शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शासन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देणार

By admin | Updated: March 28, 2017 00:48 IST

आत्महत्या रोखण्यासाठी त्रिस्तरीय धोरण : ‘लोकमत’ला सदिच्छा भेटीवेळी चंद्रकांतदादांचे संकेत

कोल्हापूर : कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन त्रिस्तरीय धोरणाचा गांभीर्याने विचार करीत असून, त्याअंतर्गत त्यांच्या उत्पादनखर्चाइतकी रक्कम शासनाकडूनच देण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही सोमवारी या माहितीस दुजोरा दिला. ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा फडकाविल्यानंतर पालकमंत्र्यांनी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट दिली. संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळ््या गप्पा मारल्या.राज्यात कर्जमाफीच्या विषयावरून राजकारण तापले आहे. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसही सरसकट कर्जमाफी द्या यासाठी आग्रही आहेत; परंतु कर्जमाफी दिली म्हणजे आत्महत्या थांबतील, असे सरकारला वाटत नाही. त्यामुळे थेट सरसकट कर्जमाफी न देताही त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल, असा विचार सरकार करीत आहे. त्यानुसार हे त्रिस्तरीय धोरण आकार घेत आहे. त्याची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू आहे. शासनाने विचार केलेल्या त्रिस्तरीय धोरणांमुळे आता सतत काही तरी मागण्यांच्या भूमिकेत असलेल्या शेतकऱ्यामध्ये देण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल. मूळ भारतीय माणूस हा मागणारा नाही...तो देणाराच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही असाच माणूस घडविणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने राज्य शासन पावले टाकत आहे.मोदी यांच्यावरील विश्वासामुळे यशराज्या-राज्यांत विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपला जे घवघवीत यश मिळत आहे, त्यामागे लोकांचा पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वासच कारणीभूत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. आता भाजपची १७ राज्यांत सत्ता व दीड हजारांहून जास्त आमदार देशभरात असून या सर्वांवर पंतप्रधान कार्यालयाचा ‘वॉच’ असल्याचे पाटील यांनी सांगितले.कृषी कर्जमाफीवर एक दृष्टिक्षेपशासन वर्षाला १ लाख १४ हजार कोटी रुपये शेतीला कर्जपुरवठा करते.शेतकऱ्यांचे ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज आता थकीत.गेल्या दहा वर्षांत कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची कोकणात एकही आत्महत्या नाही. पश्चिम महाराष्ट्रात ३४३, नागपूर विभागात ७५० तर उरलेल्या सर्व आत्महत्या मराठवाडा व अमरावती विभागात झाल्या आहेत. मग असे असेल तर सर्व राज्याला आणि सरसकट कर्जमाफी देण्याचा आग्रह कशासाठी, असे शासनाला वाटते.एक लाख कोटींचे कर्ज कमी करणारराज्य शासनाच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी वर्षाला किमान एक लाख कोटींचे कर्ज कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील गळती पहिल्यांदा शोधली. आम्ही सर्व निविदा १५ ते १८ टक्क्याने कमी स्वीकारल्या तरी कामाच्या दर्जामध्ये फरक पडत नसल्याचे लक्षात आले. याचा अर्थ डीपीआर वाढविला जात होता हे स्पष्ट झाले. सामाजिक न्याय विभागाकडून जी मोठ्या प्रमाणावर खरेदी होती त्यास चाप लावला. बचत आणि गळती शोधून कर्ज कमी करण्यात यश येत आहे.