शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

गणेशोत्सवातच मंडळांची ‘दिवाळी’

By admin | Updated: September 6, 2014 00:41 IST

इच्छुकांकडून हात ढिले : निवडणुकीपूर्वीच कोट्यवधींचे वाटप

राजाराम लोंढे -कोल्हापूर --ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव आल्याने गणेशोत्सव मंडळांची चांगलीच चलती आहे. इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येक मंडळाला हजारापासून पन्नास हजारांपर्यंतची मदत वाटप सुरू आहे. कोल्हापूर शहर, करवीर, कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघांत तर दिवाळीपूर्वीच मंडळांच्या कार्यकर्त्यांची ‘दिवाळी’ सुरू झाली आहे. मतदारसंघांतील मंडळांची संख्या पाहिली तर निवडणुकीच्या आधीच कोट्यवधी रुपयांचे वाटप झाल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत पाण्यासारखा पैसा वाहणार हे निश्चित आहे. सर्वच प्रकारच्या निवडणुका या तरुणांच्या हातात गेल्या आहेत, किंबहुना तरुणांनीच निवडणुका हातात घेतल्याचे चित्र अलीकडील निवडणूक निकालावरून स्पष्ट होते. त्यामुळे तरुण मंडळांचे राजकारणातील महत्त्व वाढले आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मंडळांची पर्यायाने तरुणांची भूमिकाच निर्णायक ठरल्याचे आपण पाहतो. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी तरुण मंडळांच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. गणेशोत्सवाला दरवर्षी राजकीय मंडळी हजेरी लावून मंडळांना मदत करतात. पण यावर्षीच्या गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार असल्याने इच्छुक तरुण मंडळांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार पाहिला तर एका मतदारसंघात लहान-मोठी किमान अडीच हजार मंडळे कार्यरत असतात. या मंडळांना प्रत्येक एक हजारापासून पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत इच्छुकांकडून देण्यास सुरुवात झाली आहे. मंडळांची संख्या आणि मदत पाहिली तर कोट्यवधी रुपये गणेशोत्सव मदतीच्या माध्यमातून वाटप होणार आहे. त्यात ज्या मतदारसंघांत काटा लढत आहे, तेथील मंडळांना भरभरून मदत मिळते. दोन-तीन इच्छुकांकडून पाकीट येऊ लागल्याने मंडळांचे कार्यकर्तेही अचंबित झाले असून विरोधकाचे पाकीट आम्हाला कसे आले? याची चर्चाही कोल्हापूर शहरात जोरात सुरू आहे. डॉल्बी,मंडपाचेही वाटपआर्थिक मदत नको, डॉल्बीसह मंडप, मंदिराची मागणी मंडळांकडून इच्छुकांकडे केली जाते. पंचवीस ते तीस हजार रुपयांचा डॉल्बीचे वाटपही मंडळांना केले जाते तर निवडून आलो की मंदिरासाठी एक लाख रुपये देण्याची ग्वाहीही इच्छुकांकडून दिल जात आहे. टोकाचा संघर्ष असणाऱ्या करवीर मतदारसंघात सध्या पाकिटाच्या वजनाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जोरात सुरू आहे. येथे एका इच्छुकाने मंडळांना ताकदीप्रमाणे (मंडळाच्या) दोन ते पाच हजार रुपयांची मदत दिल्यानंतर अस्वस्थ झालेल्या विरोधी कार्यकर्त्यांनी,आपले पाकीट जरा हलकं झाल्याची तक्रारी थेट नेत्यांकडे सुरू केल्या आहेत, यावर हा तर ट्रेलर आहे...असे सांगत कार्यकर्त्यांचे समाधान केले जात आहे. सुगी सुरू झाली की बारा बलुतेदारांना चांगले दिवस येतात. त्याप्रमाणे निवडणुका जवळ येऊ लागल्या की मंडळाच्या सुगीच्या दिवसाला सुरुवात होते. त्यामुळे मंडळाच्या संख्येतही वाढ होते. विशेषत: ग्रामीण भागात हा प्रकार जास्त पाहावयास मिळतो.