शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

७५ हजार ‘खावटी’ कर्जदारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:35 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उचल केलेल्या ‘खावटी’ कर्ज खात्यांची माहिती गोळा केल्याने जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘खावटी’मधील थकबाकीदारांना लाभ देणार की नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, याबाबत स्पष्टता नसली तरी माहिती संकलन पाहता थकबाकीदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. जून ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उचल केलेल्या ‘खावटी’ कर्ज खात्यांची माहिती गोळा केल्याने जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘खावटी’मधील थकबाकीदारांना लाभ देणार की नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, याबाबत स्पष्टता नसली तरी माहिती संकलन पाहता थकबाकीदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. जून २०१६अखेर थकीत व याच थकबाकीची जुलै २०१७ पर्यंत परतफेड न केलेले ५७८९ शेतकरी आहेत. निकषाची चाळण लावल्यास यातील पाच हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे, तर याच वर्षात नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली. त्यानुसार गेले सव्वा वर्ष कर्जमाफीचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ९५ हजार शेतकºयांना ३९६ कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे.शेतकरी पीक कर्जाशिवाय स्वत:च्या क्षमतेवर विकास संस्था व जिल्हा बॅँकांकडून ‘खावटी’ कर्ज घेतो. नाबार्डच्या धोरणानुसार पीक कर्ज एकरी ३५ हजार आणि ‘खावटी’ १५ हजारांचे वाटप संस्था शेतकºयांना करतात. त्यातील ३५ हजारांचे कर्ज सवलतीच्या व्याजदरात, तर ‘खावटी’ १४ टक्के व्याजाने शेतकºयांना दिले जाते. सरकारने कर्जमाफीत केवळ पीक कर्जाचा समावेश केल्याने हजारो ‘खावटी’ कर्जदार कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते.या शेतकºयांनाही लाभ द्यावा, असा रेटा सरकारच्या पातळीवर होता. सरकारने ‘खावटी’ कर्जाची माहिती संकलन करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅँकेअंतर्गत ३१ मार्च २०१६अखेर ७५ हजार ५६४ शेतकºयांनी १८३ कोटी ९३ लाख ‘खावटी’ कर्जाची उचल केली आहे. त्यातील ३० जून २०१६अखेर ७६०० शेतकºयांचे १७.१६ कोटी थकीत राहिले आहे.कर्जमाफीच्या निकषानुसार जून २०१६अखेर थकीत कर्ज ते जुलै २०१७अखेर परतफेड न केल्यास त्याला लाभ दिला जातो. त्यानुसार ५७८९ शेतकºयांची १५.०८ कोटींची थकबाकी राहते. एकूण ‘खावटी’च्या थकबाकीदारांनाच माफी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने निकषाच्या चाळणीनंतर किमान पाच हजार शेतकºयांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.२०१६-१७ मध्ये २२० कोटींचे वाटपराज्य सरकारने २०१५-१६ या वर्षात वाटप केलेल्या ‘खावटी’ कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील माहितीही मागविली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७४ हजार शेतकºयांनी २२०.७२ कोटी कर्जाची उचल केली आहे.विकास संस्थांचे साडेपाच कोटी अडकलेपीक कर्जापेक्षा जादा व्याज मिळत असल्याने सक्षम विकास संस्था स्वनिधीतून ‘खावटी’चे वाटप करतात, पण हे थकीत गेल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. विकास संस्थांकडे स्वनिधीतून वाटप केलेले साडेपाच कोटी थकीत आहेत.