शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

शासनाची ‘वृक्ष लागवड’ मातीमोल

By admin | Updated: March 20, 2017 23:29 IST

देखभाल नाही : पाण्याअभावी अनेक ठिकाणची रोपे सुकली

विक्रम पाटील--  करंजफेणएका वर्षामागे पावसाचे प्रमाण अचानकपणे तुरळक झाल्यामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. पाऊस कमी होण्याचे मुख्य कारण बेसुमार वृक्षतोड हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे मागील वर्षी राज्यभर मोठा गाजावाजा व जनजागृती करून १ जुलैला राज्यात एक कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. या दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याला आठ लाख आठ हजार ५७७ रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. वनविभाग, सामाजिक सेवाभावी संस्था, शाळा, ग्रामपंचायती व काही व्यक्तिगत पातळीवरील लोकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आठ लाख २२ हजार रोपांची लागवड केली. मागील वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे लावण केलेली रोपे चांगलीच तरारली. दरम्यानच्या काळात लागवडीपैकी ७० टक्के रोपे जगली होती; परंतु वृक्षसंगोपनाकडे सर्वच सरकारी, निमसरकारी कार्यालयांनी दुर्लक्ष केल्यामुळे पाण्याअभावी अनेक ठिकाणची रोपे सुकून गेली. ग्रामीण भागामध्ये शाळा व ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लावणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षकांनी काही प्रमाणात रोपे जिवंत ठेवल्याचे दिसत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला कमीत कमी शंभर वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे काही तुरळक ग्रामपंचायती वगळता बहुतांश पंचायतींनी शासनाच्या वृक्षलागवड योजनेचा बोऱ्या उडविला आहे. वृक्षलागवड उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सरकारी कार्यालयांना अहवाल देण्याचे बंधन घातले होते; परंतु अनेक कार्यालयांनी अहवालच पाठविला नसल्याचे समोर येत आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडे सर्व्हे करण्यात पुरेशी यंत्रणा नसल्याचे समजते. बहुतांश कार्यालयातून या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही मोहीम फोटोसेशनसाठी तर राबविण्यात आली नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. वृक्ष लागवडीसाठी योग्य नियोजनाची प्रामुख्याने गरज असते. आॅक्टोबर ते मे महिन्याच्या दरम्यान रोपांना पाणी घालणे, भांगलण करून कुंपण करण्याची खरी गरज असते. वेळच्यावेळी पाणी घातल्यास शासनाची योजना सफल तर होईलच, परंतु पर्यावरणामध्ये समतोल राहण्यास मोठा फायदा होईल.-सरदार रणदिवे, पर्यावरण, अभ्यासक. वृक्ष लागवड हा उपक्रम चांगल्या प्रकारचा असून, प्रत्येक वर्षी राबविण्याची गरज आहे. आमच्या कळे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीने शंभर वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी ८० रोपे पूर्णपणे जगली आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली मुख्य जबाबदारी म्हणून काम केल्यास शासनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास वेळ लागणार आहे.-बाजीराव गायकवाड, ग्रामसेवक, कळे, ता. पन्हाळा.