शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

७५ हजार ‘खावटी’ कर्जदारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:35 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उचल केलेल्या ‘खावटी’ कर्ज खात्यांची माहिती गोळा केल्याने जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘खावटी’मधील थकबाकीदारांना लाभ देणार की नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, याबाबत स्पष्टता नसली तरी माहिती संकलन पाहता थकबाकीदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. जून ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उचल केलेल्या ‘खावटी’ कर्ज खात्यांची माहिती गोळा केल्याने जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘खावटी’मधील थकबाकीदारांना लाभ देणार की नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, याबाबत स्पष्टता नसली तरी माहिती संकलन पाहता थकबाकीदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. जून २०१६अखेर थकीत व याच थकबाकीची जुलै २०१७ पर्यंत परतफेड न केलेले ५७८९ शेतकरी आहेत. निकषाची चाळण लावल्यास यातील पाच हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे, तर याच वर्षात नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली. त्यानुसार गेले सव्वा वर्ष कर्जमाफीचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ९५ हजार शेतकºयांना ३९६ कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे.शेतकरी पीक कर्जाशिवाय स्वत:च्या क्षमतेवर विकास संस्था व जिल्हा बॅँकांकडून ‘खावटी’ कर्ज घेतो. नाबार्डच्या धोरणानुसार पीक कर्ज एकरी ३५ हजार आणि ‘खावटी’ १५ हजारांचे वाटप संस्था शेतकºयांना करतात. त्यातील ३५ हजारांचे कर्ज सवलतीच्या व्याजदरात, तर ‘खावटी’ १४ टक्के व्याजाने शेतकºयांना दिले जाते. सरकारने कर्जमाफीत केवळ पीक कर्जाचा समावेश केल्याने हजारो ‘खावटी’ कर्जदार कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते.या शेतकºयांनाही लाभ द्यावा, असा रेटा सरकारच्या पातळीवर होता. सरकारने ‘खावटी’ कर्जाची माहिती संकलन करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅँकेअंतर्गत ३१ मार्च २०१६अखेर ७५ हजार ५६४ शेतकºयांनी १८३ कोटी ९३ लाख ‘खावटी’ कर्जाची उचल केली आहे. त्यातील ३० जून २०१६अखेर ७६०० शेतकºयांचे १७.१६ कोटी थकीत राहिले आहे.कर्जमाफीच्या निकषानुसार जून २०१६अखेर थकीत कर्ज ते जुलै २०१७अखेर परतफेड न केल्यास त्याला लाभ दिला जातो. त्यानुसार ५७८९ शेतकºयांची १५.०८ कोटींची थकबाकी राहते. एकूण ‘खावटी’च्या थकबाकीदारांनाच माफी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने निकषाच्या चाळणीनंतर किमान पाच हजार शेतकºयांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.२०१६-१७ मध्ये २२० कोटींचे वाटपराज्य सरकारने २०१५-१६ या वर्षात वाटप केलेल्या ‘खावटी’ कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील माहितीही मागविली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७४ हजार शेतकºयांनी २२०.७२ कोटी कर्जाची उचल केली आहे.विकास संस्थांचे साडेपाच कोटी अडकलेपीक कर्जापेक्षा जादा व्याज मिळत असल्याने सक्षम विकास संस्था स्वनिधीतून ‘खावटी’चे वाटप करतात, पण हे थकीत गेल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. विकास संस्थांकडे स्वनिधीतून वाटप केलेले साडेपाच कोटी थकीत आहेत.