शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

७५ हजार ‘खावटी’ कर्जदारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:35 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उचल केलेल्या ‘खावटी’ कर्ज खात्यांची माहिती गोळा केल्याने जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘खावटी’मधील थकबाकीदारांना लाभ देणार की नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, याबाबत स्पष्टता नसली तरी माहिती संकलन पाहता थकबाकीदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. जून ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उचल केलेल्या ‘खावटी’ कर्ज खात्यांची माहिती गोळा केल्याने जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘खावटी’मधील थकबाकीदारांना लाभ देणार की नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, याबाबत स्पष्टता नसली तरी माहिती संकलन पाहता थकबाकीदारांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. जून २०१६अखेर थकीत व याच थकबाकीची जुलै २०१७ पर्यंत परतफेड न केलेले ५७८९ शेतकरी आहेत. निकषाची चाळण लावल्यास यातील पाच हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे, तर याच वर्षात नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली. त्यानुसार गेले सव्वा वर्ष कर्जमाफीचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ९५ हजार शेतकºयांना ३९६ कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे.शेतकरी पीक कर्जाशिवाय स्वत:च्या क्षमतेवर विकास संस्था व जिल्हा बॅँकांकडून ‘खावटी’ कर्ज घेतो. नाबार्डच्या धोरणानुसार पीक कर्ज एकरी ३५ हजार आणि ‘खावटी’ १५ हजारांचे वाटप संस्था शेतकºयांना करतात. त्यातील ३५ हजारांचे कर्ज सवलतीच्या व्याजदरात, तर ‘खावटी’ १४ टक्के व्याजाने शेतकºयांना दिले जाते. सरकारने कर्जमाफीत केवळ पीक कर्जाचा समावेश केल्याने हजारो ‘खावटी’ कर्जदार कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते.या शेतकºयांनाही लाभ द्यावा, असा रेटा सरकारच्या पातळीवर होता. सरकारने ‘खावटी’ कर्जाची माहिती संकलन करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅँकेअंतर्गत ३१ मार्च २०१६अखेर ७५ हजार ५६४ शेतकºयांनी १८३ कोटी ९३ लाख ‘खावटी’ कर्जाची उचल केली आहे. त्यातील ३० जून २०१६अखेर ७६०० शेतकºयांचे १७.१६ कोटी थकीत राहिले आहे.कर्जमाफीच्या निकषानुसार जून २०१६अखेर थकीत कर्ज ते जुलै २०१७अखेर परतफेड न केल्यास त्याला लाभ दिला जातो. त्यानुसार ५७८९ शेतकºयांची १५.०८ कोटींची थकबाकी राहते. एकूण ‘खावटी’च्या थकबाकीदारांनाच माफी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने निकषाच्या चाळणीनंतर किमान पाच हजार शेतकºयांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.२०१६-१७ मध्ये २२० कोटींचे वाटपराज्य सरकारने २०१५-१६ या वर्षात वाटप केलेल्या ‘खावटी’ कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील माहितीही मागविली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७४ हजार शेतकºयांनी २२०.७२ कोटी कर्जाची उचल केली आहे.विकास संस्थांचे साडेपाच कोटी अडकलेपीक कर्जापेक्षा जादा व्याज मिळत असल्याने सक्षम विकास संस्था स्वनिधीतून ‘खावटी’चे वाटप करतात, पण हे थकीत गेल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. विकास संस्थांकडे स्वनिधीतून वाटप केलेले साडेपाच कोटी थकीत आहेत.