शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घरातील बुरशी आरोग्याला हानिकारक

By admin | Updated: July 31, 2014 23:33 IST

पावसाळ्यातील समस्या : वेळेवर उपाय आवश्यक

सातारा : गेल्या काही दिवसांत सलग पडणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये ओल येण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आले आल्यानंतर भिंतीवर येणारा बुरशीचा थर छोट्यांसह दमा रूग्णांना हानीकारक ठरू शकतो. म्हणूनच पाऊस येण्या अधीच यावर उपाय करणं आवश्यक असते.ज्या घरांचे आयुष्यमान जास्त आहे, दोन भिंतीमध्ये प्लास्टर करण्याची संधी नाही किंवा पाऊस पडण्याच्या दिशेला पाण्याला अटकाव करण्यासाठी झाड नसेल अशाच ठिकाणी भिंतींना ओल येते. भिंतीवर वाऱ्याच्या वेगाने धडकणाऱ्या पावसाचा त्याच त्याच ठिकाणी मार लागून भिंतीत ओल येते. किरकोळ प्रमाणात ओल येत असेल तर तीला अटकाव करण्यासाठी भिंतीवर प्लास्टिकचा कागद लावला जातो. पण मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या ओलीवर वॉटर प्रुफिंग हा एकच पर्याय राहतो.घरात येणाऱ्या ओलीमुळे घरातील वातावरण आणि वास यात फरक पडतो. दमट आणि कुबट वातावरणाचा परिणाम घरातील फर्निचरवरही दिसतो. फर्निचरच्या कुशनलाही याचा फटका बसतो. दमा रूग्ण आणि लहान मुलांसाठी हा वास खुपच घातक असतो. लहान मुलांचा चुकून भिंतीवर हात लागून बुरशी त्यांच्या हाताला लागली आणि ती पोटात गेली तर जुलाब आणि पोट दुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे लहान मुलांना या बुरशीपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

--पाऊस सुरू झाल्यानंतर भिंतीतून येणारी ओल भिंतीत राहून त्यातून बुर्शी तयार होते. साधारण पांढरी आणि हिरव्या रंगाची भुरशी सामान्यपणे सर्वत्र पहायला मिळते. पण हिरवी आणि पिवळ्या रंगांची बुरशी आरोग्यासाठी खुपच धोकादायक असते. भिंतीच्या मध्यापासून ही बुरशी पसरत जाते. छोट्याशा टिपक्यापासून सुरू झालेली बुरशी दोन दिवसात भिंतभर वाढते. ही बुरशी आरोग्यासाठी हानीकारक असते.वॉटर प्रुफिंगची चलती--पश्चिमेकडून येणाऱ्या पावसामुळे अनेक घरांच्या पश्चिम बाजू कडिल भिंतींमध्ये मोठ्या प्रमाणावर ओल येते. या ओलीपासून सुटका मिळवायची असेल तर त्याची तजवीज उन्हाळत्यात करून घेणे गरजेचे असते. यासाठी भिंतीवर वॉटर प्रुफिंग करून घेणे उपयुक्त ठरते. पूर्ण भिंतीवर विशिष्ट रायसन मिश्रित रंग दिला जातो. हा रंग उन्हाच्या तडाक्यात वाळला तर भिंतीला ओल येण्याची भिती राहत नाही. विशेष म्हणजे प्रुफिंग करणारे हे काम केल्यानंतर त्याचे सुमारे तीन वर्षांची खात्री देतात. कितीही जोराचा पाऊस आला तरी पाणी येत नसल्यामुळे हा पर्याय उपयुक्त आहे.४पावसाळ्याच्या दिवसात बुरशी होण्याचे प्रमाण सातारा शहरात कमी आहे. पण ज्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तिथे ही समस्या अधिक जाणवते. यावर उपाय म्हणून कोणी प्लास्टिकचा कागद लावून भिंत झाकून घेते तर काही जण बुरशीचा दर्प घालविण्यासाठी पाहूणे येण्याआधी रूम फ्रेशनर मारून वातावरणातील हा वास घालविण्याचा प्रयत्न करतात. पण हा पर्याय अगदी तात्पुरता स्वरूपाचा असाच आहे.