सविस्तर माहिती दिली होती. या प्रकरणानंतर नागरिक नगरपालिका क्षेत्राबद्दल व तेथील कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. त्यानंतर पोलीस खात्यातील लोक सापडल्यानंतर त्यांच्याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होती. काल आझाद सापडल्यानंतर शहरात फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पोलिसांवर टीका सुरू झाली. यामध्ये हा सापडला बरे झाले. माझ्याकडून एवढे पैसे घेतले होते, असे व यापेक्षा विचित्र कमेंटही करण्यात आले आहेत. तसेच रिक्षा, मोटार व वडापच्या थांब्यांवरील कट्ट्यावर गडकरी हा चांगला माणूस होता. त्यापेक्षा मोठे मासे चुकले आणि तो बिचारा सापडला, अशीही चर्चा ऐकावयास मिळाली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार बुरटे सापडल्यानंतरही पोलीस ठाण्यात ‘नेहमी येणाऱ्या’ नागरिकांतही अशीच चर्चा होती. बुरटे खूप चांगले होते. केवळ दोन हजार रुपयांसाठी ते सापडले. मात्र, १०-१० व २०-२० हजार रुपये घेणाऱ्यांचे काय, ते यातून नामानिराळेच राहिले. कारण त्यांच्याविरोधात तक्रार झालीच नाही. तक्रार होणार तरी कशी? अलीकडील काळात लाचलुचपत विभागाच्या वतीने होणाऱ्या कारवायांमुळे तरी किमान या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडा घ्यावा व इचलकरंजीला लागलेली लाचखोरीची वाळवी रोखावी, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.‘ओळखीने’ तडजोड करून प्रकरण मिटतेकित्येकजणांचा कधीतरीच एखाद्या कामानिमित्त पोलीस ठाण्याशी संपर्क येतो. तेही एखाद्या अडचणीत सापडल्यावरच. मग त्यांच्याविरोधात तक्रार करून उद्या जायचे कुणाकडे, त्यात कामही अडचणीचे असते. मग ‘आलिया भोगासी असावे सादर’ असे म्हणत होणाऱ्या मागणीत ‘ओळखीने’ तडजोड करायची आणि प्रकरण मिटवायचे, असा प्रकार सर्रास चालतो. मात्र, याबाबत कोणताच पुरावा निर्माण करता येत नाही. त्यामुळे सर्व काही आलबेल चाललेले असते, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.